वर्गणी

आपल्या देशात खास करून मुंबईसारख्या शहरात हा वर्गणी गोळा करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. एखाद्या चांगल्या कार्यासाठी वर्गणी गोळा करणे चुकीचे नाही पण ती उकलणे चुकीचेच आहे. सध्याची वर्गणी गोळा करण्याची जी प्रचलित पद्धत आहे ती अत्यंत चुकीचीच आहे. खरं म्ह्णजे कोणतीही वर्गणी ही इच्छिकच असायला हवी. ज्याची जेवढी ऐपत असेल आणि ज्याला देण शक्य असेल तो देईल. वर्गणी देण्यासाठी कोणावरही दबावतंत्रचा वापर करणे चुकीचेच आहे.



हल्ली चुकतात ठोके हृद्याचे
नाव ऐकताच कोणत्याही वर्गणीचे…

होते वर्गणी दिल्यामुळे भले
सदाच वर्गणी गोळा करणार्‍यांचे…

जास्तीची वर्गणी गोळा करणारेच
पुढे गिरवितात धडे राजकारणाचे…

आजकाल वर्गणीवरच होतात उभे
सुवर्ण महाल अलिशान कित्येकांचे…

या वर्गणीमुळेच पडतात मुडदे
काही शहरात अनेक तरूणांचे…

वर्गणी गोळा करता करता
कित्येकांस मिळते ज्ञान धंद्याचे…

पण वर्गणी गोळा करणारेही
आता शिकार ठरतात वर्गणीचे…

— निलेश बामणे

Author