शहरे आणि गावे

परभणी जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

परभणी हा शेतीप्रधान जिल्हा आहे. निव्वळ लागवडीखालील क्षेत्र ४ लाख  ८९ हजार ५०० हेक्टर्स असून,त्यापैकी जिरायती क्षेत्र ३ लाख ९९ हजार ४०० हेक्टर्स , तर बागायत क्षेत्र ९० हजार १०० हेक्टर्स एवढे आहे.

शहरे आणि गावे

परभणी जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

संत जनाबाईंचे वास्तव्य काही काळ गंगाखेड येथे होते.श्री. विनायकराव चारठाणकरांनी निजामाविरुध्द लढून हैद्राबाद मुक्तीसंग्रामासाठी अथक प्रयत्न केले होते.

शहरे आणि गावे

परभणी जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

शैक्षणिकदृष्ट्या परभणी जिल्हा हा नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अखत्यारीत येत असुन, या विद्यापीठा अंतर्गत जिल्ह्यात एकूण २६ विविध प्रकारची महाविद्यालये आहेत. तसंच १९७२ मध्ये स्थापन झालेल्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मुख्यालय परभणी येथे आहे.

शहरे आणि गावे

परभणी जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागाच्या अखत्यारीत येतो.परभणीला पूर्वी प्रभावतीनगर असे म्हटलं जात असे.

शहरे आणि गावे

परभणी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

गौतम ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही परभणी भूमी गौतमी नदीचा उगम येथेच झालेला आहे.गंगाखेड हे गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन धार्मिक क्षेत्र आहे. या ठिकाणी नदीच्या काठावर व गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. येथे संत जनाबाईंची समाधी आहे. येथे तीनशे वर्षांपूर्वी संत आनंदस्वामी यांनी स्थापन केलेले बालाजीचे मंदिर असून बालाजीची वाळूची मूर्ती आहे.

शहरे आणि गावे

परभणी जिल्ह्यातील दळणवळणाच्या सोयी

Category:

 

मनमाड-काचीगुडा लोहमार्गावरील परभणी हे महत्त्वाचे स्थानक असून १८९९-१९०० या काळात हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला.

शहरे आणि गावे

परभणी जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

परभणी जिल्ह्यात गोदावरी दुधना सहकारी साखर कारखाना व नृसिंह सहकारी साखर कारखाने असुन,येथे प्रभावती सूत गिरणी,जिनिंग-प्रेसिंगचा उद्योग, डाळमील, खताचा कारखाना व सिमेंटचे खांब बनवण्याचे कारखाने ही आहेत.

शहरे आणि गावे

परभणी जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

अगस्ती ऋषी विंध्य पर्वत ओलांडून आल्यानंतर त्यांनी आपला आश्रम गोदावरीकाठी बांधला. त्यानंतर अनेक ऋषी-मुनी या भागात आले. मुद्गल ऋषींच्या तपश्र्चर्येने पावन झालेले मुद्गल हे गाव, गोदावरी नदीचा किनारा, वाल्मिकी ऋषींमुळे पावन झालेले वालूर (सेलू) व पांडवांपैकी पार्थाने (अर्जुनाने) वसविलेले पाथरी(पार्थपूर)-अशा परभणी जिल्ह्यातील भागांचे उल्लेख पुराणात आहेत.

शहरे आणि गावे

नाशिक जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

बाजरी हे येथील प्रमुख पीक असून येथे द्राक्षे, कांदा, ऊस व डाळींबाचे पीकदेखील मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. निफाड व लासलगाव या कांद्याच्या प्रमुख व मोठ्या बाजारपेठा आहेत.

शहरे आणि गावे

नाशिक जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

हिंदुस्थानात संस्थात्मक जीवनाचा व सनदशीर राजकारणाचा पाया घालणारे न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाडचा होय. भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके, ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि दलित मुक्तीसाठी लढणारे दादासाहेब गायकवाड हे सगळे विविध क्षेत्रांतील दिग्गज नाशिक जिल्ह्याच्या भूमीतले होते.