शहरे आणि गावे

कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

कोल्हापुरातील मुख्य उद्योग शेती आणि शेतीशी संबंधित इतर व्यवसाय आहेत. याशिवाय कोल्हापूर शहराजवळ लोहकाम आणि कोल्हापुरी चपला बनवण्याचे बरेच छोटे कारखाने आहेत. सहकार व उद्योगधंदे-कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे माहेरघरच मानले जाते.

शहरे आणि गावे

जालना जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

समर्थ रामदास स्वामी – श्री समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या गावी झाला. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीचा पाया भक्कम करण्याचे काम समर्थांमुळे सोपे झाले आणि या महाराष्ट्राच्या भुवनी आनंदवन उदयास आले.

शहरे आणि गावे

जालना जिल्ह्यातील पर्यटनस्थळे:

Category:

 

राजूर येथील श्री गणेश मंदिर – अनेक श्रध्दास्थाने असणार्‍या मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील राजूरचा गणपती हेही असंख्य भक्तांचे श्रध्दास्थान आहे. जालना जिल्हयातील राजूर हे गणपतीचे पूर्ण पीठ मानले जाते. महाराष्ट्रात मोरगांव, चिंचवड व राजूर ही श्रीगणेशाची तीन पूर्ण पिठे तर पद्मालय हे अर्ध पीठ मानले जाते.

शहरे आणि गावे

जालना जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

धाडसी लमाणी लोकांचे वास्तव्य हे जालना जिल्ह्याचे वेगळे वैशिष्ट्ये आहे. भिल्ल्ल जमातीचे लोकही जिल्ह्यात आढळतात. भिल्ल जमातीची भाषा भिल्ली असून, अहिराणी व पावरी या बोलीभाषाही या भागात बोलल्या जातात.

शहरे आणि गावे

जालना जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

जालना हा कृषिप्रधान जिल्हा असून, दोन्ही हंगामात घेतले जाणारे ज्वारी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे अन्नधान्य पीक असून कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. करडई उत्पादनाच्या दृष्टीने हा जिल्हा महत्त्वपूर्ण ठरतो.

शहरे आणि गावे

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

कोल्हापूर जिल्ह्यात पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे १२ महिने विविध पिके घेतली जातात. सहकारी साखर कारखान्यांमुळे ऊस हे येथील महत्त्वाचे पीक आहे. पश्चिमेकडील भागात मुख्यत: भात पिकतो. खरीप पिकांमध्ये मुख्यत: भाताव्यतिरिक्त ऊस, भुईमूग, सोयाबीन व ज्वारी, नाचणी काही प्रमाणात असतात. रब्बी पिकांमध्ये मुख्यत: ज्वारी, गहू आणि तूर ही पिके घेतली जातात.

शहरे आणि गावे

कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

कोल्हापुरातील श्रीमहालक्ष्मी मंदिर हे पूर्ण शक्तिपीठ तर आहेच, शिवाय ते स्थापत्य शास्त्रातील व कलेतील एक उत्तम प्रतीचा नमुना म्हणून गणले जाते. श्री महालक्ष्मीचे मंदिर कोणी बांधले याबाबतचे संशोधन परिपूर्ण नाही.

शहरे आणि गावे

कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

गोविंदराव टेंबे हे ज्येष्ठ कलावंत कोल्हापूरचेच. श्री. टेंबे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट हार्मोनियम वादक होत. आजही त्यांचे नाव संगीत क्षेत्रात आदराने घेतले जाते. त्यांनी काही नाटकांतून अभिनयही केला, पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी नाटकातील पदांना शास्त्रीय संगीतावर आधारित उत्कृष्ट चाली दिल्या.

शहरे आणि गावे

कोल्हापूर जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

मुंबई-पुणे-बंगळूर-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ कोल्हापूर जिल्ह्यातून जातो. अलीकडेच पुणे-कोल्हापूर हा महामार्ग चौपदरी करण्यात आल्यामुळे प्रवासाचा वेळ वाचून प्रवाशांना अनेक फायदे होत आहेत. कोल्हापूर व रत्‍नागिरीला जोडणारा आंबा घाट, सावंतवाडीला जोडणारा फोंडा घाट, तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्याला जोडणारा अंबोली घाट हे पश्र्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारे प्रमुख घाट या जिल्ह्यात आहेत.

शहरे आणि गावे

जालना जिल्ह्याबद्दल भौगोलिक माहिती

Category:

 

जालना जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या मध्य भागात स्थित असून मराठवाडा विभागात येतो. आधी औरंगाबाद जिल्ह्याचा भाग असणारा जालना जिल्हा १ मे १९८२ रोजी वेगळा केला गेला. जालना जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७६१२ चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या १६,१२,३५७ इतकी आहे.