विद्या वाचस्पती अर्थात डॉक्टर शंकर अभ्यंकर

एखादा माणूस किती बुद्धिवान असू शकतो हे जर अनुभवायचे असेल तर श्री शंकर अभ्यंकर यांची प्रवचने आणि ग्रंथ संपदा अनुभवावी. प्रचंड स्मरणशक्ती , वाणीवर प्रभुत्व , ओघवती भाषा ,विनम्र निवेदन ,अनेक ग्रंथांचे ज्ञान , अतिशय सुस्पष्ट विचार हे श्री शंकर अभ्यंकर यांचे वैशिष्ठ आहे.

त्यांचे ग्रंथ घरात असणे, ते वाचणे हे तुमच्या घराचे वैभव असेल .मी प्रथम श्री शंकर अभ्यंकर यांची प्रवचनमाला ऐकली ती हनुमान व्यायाम शाळेच्या पटांगणात.त्यानंतर मी त्यांची अनेक प्रवचने ऐकली. त्यांच्या आदित्य प्रतिष्ठान’ या संस्थेतर्फे लोणावळ्याजवळ जगातील पहिले संत विद्यापीठ साकार झाले असून येथे देशातील प्रत्येक प्रांतातील संतवाङ्मयाचे जतन केले जाणार आहे. या ठिकाणी देशातील प्रत्येक प्रांताच्या संतवाङ्मयातील सुमारे दोन लाख ग्रंथांचे जतन करण्यात येणार आहे. तसेच संतवाङ्म्मयाविषयीची आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थाही उभारण्यात येणार आहे. बारावी इयत्तेनंतर संतवाङ्मयाचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम सुरू करण्याचाही संस्थेचा मानस आहे. या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत केले जाणार असून तो पूर्ण होण्यास सुमारे पाच वर्षे लागतील.

तुम्हाला जर घरी वाचन करायला वेळ मिळत नसेल तर तुमच्या कार मध्ये श्री शंकर अभ्यंकर यांच्या सी डि , एम पी ३ ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी केलेले व्याख्यान तुम्ही जर ऐकलेत तर मंत्रमुग्ध व्हाल .शिवरायांच्या आधीच्या अनेक पिढ्यांचा, सूर्यवंशी शिसोदिया राजपूत घराण्याचा इतिहास ऐकताना खूप आनंद होतो. शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याखानात ऐकलेला इतिहास पुन्हा शंकर अभ्यंकर यांच्या तोंडून ऐकताना इतिहासातील अनेक बारकावे लक्षात येतात. तुमच्या कार मध्ये त्यांची "छत्रपती शिवाजी महाराज "हि एम पी ३ जरूर ठेवा.तुमचा लांबचा प्रवास अत्यंत सुखकारक करण्याची क्षमता या एम पी ३ मध्ये आहे.

कोल्हापूरला श्री महालक्ष्मी च्या दर्शनाला जाताना मी कार मध्ये त्यांचे श्रीसूक्ता वरील प्रवचन ऐकतो. श्री सूक्त ऐकले कि मनातील गोंधळ कमी होण्यास खूप मदत होते. पुन्हा पुन्हा ऐकले तरी समाधान न होणारे त्यांचे विचार प्रत्तेक तरुणानी ऐकले पाहिजेत .

संतवाङ्मयाचा त्यांचा अभ्यास Analytical analysis करणारा आहे.समर्थ रामदास स्वामींवर बोलणारे श्री अभ्यंकर तुम्हाला त्यांच्या ज्ञान आणि विद्वत्ते समोर नतमस्तक होण्यास भाग पाडतात.

त्यांच्या प्रत्तेक भाषणात देशप्रेम तुम्ही अनुभवाल. भारत देशाबद्दल त्यांनी मांडलेले विचार त्यांच्या "भारतीय संस्कृती" वरील भाषणात तुम्हाला अंतर्मुख करतील .त्यांनी लिहिलेल्या भक्ति कोश या ५ प्रचंड ग्रंथात तुम्हाला भारतीय आचार्य , भारतीय सांप्रदाय ,भारतीय संत , भारतीय तीर्थ क्षेत्रे व मंदिरे आणि भारतीय उपासना या संबंधात प्रचंड माहिती मिळेल. त्यांचा प्रत्तेक ग्रंथ शेकडो पानांचा आहे.सुदैवाने माझ्या संग्रहात हे पाचही खंड आहेत.

त्यांचे विचार ऐकल्यावर मला प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज पुन्हा प्रगट झाले कि काय असे वाटत राहते. गेली ४ वर्षे मी त्यांचे विचार वाचतो आणि ऐकतो आहे. वयाचा विचार न करता ज्यांच्या पायाशी बसून ज्ञान मिळवावे अशी त्यांची योग्यता आहे. या नव्या वर्षात माझ्या या पोस्ट मुळे एका व्यक्तीने जरी त्यांचे साहित्य अनुभवले तरी मला खूप आनंद होईल .

चिंतामणी कारखानीस -



एखादा माणूस किती बुद्धिवान असू शकतो हे जर अनुभवायचे असेल तर श्री शंकर अभ्यंकर यांची प्रवचने आणि ग्रंथ संपदा अनुभवावी. प्रचंड स्मरणशक्ती , वाणीवर प्रभुत्व , ओघवती भाषा ,विनम्र निवेदन ,अनेक ग्रंथांचे ज्ञान , अतिशय सुस्पष्ट विचार हे श्री शंकर अभ्यंकर यांचे वैशिष्ठ आहे.

त्यांचे ग्रंथ घरात असणे, ते वाचणे हे तुमच्या घराचे वैभव असेल .मी प्रथम श्री शंकर अभ्यंकर यांची प्रवचनमाला ऐकली ती हनुमान व्यायाम शाळेच्या पटांगणात.त्यानंतर मी त्यांची अनेक प्रवचने ऐकली. त्यांच्या आदित्य प्रतिष्ठान’ या संस्थेतर्फे लोणावळ्याजवळ जगातील पहिले संत विद्यापीठ साकार झाले असून येथे देशातील प्रत्येक प्रांतातील संतवाङ्मयाचे जतन केले जाणार आहे. या ठिकाणी देशातील प्रत्येक प्रांताच्या संतवाङ्मयातील सुमारे दोन लाख ग्रंथांचे जतन करण्यात येणार आहे. तसेच संतवाङ्म्मयाविषयीची आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थाही उभारण्यात येणार आहे. बारावी इयत्तेनंतर संतवाङ्मयाचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम सुरू करण्याचाही संस्थेचा मानस आहे. या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत केले जाणार असून तो पूर्ण होण्यास सुमारे पाच वर्षे लागतील.

तुम्हाला जर घरी वाचन करायला वेळ मिळत नसेल तर तुमच्या कार मध्ये श्री शंकर अभ्यंकर यांच्या सी डि , एम पी ३ ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी केलेले व्याख्यान तुम्ही जर ऐकलेत तर मंत्रमुग्ध व्हाल .शिवरायांच्या आधीच्या अनेक पिढ्यांचा, सूर्यवंशी शिसोदिया राजपूत घराण्याचा इतिहास ऐकताना खूप आनंद होतो. शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याखानात ऐकलेला इतिहास पुन्हा शंकर अभ्यंकर यांच्या तोंडून ऐकताना इतिहासातील अनेक बारकावे लक्षात येतात. तुमच्या कार मध्ये त्यांची “छत्रपती शिवाजी महाराज “हि एम पी ३ जरूर ठेवा.तुमचा लांबचा प्रवास अत्यंत सुखकारक करण्याची क्षमता या एम पी ३ मध्ये आहे.

कोल्हापूरला श्री महालक्ष्मी च्या दर्शनाला जाताना मी कार मध्ये त्यांचे श्रीसूक्ता वरील प्रवचन ऐकतो. श्री सूक्त ऐकले कि मनातील गोंधळ कमी होण्यास खूप मदत होते. पुन्हा पुन्हा ऐकले तरी समाधान न होणारे त्यांचे विचार प्रत्तेक तरुणानी ऐकले पाहिजेत .

संतवाङ्मयाचा त्यांचा अभ्यास Analytical analysis करणारा आहे.समर्थ रामदास स्वामींवर बोलणारे श्री अभ्यंकर तुम्हाला त्यांच्या ज्ञान आणि विद्वत्ते समोर नतमस्तक होण्यास भाग पाडतात.

त्यांच्या प्रत्तेक भाषणात देशप्रेम तुम्ही अनुभवाल. भारत देशाबद्दल त्यांनी मांडलेले विचार त्यांच्या “भारतीय संस्कृती” वरील भाषणात तुम्हाला अंतर्मुख करतील .त्यांनी लिहिलेल्या भक्ति कोश या ५ प्रचंड ग्रंथात तुम्हाला भारतीय आचार्य , भारतीय सांप्रदाय ,भारतीय संत , भारतीय तीर्थ क्षेत्रे व मंदिरे आणि भारतीय उपासना या संबंधात प्रचंड माहिती मिळेल. त्यांचा प्रत्तेक ग्रंथ शेकडो पानांचा आहे.सुदैवाने माझ्या संग्रहात हे पाचही खंड आहेत.

त्यांचे विचार ऐकल्यावर मला प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज पुन्हा प्रगट झाले कि काय असे वाटत राहते. गेली ४ वर्षे मी त्यांचे विचार वाचतो आणि ऐकतो आहे. वयाचा विचार न करता ज्यांच्या पायाशी बसून ज्ञान मिळवावे अशी त्यांची योग्यता आहे. या नव्या वर्षात माझ्या या पोस्ट मुळे एका व्यक्तीने जरी त्यांचे साहित्य अनुभवले तरी मला खूप आनंद होईल .

चिंतामणी कारखानीस –

Author