विश्वासाचा कडेलोट

लोहगडाच्या त्या कड्यावरून
आज फक्त एक देह कोसळला नाही,
कोसळला विश्वास,
कोसळली स्वप्नं,
आणि प्रेमाच्या नावावर उभं असलेलं
माणुसकीचं मंदिरही ढासळलं.

ज्याच्या हातात आयुष्यभराची साथ होती,
त्याच हातांनी जर अंधाराची वाट दाखवली,
तर जखम रक्ताची नसते,
ती आयुष्यभर वाहणाऱ्या वेदनेची असते.

तेव्हा मनात एकच प्रश्न उसळतो...

प्रेम जर शेवटी प्राणच हिरावून घेणार असेल,
तर अश्वत्थाम्यासारखं
युगानुयुगे एकटं भटकण्याचं दुःखही स्वीकारावं.
कारण एकटेपण जगायला शिकवतं,
पण विश्वासघात जगण्याचं कारणच हिरावून घेतो.

प्रेम म्हणजे मालकी नव्हे,
प्रेम म्हणजे समर्पण.
प्रेम म्हणजे संशय नव्हे,
प्रेम म्हणजे निस्सीम विश्वास.

जिथे विश्वासाचा कडेलोट होतो,
तिथे प्रेम आधीच मृत झालेलं असतं.
उरतात फक्त आठवणी,
आणि न भरून येणाऱ्या जखमा.

म्हणून प्रेम करा
पण इतकं निर्मळ,
की त्यातून कोणाचाही अंत नव्हे,
तर नव्या आयुष्याची पहाट जन्माला यावी.

कारण...
खरं प्रेम कोणाचा जीव घेत नाही,
ते शेवटच्या श्वासापर्यंत जगण्याचं बळ देतं.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212



लोहगडाच्या त्या कड्यावरून
आज फक्त एक देह कोसळला नाही,
कोसळला विश्वास,
कोसळली स्वप्नं,
आणि प्रेमाच्या नावावर उभं असलेलं
माणुसकीचं मंदिरही ढासळलं.

ज्याच्या हातात आयुष्यभराची साथ होती,
त्याच हातांनी जर अंधाराची वाट दाखवली,
तर जखम रक्ताची नसते,
ती आयुष्यभर वाहणाऱ्या वेदनेची असते.

तेव्हा मनात एकच प्रश्न उसळतो…

प्रेम जर शेवटी प्राणच हिरावून घेणार असेल,
तर अश्वत्थाम्यासारखं
युगानुयुगे एकटं भटकण्याचं दुःखही स्वीकारावं.
कारण एकटेपण जगायला शिकवतं,
पण विश्वासघात जगण्याचं कारणच हिरावून घेतो.

प्रेम म्हणजे मालकी नव्हे,
प्रेम म्हणजे समर्पण.
प्रेम म्हणजे संशय नव्हे,
प्रेम म्हणजे निस्सीम विश्वास.

जिथे विश्वासाचा कडेलोट होतो,
तिथे प्रेम आधीच मृत झालेलं असतं.
उरतात फक्त आठवणी,
आणि न भरून येणाऱ्या जखमा.

म्हणून प्रेम करा
पण इतकं निर्मळ,
की त्यातून कोणाचाही अंत नव्हे,
तर नव्या आयुष्याची पहाट जन्माला यावी.

कारण…
खरं प्रेम कोणाचा जीव घेत नाही,
ते शेवटच्या श्वासापर्यंत जगण्याचं बळ देतं.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212

Author