शहरे आणि गावे

रायगड जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

थळ-वायशेत येथे राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स हा सार्वजनिक क्षेत्रातील खत-प्रकल्प कार्यरत आहे. पनवेल तालुक्यात रसायनी येथे हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स हा प्राथमिक रसायने तयार करण्याचा प्रकल्प असून येथे मोठ्या प्रमाणावर प्रतिजैविकांची (अँटीबायोटिक्स) निर्मिती केली जाते.

शहरे आणि गावे

हिंगोली जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

हिंगोली जिल्ह्यात व कळमनुरी येथे सहकारी तत्त्वावरील औद्योगिक वसाहती आहेत. हिंगोली येथे इंदिरा सहकारी साखर करखाना, वसमत तालुक्यात पूर्णा सहकारी साखर करखाना, कळमनुरी तालुक्यात डोंगरकडा येथील साखर कारखाना तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील बाराशिव हनुमान सहकारी साखर कारखाना असे मिळून ४ साखर कारखाने आहेत.

शहरे आणि गावे

धुळे जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

धुळ्यामधून मुंबई – आग्रा (राष्ट्रीय महामार्ग क्र. ३) व हाजीरा-धुळे-कोलकत्ता (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६) हे महामार्ग जातात. भुसावळ – शिंदखेडा – नंदूरबार – सूरत हा लोहमार्ग जिल्ह्यातून जातो.

शहरे आणि गावे

नाशिक जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

रामायण काळात जिल्ह्याचा परिसर एक ठळक स्थान होता. कारण वनवासात असताना श्रीराम,लक्ष्मण व सीतामाई हे त्रिकूट या परिसरात निवासाला होते असे मानले जाते. रावणाची बहीण शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापल्याने या शहराला नाशिक असे नाव पडल्याचे (नाक-नासिका-नाशिक या संगतीने) सांगितले जाते.

शहरे आणि गावे

परभणी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

गौतम ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही परभणी भूमी गौतमी नदीचा उगम येथेच झालेला आहे.गंगाखेड हे गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन धार्मिक क्षेत्र आहे. या ठिकाणी नदीच्या काठावर व गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. येथे संत जनाबाईंची समाधी आहे. येथे तीनशे वर्षांपूर्वी संत आनंदस्वामी यांनी स्थापन केलेले बालाजीचे मंदिर असून बालाजीची वाळूची मूर्ती आहे.

शहरे आणि गावे

हिंगोली जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

नांदेड-अकोला, परभणी-यवतमाळ व जिंतूर-नांदेड हे महत्त्वाचे राज्यमार्ग (रस्ते)हिंगोली जिल्ह्यातनं जात असून जिल्ह्याच्या मध्यभागातून अकोला-पूर्णा हा लोहमार्ग जातो.

शहरे आणि गावे

धुळे जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी – मराठी विश्वकोशाचे संस्थापक. त्यांची मुख्य ओळख कोशकार, साहित्यिक आणि प्राच्यविद्या पंडित अशी करून देता येईल. त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर इथे झाला. महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे ते वीस वर्षे अध्यक्ष होते.

शहरे आणि गावे

नाशिक जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला धुळे; पूर्वेला जळगाव; आग्नेयेला औरंगाबाद, दक्षिणेला अहमदनगर, पश्चिमेला ठाणे, आणि वायव्येला डांग व सुरत (गुजरात) असे जिल्हे वसलेले आहेत. नाशिक जिल्हा हा तापी व गोदावरीच्या खोर्‍यात उत्तर महाराष्ट्रात वसला आहे.

शहरे आणि गावे

परभणी जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

शैक्षणिकदृष्ट्या परभणी जिल्हा हा नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अखत्यारीत येत असुन, या विद्यापीठा अंतर्गत जिल्ह्यात एकूण २६ विविध प्रकारची महाविद्यालये आहेत. तसंच १९७२ मध्ये स्थापन झालेल्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मुख्यालय परभणी येथे आहे.

शहरे आणि गावे

रत्नागिरी जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

समुद्र किनारी असणारा रत्नदुर्ग अथवा भगवती किल्ला बहामनी काळापासून अस्तित्वात आहे. आजच्या खुद्द रत्नागिरी शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत पण त्याही जास्तीत जास्त दोन-अडीचशे वर्षांच्याच असतील.रत्नागिरी शहराची वसाहत प्रामुख्याने ब्रिटिश कालखंडात म्हणजे १८२२ नंतर वसलेली आहे. किल्ले रत्नागिरी, पेठ, शिवापूर, मौजे झाडगाव आणि मौजे रहाटघर ही चार ठिकाणे एकत्रित करून ब्रिटिशांनी त्यास रत्नागिरी भागाचा दर्जा दिला व नंतर ते जिल्ह्याचे ठिकाण बनले.