शहरे आणि गावे

हिंगोली जिल्हा

Category:

 

हिंगोली हा मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा. हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेव महाराजांचे मूळ गाव असून बालपणापासूनच पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीची गोडी लागलेल्या संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून औंढा-नागनाथास जाऊन विठोबा खेचरांकडून गुरूपदेश घेतला.

शहरे आणि गावे

मुंबई जिल्हा

Category:

 

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी. महाराष्ट्रासाठी मुंबई अत्यंत मोलाची आहे. १०५ हुतात्म्यांचे रक्त सांडून महाराष्ट्राने मुंबई स्वत:कडे मिळवली.

शहरे आणि गावे

पालघर जिल्हा

Category:

 

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन निर्माण केलेला पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात नवा जिल्हा. अनेकविध वैशिष्ट्यांनी समृध्द असा हा जिल्हा आहे. पश्चिमेला अरबी समुद्र असल्याने या जिल्ह्याला सुंदर किनारा लाभला आहे. पूर्वेला सह्याद्रिची रांग असल्याने हा जिल्हा जंगल, डोंगर-कपारींनी समृध्द आहे.

साहित्य - ललित

कुकरू

Category:

 

सेफ्टी व्हॉल्वमधून थोडीशी हवा सोडत कुकरने विचार केला. आतल्या आत गास्केट घट्ट करुन पाहिलं आणि म्हणाला,“तुम्हा उघड्या तोंडाच्या लोकांना नाही समजणार ते. म्हणजे “वाफ सोडूंना” आमच्या म्हणजे ‘वाफ पकडूंच्या’ अडचणी समजणं जरा कठीण.”
परात म्हणाली.“एऽऽ कुकरू जरा सोपं करुन सांग रे.” वाफ सोडत कुकर हसला आणि म्हणाला,“अगं आमच्या डोक्यावर मध्यभागी शिटीचं सतत टांगतं वजन असतं! तर दुसऱ्या बाजूला तो सेफ्टी व्हॉल्व डोक्यातच घुसलेला असतो.

आणि गळ्याभोवती त्या रबरी गास्केटचा फास असतो. माझ्या पोटातलं पाणी उकळू लागलं की वाफेचं “धूम मचा दे..” सुरू होतं. अशावेळी तोंड बंद करुन अन् गळा आवळून मला गरम वाफेचा धूम धमाका सहन करावा लागतो!”