शहरे आणि गावे

परभणी जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागाच्या अखत्यारीत येतो.परभणीला पूर्वी प्रभावतीनगर असे म्हटलं जात असे.

शहरे आणि गावे

नाशिक जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

बाजरी हे येथील प्रमुख पीक असून येथे द्राक्षे, कांदा, ऊस व डाळींबाचे पीकदेखील मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. निफाड व लासलगाव या कांद्याच्या प्रमुख व मोठ्या बाजारपेठा आहेत.

शहरे आणि गावे

नाशिक जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

नाशिक जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येशी असलेले आदिवासी जमातींचे प्रमाण लक्षात घेता नाशिक जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक लागतो. महादेव कोळी, वारली, पारधी, भिल्लं, ठाकर या आदिम जमाती या जिल्ह्यात राहतात.

शहरे आणि गावे

नाशिक जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

हिंदुस्थानात संस्थात्मक जीवनाचा व सनदशीर राजकारणाचा पाया घालणारे न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाडचा होय. भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके, ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि दलित मुक्तीसाठी लढणारे दादासाहेब गायकवाड हे सगळे विविध क्षेत्रांतील दिग्गज नाशिक जिल्ह्याच्या भूमीतले होते.

शहरे आणि गावे

नाशिक जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला धुळे; पूर्वेला जळगाव; आग्नेयेला औरंगाबाद, दक्षिणेला अहमदनगर, पश्चिमेला ठाणे, आणि वायव्येला डांग व सुरत (गुजरात) असे जिल्हे वसलेले आहेत. नाशिक जिल्हा हा तापी व गोदावरीच्या खोर्‍यात उत्तर महाराष्ट्रात वसला आहे.

शहरे आणि गावे

हिंगोली जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

भारताच्या स्वातंत्र्यानंतरही हिंगोली जिल्ह्याचा भाग हा हैद्राबादच्या निजामाच्या ताब्यात होता. मराठवाड्यातील हैद्राबात मुक्तिसंग्रामात हिंगोली, बामणी इत्यादी गावे आघाडीवर होती. महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय भागात मराठवाड्यात वसलेला हा या विभागातील आठवा जिल्हा ठरला.

शहरे आणि गावे

रायगड जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

भात’ हे रायगड जिल्ह्याचे मुख्य पीक असून लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी जवळजवळ ७०% क्षेत्रात हे पीक घेतले जाते. भात उत्पादनात संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. माणगाव, अलिबाग, पेण, पनवेल या तालुक्यात भाताचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

शहरे आणि गावे

परभणी जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

अगस्ती ऋषी विंध्य पर्वत ओलांडून आल्यानंतर त्यांनी आपला आश्रम गोदावरीकाठी बांधला. त्यानंतर अनेक ऋषी-मुनी या भागात आले. मुद्गल ऋषींच्या तपश्र्चर्येने पावन झालेले मुद्गल हे गाव, गोदावरी नदीचा किनारा, वाल्मिकी ऋषींमुळे पावन झालेले वालूर (सेलू) व पांडवांपैकी पार्थाने (अर्जुनाने) वसविलेले पाथरी(पार्थपूर)-अशा परभणी जिल्ह्यातील भागांचे उल्लेख पुराणात आहेत.

शहरे आणि गावे

रायगड जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

तानाजी मालुसरे – छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंह असे ज्यांना म्हटले जायचे त्या तानाजी मालुसरे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उमरठ या गावी झाला.

शहरे आणि गावे

रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांचा व राज्यकारभाराचा खरा साक्षीदार असा हा रायगड किल्ला. महाडपासून २५ कि.मी. वर असलेला हा दुर्ग गांधारी व काळ अशा दोन नद्यांच्या उगमस्थानाजवळ वसलेला आहे. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक याच किल्ल्यावर इ. स. १६७४ मध्ये संपन्न झाला.