कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

मैत्रगंध

Category:

 

उंच उंच नारळाच्या बागा आणि त्या झावळ्या वर बसलेले पक्षी,किनाऱ्यावर पोहचताच होणारा तो वाळूचा स्पर्श,गलबताकडे धाव घेणारी कोळ्यांची पोरं. समुद्राच्या भोवताली असलेल्या किनाऱ्यावर तासनतास घालवलेला वेळ, आल्हाददायक होणारा हवेचा स्पर्श, त्यातून मिळणारा आनंद; अपर्णाला कायमच शहरातून तिच्या छोट्याश्या समुद्रकिनारी असणाऱ्या गावात ओढून आणायचा. दोन दिवसांनी ती पुन्हा तिच्या कामात व्यस्त असायची.. तिच्या नोकरीच्या निमित्ताने तिला पुन्हा परत जायला लागायचं, मन मात्र तिथच राहिलं आहे सतत असंच वाटायचं तिला. आपल्या स्वतःच्या कामाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मात्र अपर्णा फारच तत्पर होती.