एका राज्यामध्ये एक सुप्रसिद्ध नामवंत मूर्तिकार राहत होता. त्याचे नाव होते. इंद्रजीत… मूर्ती घडविण्याचे अप्रतिम कौशल्य त्याच्याजवळ होते. तो अगदी हुबेहूब आणि जिवंत मुर्त्या घडवित असे. त्याच्या कलाकौशल्याला परदेशातही मागणी होती. राज्यात कित्येकदा त्याला त्याच्या या कलेबद्दल पुरस्कार मिळाला होता.
कधी कधी जे कार्य बोलुन साधता येत नाही, ते फक्त मौन धारण करूनच साधता येते कारण जेव्हा आपण मौन बाळगतो त्या वेळेला आपल्या अंतर्मनातली उर्जा अधिकाधिक कार्यरत होते. आपली इच्छाशक्ती जास्त कार्य करते. आपली परिपूर्ण एकाग्रता एखाद्या कार्यामध्ये कितीतरी पटीने एकवटली जाते.
श्री राम आणि माता सीता जेव्हा अयोध्येचे राज्य सोडून १४ वर्षे वनवासासाठी जातात, तेव्हा त्या वनवासामध्ये अश्या अनेक प्रसंगाना तोंड देऊन आनंदाने आपला संसार सुरु करतात. त्याच वेळी घडलेली ही घटना….
गुंजन दोन मनांचे म्हणजे, आपले मन एखाद्याच्या मनाशी गुणगुणणे, असा इथे अर्थ नव्हे….. तर आपले एक मन आपल्याच दुसर्या मनाची परीभाषा ओळखणे, असा इथे अर्थ आहे.
एका गुरुकुलातील हि कथा… जिथे शिष्यांना ध्यान, ज्ञान आणि दैनंदिन जीवनातल्या गोष्टींना अनुसरून विद्या मिळत होती. नेहमीप्रमाणे गुरु, शिष्यांबरोबर ज्ञानचर्चा करण्यापूर्वी काही काळ ध्यान धारण करीत असत.
चंचल अशा इच्छा जेव्हा योग्य पद्धतीने स्थिर होतात तेव्हाच त्या पूर्ण होतात. आणि स्थित होण्यासाठी महत्त्वाचे आहे इच्छाभक्ती ध्यान …
शरिरामध्ये अस्तित्वात असणार्या प्राणशक्ति वर केलेली साधना म्हणजे प्राणभक्ती…. प्राणभक्ती ध्यान केल्याने शरिराची रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि आपल्या शरिराला आजारांपासुन मुक्ती मिळते.
आपल्या नेहमीच्या जीवन प्रवासात अश्या बर्याचश्या घट्ना घड्तात ज्यामुळे आपले विचार निर्माण होतात तर बहुतेकदा आपले विचार अति होऊन एका ठरविक पातळीचे उल्लंघन होते आणि त्या विचारांमधुन स्थिती निर्माण होते. अश्या विचारांवर चर्चा, चर्चेतुन विषय, विषयांचा अभ्यास, अभ्यासातुन ग्रहण आणि जे ग्रहण केले ते ज्ञान म्हणजे “निरंजन”!
श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधूकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरीजा, पद्मा, मालती आणि सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मीमाता ओळखल्या जातात. अशा या सर्वांभूती असलेल्या श्रीमहालक्ष्मी मातेचे ध्यान लागावे अशी ही कथा आहे.
वास्तु म्हणजे एखादे सुंदर बांधकाम्…एखादे शिल्प्… पण आज आपण इथे बोलणार आहोत ते आपल्या निवार्याबद्दल्. ते म्हणजे आपलं घर… जिथे आपण वास्तव्य करतो. वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या मनाची प्रसन्नता वास्तूमध्ये चैतन्य निर्माण करते आणि त्या वास्तूची स्वच्छता ही समृद्धी घेऊन येते.
Copyright © 2025 | Marathisrushti