लेखसंग्रह

कचर्‍यातून राष्ट्रनिर्मिती

Category:

 

राखेतून फिनिक्स पक्ष्याचा जन्म होतो, असे म्हणतात. मात्र कचऱ्यातून एखाद्या राष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते किंवा एखाद्या राष्ट्राचा उकीरडाही होऊ शकतो. आज भारतात अशीच परिस्थिती आहे.

लेखसंग्रह

अपघात! नव्हे, खूनच!

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 13/06/2004

आपला देश विस्तार, लोकसंख्या आदींच्या बाबतीत जगातील इतर अनेक देशांच्या तुलनेत प्रचंड मोठा आहे. स्वाभाविकच इतर अनेक बाबतीतसुध्दा आपण जगाच्या खूप पुढे आहोत. अर्थात आपण भारतवासी म्हणून अभिमान बाळगावा, अशा बाबी मात्र त्यामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या आहेत; किंबहुना नाहीतच असे म्हटले तरी चालेल.

लेखसंग्रह

महागडा गरीब देश!

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 30/05/2004
भारताच्या गरिबीचे तुणतुणे आम्ही भारतवासी नेहमीच वाजवतो. इतर पुढारलेल्या देशातसुद्धा भारताच्या गरिबीची नेहमीच कुचेष्टा होते. परंतु गरिबी निश्चित करण्याची जी मानके आहेत त्याचा विचार केला तर भारताची गरिबी वेगळ्या अर्थाने श्रीमंत ठरते.

लेखसंग्रह

मतांनाही मूल्य हवे!

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 23/05/2004

परिस्थितीनुरूप बदल हा कुठल्याही क्षेत्रातील विकासाचा अविभाज्य भाग आहे. बदलत्या परिस्थितीला अनुसरून योग्य ते बदल स्वीकारीतच कोणतीही व्यवस्था टिकू शकते, प्रगल्भ होऊ शकते. काळाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी ही लवचीकता आवश्यकच ठरते.

लेखसंग्रह

तर्कविसंगत कौल!

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 16/05/2004

चौदाव्या लोकसभा निवडणुकीचे अंतिम परिणाम बाहेर आले आणि संसद पुन्हा एकदा त्रिशंकू राहील हे स्पष्ट झाले. या निवडणुकीत मिळालेल्या जनादेशाचे एकाच शब्दात वर्णन करावयाचे झाल्यास त्याला आपण केवळ ‘विस्कळीत’ एवढेच म्हणू शकतो. मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीला पूर्ण बहुमत तर दूरच राहिले निसटत्या बहुमताच्या जवळपासही फिरकू दिले नाही.

लेखसंग्रह

शिक्षा कशाची?

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 09/05/2004

हिंदू संस्कृतीत पुनर्जन्माच्या सिद्धांताला मान्यता आहे. या जन्मातील बऱ्यावाईट कर्मानुसार मनुष्याला पुढील जन्म प्राप्त होत असतो. मागील जन्मात केलेली पापं फेडायची आणि शक्य झाल्यास काही पुण्य संचय करून पुढील जन्मातील जीवन अधिक सुखदायक व्हावे याची तरतूद करायची, असा ढोबळ हिशोब या सिद्धांतामागे आहे.

लेखसंग्रह

सुरुवात शून्यापासून हवी!

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 02/05/2004 ‘

निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी ‘दृष्टीपत्र’ (व्हिजन डॉक्युमेंट) प्रकाशित केले. या दृष्टीपत्राच्या माध्यमातून देशाच्या विकासाचे आकर्षक चित्र या पक्षांनी चितारले असले तरी या चित्रात रंग भरण्याची क्षमता आपल्याकडे आहे की नाही, हा चिंतनाचा प्रश्न ठरतो. राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणुकीच्या काळात बऱ्याच घोषणा करीत असतात.

लेखसंग्रह

मतदान अनिवार्य केल्याशिवाय पर्याय नाही!

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 25/04/2004

14 व्या लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्रातील 48 पैकी 24 मतदारसंघात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकसभेची निवडणूक राष्ट्रीय प्रश्नांनी संबंधित असते.

लेखसंग्रह

निवडून देण्यासाठीच मतदान करा!

Category:

 

लोकशाही शासनपद्धती आपण स्वीकारली आहे. त्यामुळे निवडणुका हा अपरिहार्य आणि तेवढाच महत्त्वाचा घटक झाला आहे. अलीकडील काळात या निवडणुकींना आलेले स्वरूप बघून अनेक सुबुद्ध नागरिक निवडणूक पद्धतीवर पर्यायाने लोकशाहीवरच टीका करीत मतदानापासून दूर राहतात.

लेखसंग्रह

हीच आहे योग्य वेळ!

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 11/04/2004
एखाद्या सरकारी खात्यात ‘सद्भावना सप्ताह’ दरम्यान जसे वातावरण असते तसे वातावरण सध्या संपूर्ण देशात दिसून येत आहे. विशेषत: राजकीय पक्षाशी संबंधित नेते आणि कार्यकर्ते चेहऱ्यावर विलक्षण माधुर्य ठेवून वावरत आहेत. अर्थात त्यामागे सद्भावनेचा भाव किती आणि स्वार्थाचा मुलामा किती, हा वेगळा विषय ठरतो.