Articles by sachingadkari
निवडणूक, अंधश्रध्दा, रेल्वे पोलीस व मस्तानबाबा
Category:
अवर्गिकृतसाधारण सन १९९० – १९९२ साल असावे लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या.माझी नेमणूक पुणे रेल्वे न्यायालयाला पोलीसांचा सरकारी वकिल म्हणून झालेली होती.त्यावेळी पोलीस खात्यात गाजलेले व नावाजलेले दोन पोलीस अधिकारी एक पुणे रेल्वेचे “पोलीस आधिक्षक” भुजंगराव मोहीते व दुसरे “होम डि वाय एस पी” माणीकराव दमामे नेमणूकीस होते.
दिवाळीची पोस्त
Category:
साहित्य - ललितपोस्टमनची आणि त्या मुलीची हळूहळू चांगली दोस्ती जमली. दिवाळी जवळ आली होती. पोस्टमनला काय द्यावे याचा विचार ती मुलगी करत होती. तिला एक युक्ती सुचली. पत्र घेण्यासाठी दार उघडल्यावर तिला रोज दिसायचे की पोस्टमनची पावले मातीत उमटली आहेत.
जागतिक चहा दिन, पाऊस, चहावाला व व्हीस्की
Category:
अवर्गिकृतइंग्रजांनी आणलेले इंग्रजी शिक्षण, रेल्वे गाडी, रोगप्रतिबंधक लशी,इंग्लिश दारू व या सर्वांच्याही पेक्षा कंकणभर सरस भारतात आणलेला चहा. या सर्वांनी भारतीय सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक,राजकीय व रोजच जगणंच व्यापून टाकलेल आहे.
प्रेमाची उधारी
Category:
अवर्गिकृतउधारी संदर्भातल्या पाट्या तुम्ही आम्ही बाजारात, दुकानाबाहेर नक्कीच वाचलेल्या असतील. व्यापार हा कोणताही असो… म्हणजे खरमुरे विकणाऱ्या पासून तर टाटा, बिर्ला, मुकेश अंबानी असो… या ‘उधारी’ नावाच्या रोगापासून प्रत्येक व्यापारी, दुकानदार दूर राहण्याचा प्रयत्न करीत असतो परंतु कितीही खबरदारी बाळगली तरी ‘उधारी शिवाय धंदा नाही”, हेच त्रिकालाबाधित सत्य आहे.. यात शंकाच नाही.
पावसाळ्यातील मेकओव्हर
Category:
लेखसंग्रहव्यवसाय
Category:
साहित्य - ललितदोघी मैत्रिणी बोलत असतात. दोघी गृहिणी असतात. एक जण दुसरीला सांगते “अगं, मी ड्रायव्हिंग लायसेन्स काढायला गेले तर तिथल्या अधिकाऱ्याने मला विचारले तुमचा व्यवसाय काय? मी म्हणाले मी आई आहे” त्याने तुच्छपणे माझ्याकडे पाहिले आणि तो म्हणाला “म्हणजे तुम्ही काही उद्योगधंदा करत नाही तर तुम्ही नुसत्याच गृहिणी आहात.
दिल्ली नावामागचा इतिहास
Category:
लेखसंग्रहदिल्ली ही भारताची राजधानी आहे. दिल्ली म्हणजेच भारताच हृदय. हिंदीमध्ये ‘ये दिलवालो की दिल्ली है’ असं म्हटलं जात. दिल्लीला ऐतिहासिक, भौगोलिक आणि आर्थिक वारसा लाभला आहे. ही दिल्ली परकीयांचे आक्रमण आपल्या अंगाखांद्यावर झेलत मोठ्या कणखरपणे उभी राहिली, याच दिल्लीने भारताचा स्वातंत्र्यलढा सर्वात जवळून पाहिला, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात याच दिल्लीच्या नावाने ‘चलो दिल्ली’ ही प्रसिद्ध घोषणा देण्यात आली, या दिल्लीने भारतीय तिरंगा ध्वजाला मुक्त आकाशात फडकतांनी पाहिलंय, या दिल्लीने भारतीय संविधानाचा निर्माण होतांनी पाहिलंय.
मुंबई ते ठाणे रेल्वे – १७१ वर्षे…
Category:
लेखसंग्रहहिंदुस्थानी आगीची गाडी, तिला बांधला मार्ग लोखंडी मनाचाही वेग मोडी, मग कैची हत्ती घोडी… भारतात आगगाडीच्या आगमनाचे स्वागत करणारी एक कविताच गोविंद नारायण माडगावकर यांनी ‘मुंबईचे वर्णन’ या आपल्या पुस्तकात ‘कटाव’ या शीर्षकाखाली दिली आहे. ब्रिटिशांनी भारतातील आपले साम्राज्य अधिक मजबूत होण्यासाठी तसेच दळणवळण वेगाने होण्यासाठी आगगाडी म्हणजेच रेल्वेचे जाळे विणले.