त्याचे दोघांचे नेहमी
मस्त चालले असते,
कधीही भांडत नाहीत,
कधीही कुठलाही हेका नाही
सर्वाना कुतूहल वाटत असते
एकदा सहज त्याला विचारले
हसून म्हणाला कुणीतरी
एखादे पाऊल मागे घेले की झाले
सात पाऊले तर एकत्र असतो
असतो ना पुढे मागे…
मग त्यांनतर त्या
पाऊलाची चर्चा कशाला
हेच तर आम्हाला कळत नाही
पावला पावला वर
बदलणे आवश्यक आहे
निदान संसार नावाच्या
प्रवासात…
— सतीश चाफेकर.
Author
Post Views: 10