समज

आमच्या शेजारीचे दोन तरुण मित्र, भास्कर व अविनाष एका खोलीत रहात होते. सारखी विचारसरणी व स्वभाव. धर्मा बद्दल प्रचंड जागरुकता बाळगत होते. आपलाच धर्म …..



आमच्या शेजारीचे दोन तरुण मित्र, भास्कर व अविनाष एका खोलीत रहात होते. सारखी विचारसरणी व स्वभाव. धर्मा बद्दल प्रचंड जागरुकता बाळगत होते. आपलाच धर्म महान व श्रेष्ठ ही संकल्पना मनांत द्रढ झालेली जाणवत होती. तसा त्यांचा मित्र परिवार मोठा असल्याचे दिसून येत होते. कोणीही धर्माबद्दल वेडा वाकडा शब्द उच्चारला तर ते मिळून त्याच्यावर हल्ला करीत. धर्म रक्षण व देवाची सेवा हे जणू त्यांचे ब्रिद होते. सारे ज्ञान फक्त कुणाकडून ऐकलेले, वा साधारण पुस्तके वाचलेले. अनुभव संपन्नता त्यांत मुळीच नव्हती. कोणतेही धर्माचे ग्रंथ वा अध्यात्म यांचा अभ्यास नव्हता.

एकदा कुणीतरी चित्रकाराने देवीचे चित्र रंगवले. त्यांत त्याने देवीला माकडाच्या पाठीवर बसून जात असल्याचे दर्शविले. अर्थांत हे अत्यंत अयोग्य व विक्षीप्त होते. झाले ते चित्र बघतांच या दोन्ही मित्रांचे टाळके फिरले. त्यानी मित्रांचे टोळके जमवून ते भितीचित्र काढून फाडून टाकले. शिवाय त्या चित्रकाराचा मागवा घेत त्याची पिटायी पण केली. पोलिसांना त्यात लक्ष घालावे लागले.

आम्ही सोसायटीची मंडळी एकत्र जमून जवळच असलेल्या एक तिर्थक्षेत्री सहलीला गेलो होतो. आमच्या सोबत भास्कर व अविनाष दोघेही होते. सहल छान झाली. एक गोष्ट मात्र खूपच खटकली. तिर्थक्षेत्राजवळ एक मोठे कुंड होते. जे पाण्याने भरलेले होते. परंतु अनेक वर्षे त्या पाण्याला उपसाच नसल्यामुळे पाणि स्थिर झालेले होते. परिणामी अत्यंत दुर्गंदीयुक्त वाईट स्थितीत होते. सर्वानी फक्त ते पायावर घेतले. दोन थेंबे डोक्यावर शिंपडले. मात्र कुणीही ते तिर्थ म्हणून समजून प्राशन केल नाही. भास्कर व अविनाष यानी तर तिथे कुंडाच्या पाण्याला स्पर्श देखील केला नाही.

कोणत्या धार्मिक भानाना ते प्रभावित करु बघत होते. कोणत्या धार्मिक तत्वाना ते साथ देत होते. धार्मिक संकल्पने मधील कोणत्या अनिष्ठ गोष्टीवर आपली उर्जाशक्ती वापरुन त्यांत सुधारणा करुं इच्छीत होते. सत्य आणि मनातील विचार यांची सांगड कोणती, ह्याचा गंभीरपणे विचीरच केलेला जाणवत नाही. फक्त मलाच वाटते ते सत्य असावे. ह्या वैचारीक व भावनेंत गुंतलेली ही मंडळी. आणि अशीच विचारसरणी बाळगणारी व्यक्ती फक्त भावनिक लाटेत वाहात जातात.

वाईट व विक्षीप्त चित्रकला ही केंव्हाही निषीद्ध. ह्यास सर्वांचीच सहमती असेल. त्याला समजदारीने, विचारानीच विरोध केला पाहीजे. त्याच प्रमाणे जर ते तिर्थकुंड समजले गेले असेल तर त्याची स्वच्छता, उपसा, सभोवताल, ह्यावर खुप विचार व्हावा. कांही माणसे कुणीतरी धर्माची, देवाची थट्टा केली हा समज करुन घेऊन आग्रेसर होतात. तोडमोड करुन सामाजीक स्वास्थ बिघडवतात. जसे आमच्यातले भास्कर वा अविनाश. अशा ठिकाणी अशानी उर्जा खर्च करण्याची खरी गरज वाटते. कोणतेही धर्म स्थळ असो तेथे स्वच्छता, टापटीपपणा नैसर्गिक आकर्शकता, प्रसन्न वातावरण याचा खूप अभाव जाणवतो. अत्यंत दुर्भाग्य व निराशजनक बाब म्हणजे त्यांच्या व्यवस्थापनेकडे लक्ष्य देण्यास कुणासच फुरसत नसते. ह्याचे कारण देवत्वाविषयी गैरसमज व अज्ञान.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@mail.com

विवीध-अंगी ***१९
परक्यासमोर येताना निटनेटकेपणाची जाण तीव्रतेने असते
मनाचाही निर्मळपणा जर जपला तर ती आत्मोन्नती ठरते

— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर

Author