औरंगाबादपासून अवघ्या २२ कि.मी.वर वेरूळ हे गाव असून तेथे लक्षविनायकाचे मंदिर आहे. लक्षविनायक हे गणपतीच्या एकवीस स्थानांपैकी एक आहे. शिवपुत्र स्कंदाने हा गणपती स्थापना केला होता. वेरूळ येथे १२ ज्योर्तिलींगांपैकी एक घृषर्णेश्वराचे मंदिर आहे. तसेच प्राचीन लेण्या आहेत. हे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द आहे ।। ॐ गं गणपतये नम: ।।
— जगदीश पटवर्धन