गरज नेटीझन वॉरिअर्स बनण्याची
Category:
अवर्गिकृतआता भारताला सीमेवरून होणाऱ्या परकीय आक्रमणाबरोबरच इंटरनेट आणि सोशल साईट्सच्या माध्यमातून होणाऱ्या हल्ल्यावरती गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सायबर क्राईम मधील कायद्याच्या अंमलबजावणी कडे सरकारने लक्ष देणे ही काळाची गरज झाली आहे. आता यापुढे होणारे हल्ले हे इंटरनेटच्या माध्यमातून देखील होऊ शकतात याची ताजी झुळूक लागलेल्या भारताने या घटनेतून आज वेळीच शिकून शहाणे होण्याची गरज आहे. पर्यायाने आपण सर्व नेटीझन, इंटरनेट आणि सोशल साईट्स हाताळताना जागरूक राहणे सुरक्षित भारतासाठी गरजेचे आहे.