व्यक्ती-परिचय

चित्रकार सावळाराम हळदणकर

Category:

 

१९२५ मध्ये त्यांना त्यांच्या मॉहमेडन पिलग्रिम या कॅन्व्हासवरील तैलरंगातील फकिराच्या चित्राला बाँबे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले. त्यांच्या निर्मितीत प्रामुख्याने व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे व पौराणिक विषयांवरील प्रसंगचित्रे यांचा समावेश होतो. जलरंग व तैलरंगया दोन्ही माध्यमांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांतील तंत्रविशिष्ट बारकावेत्यांनी विलक्षण कौशल्याने आपल्या चित्रांतून दर्शविले; पण त्यांनी शुद्ध पारदर्शक जलरंगांत रंगविलेली चित्रे त्यांतील अप्रतिम तंत्रकौशल्यासाठी देश-विदेशात वाखाणली गेली. चित्रांत साधलेले छायाप्रकाशाचे परिणाम, चित्रणासाठी वापरलेल्या कमी-अधिक जाडीच्या रंगछटा व रंगलेपनाचे कौशल्य ही त्यांची शैलीवैशिष्ट्ये जलरंग व तैलरंग या दोन्ही माध्यमांत जाणवतात.

व्यक्ती-परिचय

इतिहास संशोधक डॉ.पांडुरंग पिसुर्लेकर

Category:

 

पिसुर्लेकरांनी या अभिलेखागाराखालील दप्तरखाना सुधारला; त्यातील कागदपत्रे खंडवार लावली आणि त्यासंबंधी सूची व दोन मार्गदर्शिका प्रसिध्द केल्या. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने पणजी येथे इतिहास संशोधनकेंद्र स्थापन केले. त्याचे संचालकपद पिसुर्लेकरांकडे होते. गोमांतकातील पहिले हिंदू इतिहास संशोधक असणारे डॉ. पिसुर्लेकर पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेली सर्व ऐतिहासिक कागदपत्रे भारतीय पुराभिलेखागारात आणण्यासाठी आयुष्यभर झटले. पोर्तुगीज दफ्तरातील साडेचारशे वर्षातील सर्व कागदपत्रे अभ्यासून त्यांनी ‘पोर्तुगीज मराठे संबंध’ हा अप्रतिम साधनग्रंथ लिहिला.

साहित्य - ललित

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग ९

Category:

 

हे सगळे जे घडले होते, ते माझ्या कल्पना शक्तीच्या पलीकडे होते. माझा माझ्यावरच विश्वास नव्हता कि, मी अशा कुठल्या अस्तित्वात असलेल्या स्वामींना मनोभावे नमस्कार करेन. कुठले योग होते हे दत्तगुरुच जाणे!!

कथा

रविवार बंद

Category:

 

मजबूत शरीरयष्टी, पिळदार मिशा आणि बऱ्यापैकी उंच असलेले रुबाबदार दूध काका त्यांची अगदी स्वच्छ, चकचकीत आणि नजरेत भरेल अशी खास पितळ्याची किटली सायकलला अडकवून दररोज पहाटे घरोघरी दूध घेऊन जायचे.

साहित्य - ललित

पण ‘लक्षात’ कोण घेतो?

Category:

 

पादचाऱ्यांची चुकी नसताना, असे अपघात होण्याचे प्रमाण भयंकर आहे.. इथे त्या व्यक्तीच्या अचानक मृत्यूमुळे, त्यांच्या कुटुंबियांची अवस्था किती बिकट होते, याची कुणालाही कल्पना नसते.. ती व्यक्ती कमवती असेल तर त्यांची आर्थिक परिस्थिती खालावते.. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या राहिलेल्या असतील तर ते कुटुंब, पूर्णपणे हतबल होतं..