फाटलेलं कापड सुई-दोऱ्याने सहज शिवता येतं,
पण फाटलेलं नातं मात्र इतकं सहज जुळत नाही.
सुई प्रत्येक टाका घेताना स्वतः टोचणी सहन करते,
आणि दोरा मुकपणे प्रत्येक फट अलगद भरून काढत राहतो.
नात्यांनाही अशीच एक सुई हवी असते
चुकांची टोचणी स्वीकारणारी,
आणि असा एक दोरा
विश्वासाचा, प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा.
रागाच्या एका क्षणात नाती तुटतात,
पण ती पुन्हा जोडण्यासाठी
संयमाचे असंख्य टाके घालावे लागतात.
शिवलेलं कापड पुन्हा वापरता येतं,
पण शिवणांच्या खुणा कायम राहतात.
नात्यांचंही तसंच असतं…
माफ करता येतं,
पण मनावर उमटलेले ओरखडे सहज पुसले जात नाहीत.
म्हणून शब्द जपून बोला,
अहंकाराला थोडं दूर ठेवा.
कारण सुई-दोरा बाजारात सहज मिळतो,
पण मनापासून जपलेली नाती
पुन्हा पुन्हा मिळत नाहीत.
सुईची टोचणी क्षणभराची असते,
पण तुटलेल्या विश्वासाची वेदना आयुष्यभराची असते.
म्हणून…
नाती शिवताना सुईची टोचणी लागली तरी चालेल,
फक्त विश्वासाचा दोरा कधी तुटू देऊ नका.
कारण दोरा तुटला की,
नाती पुन्हा जुळली तरी
मनाच्या घडीत एक शिवण कायमची राहते…
*नाती जपणं म्हणजे जिंकणं नव्हे,
तर प्रत्येक वेळी थोडंसं स्वतःला विसरून
एकमेकांना पुन्हा पुन्हा स्वीकारणं होय.*
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212