व्यक्ती-परिचय

देविदास दत्तात्रेय वाडेकर

Category:

 

कोशकार आणि तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले देविदास दत्तात्रेय वाडेकर यांचा जन्म २५ मे १९०२ साली सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात कुरोली या खेडेगावात झाला. त्यांचे वडील राहुरी येथे प्राथमिक शिक्षक होते. त्यामुळे प्राथमिक शिक्षण राहुरी येथे तर नगर येथे देविदास वाडेकर यांचे माध्यमिक शिक्षण झाले.

व्यक्ती-परिचय

दीनानाथ मंगेशकर

Category:

 

तेजस्वी, पल्लेदार, धारदार आवाज, सूरनळ्यातून रंगीबेरंभी स्फुल्लिग उडून यावे अशाप्रकारे गळयातून बाहेर पडणार्या ताज्या सुंदर, ढंगदार चिजा, ठुमर्या, दादरे या गायकीच्या गुणांबरोबरच आवाजातील उंची, रूंदी, जोर या गुणांचे मिश्रण ज्यांच्या आवाजात आढळत असे, ते ज्येष्ठ श्रेष्ठ गायक दीनानाथ गणेश मंगेशकर. दीनानाथांचा जन्म गोमांतकातील मंगेशी या गावी २९ डिसेंबर १९०० रोजी झाला.

व्यक्ती-परिचय

दुर्गा नारायण भागवत

Category:

 

एक विदुषी, तसेच लोकसाहित्य, बौद्ध वाङ्मय, समाजशास्त्र इ. विषयांच्या अभ्यासक आणि ललित लेखिका म्हणून अधिकाराने ज्यांचे नाव घेतले जाते त्या दुर्गा भागवत हे महाराष्ट्राला परिचित असेच नाव आहे. दुर्गाबाईंचा जन्म १० फेब्रुवारी १९१० रोजी इंदूर येथे झाला.

व्यक्ती-परिचय

दिलीप वेंगसरकर

Category:

 

दिलीप वेंगसरकर यांचा जन्म ६ एप्रिल १९५६ रोजी महाराष्ट्र राज्यात राजापूर येथे झाला. भारतीय क्रिकेट खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या काळात अतिशय वैशिष्ट्यपूर्ण शैली असलेले फलंदाज म्हणून ते प्रसिद्ध होते. अतिशय तडाखेदार आणि उत्तम फटके मारणारे फलंदाज म्हणून ते गौरविले गेले होते.

व्यक्ती-परिचय

दिनकर गंगाधर केळकर

Category:

 

काव्यसंग्राहक – संपादक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुराणवस्तू संग्राहक असलेले दिनकर गंगाधर केळकर हे नाव ‘राजा दिनकर केळकर म्युझियम’ या संस्थेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असेच. त्यांचा जन्म १० जानेवारी, १८९६ रोजी झाला.

व्यक्ती-परिचय

दिलीप अच्युत सोमण

Category:

 

श्री. दिलीप सोमण हे ठाणे येथील प्रसिध्द उद्योजक आहेत. ते बी. इ. (मेकॅनिकल) असून त्यांना इंजिनियरिंग उद्योगातील सुमारे ३७ वर्षांचा अनुभव आहे.

व्यक्ती-परिचय

दिनानाथ दलाल

Category:

 

चित्रकलेवर ‘दिनानाथ शैली’चा ठसा उमटविणारे दिनानाथ दामोदर दलाल. राजकीय, सामाजिक व्यंगचित्रे अतिशय मार्मिकपणे रेखाटता रेखाटता बोजडपणा आणि रसहीनता यापासून आपला कुंचला दूर ठेवून त्यांनी मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठात अमूलाग्र बदल घडवून आणला.