लेखसंग्रह

अनाकलनीय पण सत्य!

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 05/09/2004

आयुष्य डोळसपणे जगताना मानवी स्वभावाचे अनेकविध कंगोरे पदोपदी अनुभवास येतात. अनेक वेळा एखादी व्यक्ती अशी का वागली, या प्रश्नाचे उत्तर प्रयत्न करूनही सापडत नाही. जर आपण सार्वजनिक जीवनात अधिक सक्रिय असलो तर असे अनुभव ही नित्याचीच बाब बनते.

लेखसंग्रह

राईचा पर्वत!

Category:

 

राघोबा दादांनी नारायणला ‘धरावे’ असा आदेश गारद्यांना दिला आणि आनंदीबाईंनी ‘ध’चा ‘मा’ करीत पेशव्यांच्या इतिहासातील एका काळ्याकुट्ट प्रकरणाला जन्म दिला. केवळ अक्षर बदलले आणि शनिवारवाड्याच्या भिंती कोवळ्या, निष्पाप नारायणाच्या रक्ताने न्हाऊन निघाल्या. एखादे अक्षर, एखादा शब्द किंवा एखादे वाक्य!

लेखसंग्रह

सरकारी बर्म्युडा ट्रँगल

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 04/04/2004

विज्ञान आणि शास्त्रज्ञांसाठी अद्यापही आव्हान असलेले अनेक भौगोलिक चमत्कार आजही अस्तित्वात आहेत. अटलांटिक महासागरातील बर्म्युडा ट्रँगल हे असेच एक रहस्य आहे. अटलांटिक महासागरात असलेल्या या त्रिकोणी प्रदेशात कोणतीही वस्तू गडप होते.

लेखसंग्रह

नव्या युगाचा नवा मंत्र!

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 08/08/2004
विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि म्हणूनच प्रवाहीपणा हे तिचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. खळाळत वाहणारी नदी स्वत:सोबत वाटेत येणाऱ्या सगळ्यांनाच वाहत नेत असते; परंतु एखादा मोठा खडक तिच्या प्रवाहाला दाद न देता अविचल उभा राहतो. अशावेळी त्या खडकावर डोके आपटीत आपला प्रवाह अवरुद्ध करणे नदीला मान्य नसते.

लेखसंग्रह

व्यवस्थेचे बळी!

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 11/07/2004

अलीकडील काळात आत्महत्यांचे प्रमाण अतिशय वाढत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी, विद्यार्थी, पोलिसासारख्या सरकारी विभागातील कर्मचारी आणि लहान-मोठे उद्योजकदेखील आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग चोखाळत आहेत. या घटना समाजाच्या सुदृढतेचे लक्षण आहेत, असे खचितच म्हणता येणार नाही.

लेखसंग्रह

मतांनाही मूल्य हवे!

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 23/05/2004

परिस्थितीनुरूप बदल हा कुठल्याही क्षेत्रातील विकासाचा अविभाज्य भाग आहे. बदलत्या परिस्थितीला अनुसरून योग्य ते बदल स्वीकारीतच कोणतीही व्यवस्था टिकू शकते, प्रगल्भ होऊ शकते. काळाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी ही लवचीकता आवश्यकच ठरते.

लेखसंग्रह

मांगल्यातील अमंगल!

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 26/09/2004

सध्या संपूर्ण राज्यात निवडणूक आणि गणेशोत्स्वाची धूम सुरु आहे. संपूर्ण राज्यातील वातावरण एकप्रकारच्या धुंदीने भारावून गेले आहे. एक उत्सव सामाजिक आणि भक्तिभावाने प्रेरित असलेला तर दुसरा म्हणजे पंचवार्षिक तमाशाचा फड असलेला.

लेखसंग्रह

अन्याय्य न्याय?

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 19/09/2004

‘उम्रे दराज मांग कर लाए थे चार दिन,
दो आरजू में कट गए, दो इंतजार में’
एका शायराची ही कैफियत, केवळ त्या शायरापुरती मर्यादित नाही. ही कैफियत प्रातिनिधीक आहे. ऊण्या-पुऱ्या चार दिवसाचे आयुष्य वाट्याला येते आणि त्यातले अर्धेअधिक वाट पाहण्यातच संपून जाते.

लेखसंग्रह

ठिणगी ते वडवानल!

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 10/10/2004

कोणत्याही मोठ्या घटनेची सुरुवात अगदी लहान कारणापासून होत असते. कधी-कधी ते कारण इतके लहान असते की त्याकडे सगळ्यांचेच हमखास दुलर्क्ष होते. या दुलर्क्षाची खरी किंमत मोजायची वेळ येते तेव्हा मात्र खूप उशीर झालेला असतो.

लेखसंग्रह

पाझर फुटलाच नाही!

Category:

 

प्रकाशन दिनांक :- 25/07/2004
‘राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशा’, सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या महाराष्ट्र भूमीचे हे वर्णन शब्दश: खरे ठरु पाहत आहे. निसर्गाची अवकृपा आणि शासन-प्रशासनाची बेफिकरी अशीच सुरु राहिली तर महाराष्ट्र देश निकट भविष्यातच केवळ दगडांची भूमी म्हणून ओळखल्या जाऊ लागला तर नवल नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने महाराष्ट्राला बसत आहे आणि त्यातही विदर्भ-मराठवाडा या भागाला तर निसर्गासोबतच शासनाच्या बेमुर्वतपणाचाही सामना करावा लागत आहे.