लेखसंग्रह

नृसिंहभान देवस्थान

Category:

 

श्रीस्वामी समर्थ महाराजांनी स्वत:स्थापिलेल्या या श्री नृसिंहभान देवस्थानातच भकतश्रेष्ठ चोळप्पांच्या इच्छेनुसार त्यांची समाधी झाली. आज हे स्थान समाधी मठ म्हणून ओळखल जाते. “आमचे नाव सुद्धा नरसिंहभान आहे बरे!” असे श्रीमहाराज एकास म्हणाले होते त्यामुळे पूर्वी नरसिंहभान देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या स्थानाला आज जर श्रीस्वामी समर्थ समाधी मठ म्हटले जाते, यात काही नवल नाही. धन्य ते चोळप्पा ज्यांच्या घरालगतच पूर्णसनातन परब्रह्म सगुणी विसावला.

लेखसंग्रह

महाशिवरात्री

Category:

 

माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र असे म्हणतात. हे एक व्रत आहे. हे व्रत नित्य आणि काम्य दोन्ही आहे. नित्य म्हणजे प्रतिवर्षी करणे आणि काम्य म्हणजे इच्छित मनोरथ पूर्तीसाठी करणे. महाशिवरात्रीला चार याम पूजा मुख्य आहेत. याम म्हणजे प्रहर, एक प्रहर म्हणजे अंदाजे तीन तास.

लेखसंग्रह

वनवासींचे राम

Category:

 

आपला 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येला परत आले, तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. वनवासाला गेलेला राजा राम परत आला तो प्रभू रामचंद्र म्हणून. यामागे तपश्चर्या होती. त्याग होता. समर्पण होते. सर्वांना हृदयात सामावून घेण्याचे लोकोत्तर गुण होते.

लेखसंग्रह

शिवाष्टकम् स्तोत्र

Category:

 

भगवान शंकराच्या स्तुतीसाठी अनेक अष्टकांची रचना झाली आहे. शिवाष्टक, लिंगाष्टक, रुद्राष्टक, बिल्वाष्टक अशा नावांनी ती प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये शिवाष्टकाला विशेष महत्त्व आहे. शिवाष्टकांची संख्याही कमी नाही. श्रीमद् शंकराचार्यांनी शंकराच्या स्तुतीपर हे भावपूर्ण रसाळ स्तोत्र भुजंगप्रयात (गण- यययय) वृत्तात रचले आहे. शिवाच्या प्रिय शिवाष्टकम् स्तोत्राचे पठण आणि श्रवण केल्याने माणसाची प्रत्येक वाईट परिस्थितीतून लवकर सुटका होते. शिवाची ही स्तुती श्रावण महिन्यात केल्याने दुर्भागी व्यक्तीलाही भाग्यवान बनवते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

लेखसंग्रह

तुलसी विवाह

Category:

 

कार्तिक शुक्ल एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह केला जातो. प्रबोधिनी एकादशीला भगवंतांना जागे केले जाते आणि बाळकृष्णाचा तुळशीजवळ विवाह लावला जातो. या दिवशी तुळशी वृंदावन सुशोभित केले जाते. वृंदावनात उस, फुलांसहित झाडे उभी करतात.

लेखसंग्रह

हुताशनी पौर्णिमा (होळी) ॥ फाल्गुन शुक्ल

Category:

 

फाल्गुन पौर्णिमेचे हुताशनी पौर्णिमा हे नाव आहे. या दिवशी प्रदोष काळी होळी पेटविली जाते. याची पौराणिक कथा – हिरण्यकश्यपूच्या बहिणीला होलीकेला अग्नि जाळू शकणार नाही असा वर होता. म्हणून हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मांडीवर घेऊन होळीवर बस असे सांगितले.

लेखसंग्रह

श्रीराम कथा सदा विजयते

Category:

 

अशी ख्याती प्राप्त झालेली राम कथा म्हणजे वाल्मिकींच्या अलौकिक प्रतिभेचा अनुपम आविष्कार! वाल्मीकिंनी रचलेले रामायण हे महाकाव्य म्हणजे संपूर्ण विश्वाच्या साहित्यातील पहिले महाकाव्य होय. म्हणून त्यांना आदिकाव्य आणि महर्षी वाल्मिकींना आदि कवी संबोधिले जाते. या ग्रंथात कवीने 24000 संस्कृत श्लोक 7 कांडामध्ये विभागून संपूर्ण श्री रामचरित्र अत्यंत कौशल्याने गुंफले आहे.