Month: March 2011
महिलांसाठीचे कायदे
Category:
अवर्गिकृतसमाजात महिलांना सन्मानाने जगता यावे व त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर कायदयांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायदयांचा एक आढावा.
दिल्लीवर सत्ता कुणाची
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनदिल्लीच्या गादीवर कोण बसणार, याचे औत्सुक्य पराकोटीला पोहोचले आहे. पंतप्रधान कुणाचा असेल हा प्रश्न काही दिवसांपूर्वी द्विपर्यायी होता. रालोआचा असेल की संपुआचा, हे दोनच पर्याय उत्तरासाठी होते.
शब्दाचे मोल….!
Category:
अवर्गिकृतशब्दासाठी कर्णाने कवचकुंडल दिले
सत्य हरिश्चंद्राने राज्त्य्ग केले,
मर्यादा पुरुषोत्तम गेले वनवासी
शब्दानेच प्रसिद्ध ‘ महाभारत ‘ घडविले !
विभाग कशासाठी, काम कुणासाठी ?
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनरयतेतून राजे निवडले जातात; परंतु निवडून आल्यावर ते राजे रयतेचे राहत नाहीत. रयतेचे राज्य म्हटले, की आधी विचार रयतेच्या कल्याणाचा व्हायला हवा. संपूर्ण भारताला एक बाजारपेठ बनवून ती बाजारपेठ विदेशी कंपन्यांच्या हवाली करणार्यांना रयतेचे राजे कसे म्हणता येईल? लोकशाहीचे वर्णन जनतेने जनतेसाठी जनतेद्वारा चालविलेले राज्य असे केले जाते.
मराठी आडनावांच्या गमतीजमती.
Category:
लेखसंग्रहमराठी आडनावांचा अभ्यास हा अेक गहन विषय आहे. हा अभ्यास करतांना, मराठी आडनावांत असलेल्या विविधतेमुळे कित्येक वेळा विनोद, मनोरंजक किस्से, आिण गमतीजमती निर्माण होतात. अशाच काही गमतीजमती येथे संकलीत केल्या आहेत. त्या त्या आडनावांच्या व्यक्तींनी,या गमतीजमतींचा आनंद खेळीमेळीने घ्यावयाचा आहे, कारण त्या आडनावांची हेटाळणी करण्याचा मुळीच अुद्देश नाही.
बंजारा समाजातील होलिकोत्सव
Category:
अवर्गिकृतप्राचीन काळापासून दर्याखोर्यात वावरणार्या बंजारा समाजाचा इतिहास बंजारा लोकसंस्कृतीमधून दिसून येतो. बंजारा समाजाचा होळी उत्सव म्हणजे ग्राम रंगभूमीवरील टोटल थिअटरचा अविश्कार म्हणावा लागेल.
महिला : लोकशाही व शिक्षण ……
Category:
अवर्गिकृतस्त्रीच्या प्रगतीचा विचार करत असताना एकच दिसून येईल की, समाजात जसे-जसे शिक्षण वाढत गेले त्याबरोबरच स्त्री माणूस होण्याचा प्रयत्न करू लागली. स्त्री साहित्यात येऊ लागली ती राणी, पत्नी, बायको म्हणून नव्हे तर नायक म्हणून. यातूनच स्त्रियांना अस्मितेची जाण झाली आणि जीवन जगत असताना सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात स्त्रियांना महत्त्वाचे स्थान असावे, त्यांचा माणूस म्हणून विचार व्हावा ही धारणा समोर आली. त्यातून साहित्यातून स्त्री स्वातंत्र्याच्या छटा उभ्या राहू लागल्या आणि…….
पर्यावरण रक्षण,जगण्याचे शिक्षण….!
Category:
अवर्गिकृतविविध पक्षी व प्राण्यांच्या जाती पाहण्यासाठी आज प्राणीसंग्रहालयात जाऊन पाहावे लागते.चिमण्या,गिधाड,कावळे,माळढोक,कौंच,साप,माकड,वाघ, चित्ता असे विविध प्राणी अस्तित्वाची लढाई लढत आहेत.दररोज वर्तमानपत्रांमध्ये रकानेच्या रकाने भरून जागृती केली जाते,पण वेळ आहे कुणाला ही मानसिकता पाहायला मिळते.आपल्या डोळ्यासमोर विविध पक्ष्यांची सरेआम विक्री केली जाते,थोडावेळ हळहळ व्यक्त करून मोकळे होण्याचे दिवस आता गेलेत.पक्षी व प्राणी यांची तस्करी तसेच विक्री करणाऱ्यांच्या हालचालींवरही सामान्यांनी कटाक्षाने नजर ठेवली पाहिजे.
सजीवांच्या उपयोगाबाबत बोलायचे झाल्यास कितीतरी उदाहरणे देता येतील,पिकांवर येणारी टोळधाड आणि लष्करीअळी चिमण्यांच्या माध्यमातून नियंत्रित केली जाते,पोलिओवर लस बनविण्यासाठी आवश्यक जीवाणू माकडाच्या मूत्राशयात मिळतो,सापांच्या माध्यमातून पिके नष्ट करणाऱ्या उंदरावर व पर्यायाने प्लेग सारख्या रोगावर नियंत्रण केले जाते,अन्थ्राक्ससारख्या महाभयंकर रोगाच्या ‘करीअन’ या विषाणूला आला घालण्याचे सामर्थ्य गिधाडांमध्ये आहे,कुत्र्यापासून पसरणाऱ्या ‘जलसंत्रास’ या रोगावरील लस मेंढी आणि कोंबडीच्या गर्भाशयापासून बनविली जाते.