शून्यत्व
इ-पुस्तके

शून्यत्व

Category:

 

मी कोण आहे ‘ ह्याचा शोध घेताना माझ्यातला मी, माझ्याशी किती एकाग्र आहे हे पण बघणे आवश्यक आहे. एकाग्रता अत्यंत महत्वाची आहे.
तुमच्या मेंदू मधील कचरा जो तुम्हला सतत त्रास देत असतो तो डिलीट करता आला पाहिजे. पण तुम्ही हा कचरा साफ करताना आपण काय डिलीट करत आहोत याचेही भान हवे. कारण हे पण बघितले पाहिजे. आपण एखाद्या मानसिक आजारास निमंत्रण देत आहात का, ह्याबद्दलही विचार करणे आवश्यक आहे

विख्यात तालवाद्य वादक तौफिक कुरेशी
पॉडकास्ट

विख्यात तालवाद्य वादक तौफिक कुरेशी

Category:

 

विख्यात तालवाद्य वादक तौफिक कुरेशी, गीतिका वर्दे कुरेशी, शिखर नाद कुरेशी, फैजान हुसेन शेख, अफ्शा शेख
पद्मश्री उस्ताद अल्लारखॉं साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या आठवणींचा जागर करत आहेत..

अग्रलेखांचा दबदबा
लेखसंग्रह

अग्रलेखांचा दबदबा

Category:

 

२५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाली. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशीप आली. कोणतीही बातमी, लेख छापण्याच्या आधी तो मजकूर माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांना दाखवून मंजूर करून घेणे बंधनकारक झाले. जे अधिकारी वृत्तपत्रात सरकारचे लेख छापून यावेत म्हणून संपादकांच्या मागे पुढे अजिजी करायचे त्यांच्याकडेच जाऊन संपादकांना आपण उद्या जे काही छापणार आहोत ते तपासून घेण्याची वेळ आली. त्यामुळे वृत्तपत्रसृष्टीत त्यावेळी मोठा असंतोष निर्माण झाला. वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या या गळचेपीला विरोध कसा करायचा यावर संपादक आणि वृत्तपत्र मालकांमध्ये सखोल विचारमंथन झाले. त्यातून वेगवेगळे पर्याय समोर आले. वृत्तपत्रातील सर्वात महत्त्वाचे पान मानले जाते ते म्हणजे संपादकीय पान. त्या पानावर संपादकीय व विविध विषयांवर मते मांडणारे लेख व स्तंभ प्रकाशित होतात. त्या पानातून संबंधित वृत्तपत्राची विचारसरणी आणि भूमिका स्पष्ट होत असते.

आणीबाणी लागू झाल्यावर या संपादकीय पानांतून वृत्तपत्रांचे खरे स्वरूप स्पष्ट होऊ लागले. काही वृत्तपत्रांनी माध्यमांची ही मुस्कटदाबी निमूटपणे मान्य केली.कारण त्यांना त्यांचे वृत्तपत्र चालवायचे होते, त्यांच्या कर्मचाऱ्यांचे जीवन त्यावर अवलंबून होते. मात्र इंडियन एक्सप्रेस, स्टेट्समन, मराठवाडा यासारख्या काही मोजक्या दैनिकांनी अग्रलेखाची जागा कोरी सोडून बाणेदारपणा दाखविला. आमच्या विचारांवर तुम्ही बंधने घातली म्हणून आम्ही आमचे विचार ज्या जागेवर मांडतो ती जागाच कोरी सोडत आहोत अशी ती अव्यक्त निषेधाची भूमिका होती. त्याची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली. हा एकच प्रसंग वृत्तपत्रांच्या आयुष्यात ‘अग्रेलखा’ चे महत्त्व किती आहे सांगण्यास पुरेसा ठरावा. या अनोख्या निषेधाची नोंद जगाने घेतली. अग्रलेखाची ती कोरी जागा, आणीबाणीच्या विरोधातील जनतेच्या मनातील आक्रोशाची अभिव्यक्ती ठरली.