आम्र यज्ञ
Category:
साहित्य - ललितगुडी पाडवा आणि अक्षय तृतीया हे सण घराघरात हा साजरे करतो, ज्यांना देवगड चा रुबाब परवडत नाही, त्यांच्यासाठी रत्नागिरी हापूस असतो. तो हि खिशाला जड वाटला तर कर्नाटकी, पायरी इत्यादी चुलत-मावस भावंडे तृप्तीचा ढेकर सोबत घेऊन येतातच. जसे गणरायाचे दर्शन वेगवेगळ्या रुपात, भावमुद्रात होते तसेच हा कोकणचा राजा रोज वेगवेगळ्या रंग रुपात आम्हाला भेटत रहातो…..