शहरे आणि गावे

परभणी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

गौतम ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही परभणी भूमी गौतमी नदीचा उगम येथेच झालेला आहे.गंगाखेड हे गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन धार्मिक क्षेत्र आहे. या ठिकाणी नदीच्या काठावर व गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. येथे संत जनाबाईंची समाधी आहे. येथे तीनशे वर्षांपूर्वी संत आनंदस्वामी यांनी स्थापन केलेले बालाजीचे मंदिर असून बालाजीची वाळूची मूर्ती आहे.

शहरे आणि गावे

परभणी जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

परभणी जिल्ह्यात गोदावरी दुधना सहकारी साखर कारखाना व नृसिंह सहकारी साखर कारखाने असुन,येथे प्रभावती सूत गिरणी,जिनिंग-प्रेसिंगचा उद्योग, डाळमील, खताचा कारखाना व सिमेंटचे खांब बनवण्याचे कारखाने ही आहेत.

शहरे आणि गावे

नाशिक जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

बाजरी हे येथील प्रमुख पीक असून येथे द्राक्षे, कांदा, ऊस व डाळींबाचे पीकदेखील मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. निफाड व लासलगाव या कांद्याच्या प्रमुख व मोठ्या बाजारपेठा आहेत.

शहरे आणि गावे

रायगड जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

थळ-वायशेत येथे राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स हा सार्वजनिक क्षेत्रातील खत-प्रकल्प कार्यरत आहे. पनवेल तालुक्यात रसायनी येथे हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स हा प्राथमिक रसायने तयार करण्याचा प्रकल्प असून येथे मोठ्या प्रमाणावर प्रतिजैविकांची (अँटीबायोटिक्स) निर्मिती केली जाते.

शहरे आणि गावे

रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

थिबा पॅलेस –  हे रत्नागिरी शहरातील प्रमुख आकर्षण आहे. या ९७ वर्षांच्या जुन्या राजवाड्याचे ब्रह्मदेशाच्या इतिहासाशी नाते आहे. ब्रह्मदेशात ७ वर्षे सत्ता गाजविलेल्या राजा थिबा याची राजवट इ.स. १८५५ मध्ये ब्रिटिशांनी उलथवली.

शहरे आणि गावे

नाशिक जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

नाशिक जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येशी असलेले आदिवासी जमातींचे प्रमाण लक्षात घेता नाशिक जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक लागतो. महादेव कोळी, वारली, पारधी, भिल्लं, ठाकर या आदिम जमाती या जिल्ह्यात राहतात.

शहरे आणि गावे

रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

भात’ हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. लागवडीखालील एकूण जमिनीपैकी साठ टक्क्यांहून अधिक जमीन भाताखाली आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात डोंगरउतारावर नाचणीचे पीक घेतात. संगमेश्वर व चिपळूण हे तालुके नाचणीच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

शहरे आणि गावे

रायगड जिल्हा

Category:

 

रायगड या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानीचा किल्ला रायगड हे या जिल्हयाचे प्रमुख वैशिष्ट्य.

शहरे आणि गावे

रत्नागिरी जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

मुंबई-पणजी-कोची हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ या जिल्ह्यामधून जातो. हा मार्ग मुंबई-गोवा महामार्ग या नावाने परिचित आहे. सातारा जिल्ह्याला जोडणारा कुंभार्ली घाट, रायगड जिल्ह्याला जोडणारा कशेडी घाट व कोल्हापूरला जोडणारा आंबा घाट हे महत्त्वाचे घाट रत्नागिरी जिल्ह्यात आहेत.

शहरे आणि गावे

रायगड जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

रायगड जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ७१४८ कि.मी.² इतके आहे. तर या जिल्ह्याची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार २२,०७,९२९ एवढी आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिमेकडे अरबी समुद्र असून पूर्व दिशेला सह्याद्रीची पर्वतरांग आहे.