श्रीराम कामत

कामत, श्रीराम

जीवनभर जगातील महनीय व्यक्तींची जीवनचरित्रे लिहून त्यांचे संकलित रूप कोशाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्याचा ध्यास घेतलेल्या श्रीराम कामत यांचेही चरित्र समजून घेण्यासारखे आहे. जगातील अनेक नामवंतांना सतत भेटत राहिलेल्या कामतांनी त्यांची चरित्रे संकलित स्वरूपात प्रकाशात आणण्याचा संकल्प वयाच्या चाळिशीत केला. मराठीतून विश्वचरित्रकोश निर्माण करण्याची ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी कमालीची जिद्द आणि चिकाटी यांची गरज होती.

पत्रकारितेचा अनुभव असलेल्या श्रीराम कामतांनी ही जिद्द आणि चिकाटी दाखवून आपल्या या संकल्पाला मूर्त रूप दिले. त्यांच्या या अभिनव कोशाचे पाच खंड प्रकाशित झाले आहेत आणि त्यांचे हे काम आता जगापुढे आले आहे. कविवर्य बा. भ. बोरकर यांचे कामत हे जावई. त्यामुळे साहित्यिकांचा सहवास त्यांना मिळणे स्वाभाविक होते. आपण स्वत: लेखक होण्यापेक्षा लेखकांचीच चरित्रे लिहिण्याचे त्यांनी योजले. गाठीला ‘गोमंतक’ या दैनिकातील नोकरीचा अनुभव होता. पत्रकारितेतील तात्पुरत्या साहित्यात रमण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता आणि लिहिण्याची तर हौस होती. कामतांनी मग स्वत:च ‘मांडवी’ नावाचे मासिक सुरू केले. साहित्य, कला, राजकारण, समाजकारण अशा सगळय़ाच विषयांना प्राधान्य देणाऱ्या या मासिकाचा लौकिक चांगला राहिला, याचे कारण त्यामागे कामतांची दृष्टी होती. मासिकाच्या जोडीला त्यांनी ज्या कामासाठी आपल्या आयुष्यातील उणीपुरी अडतीस वर्षे खर्ची घातली, त्या विश्वचरित्रकोशाचे काम वेगाने होण्यासारखे नव्हतेच. कविवर्य बोरकर यांचे मार्गदर्शन आणि मदत त्यांना मिळत असली, तरीही अशा कोशाच्या कामात आवश्यक असणारी पायपीट कामतांनाच करावी लागत होती. हे काम त्यांनी स्वेच्छेने स्वीकारलेले असल्याने त्यामुळे होणारी ओढगस्त क्वचित त्यांना सुखाचीच वाटत असावी. कामतांचा स्वभाव अतिशय लाघवी आणि सगळय़ांशी जमवून घेणारा. त्यामुळे या कामात त्यांना मित्र आणि हितचिंतक यांचे मोठे सहकार्य लाभले. पैसे उभे करणे आणि अशा कामात सगळय़ांचे सहकार्य मिळवणे यासाठी आवश्यक असणारा मनमिळाऊपणा कामतांकडे होता, म्हणूनच तर विश्वचरित्रकोशाचे पाच खंड प्रकाशित होऊ शकले. कामत यांना गोव्याच्या गोमंतक मराठी अकादमीने कालिदास पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. याच अकादमीचे ते फेलोही होते. आपल्या मतांबद्दल ते नेहमीच आग्रही असत. मराठी ही गोव्याची सांस्कृतिक भाषा असून तिच्यामुळेच परकीय सत्तेच्या काळात गोव्याचे व्यक्तिगत आणि राष्ट्रीय अस्तित्व टिकून राहू शकले, असे त्यांचे मत होते. मराठी साहित्यात कोशवाङ्मयाचे दालन अनेकांनी समृद्ध केले आहे. श्रीधर व्यंकटेश केतकरांपासून ही परंपरा अधिक देदीप्यमान झाली. केतकरांनी तयार केलेले कोश वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी खाल्लेल्या खस्ता ऐकल्यानंतर कुणाही मराठी सुसंस्कृत आणि सुजाण माणसाची मान लज्जेने खाली जाईल. घरोघरी जाऊन आपल्या कोशाची विक्री करणाऱ्या केतकरांनी केलेल्या प्रयत्नांच्या खांद्यावर श्रीराम कामत यांना आणि त्यांच्या आधीच्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महादेवशास्त्री जोशी यांच्यासारख्या दिग्गजांना उभे राहता आले. मराठी माणसाला कोश साहित्याचे महत्त्व कळायला लावण्यात या सगळय़ांचा फार मोठा हातभार आहे, यात शंकाच नाही. कामत यांनी या सगळय़ामध्ये अगदी वेगळे आणि महत्त्वाचे काम केले आहे. जगावर प्रभाव टाकणाऱ्या आणि ज्यांच्या चरित्रातून नव्या पिढीला जगण्याचे इंधन मिळू शकेल, अशा व्यक्तींचे चरित्र, त्यातील बारकाव्यांसह तयार करणे हेच काम फार मोठे आहे. अशा अनेकांच्या चरित्रांचा विश्वकोश तयार करण्याचे शिवधनुष्य श्रीराम कामत यांनी केवळ उचलण्याचे धाडस केले नाही, तर ते समर्थपणे पेलूनही दाखवले. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत असताना, त्यांच्या या कार्याचा दीपस्तंभ यापुढेही सगळय़ांना दिशा दाखवत राहील, असा विश्वासही व्यक्त करायला हवा.

-------------------------------------------------------------------

विश्वचरित्रकोशकार श्रीराम कामत

मराठी विश्वचरित्रकोशकार श्रीराम पांडुरंग कामत

एक जिद्दी वाङमय अभ्यासक-----

कामत यांच्या विश्वचरित्रकोशाचे पाच खंड प्रकाशित झाले असून सहाव्या खंडाचे काम चालू होते.

दिवंगत कवी बा.भ. बोरकर यांचे ते जावई

कामत यांचा जन्म १७ मे १९३४ रोजी अस्नोडा येथे झाला. सुरुवातीच्या काळात त्यांनी “मांडवी” हे मासिक सुरु केले. कामत यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा “साहित्य विशारद” पुरस्कार मिळाला आहे. २००८ साली गोमांतक साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन गोवा सरकारने यंदा त्यांची पदमसाठीही शिफारस केली होती.



कामत, श्रीराम

जीवनभर जगातील महनीय व्यक्तींची जीवनचरित्रे लिहून त्यांचे संकलित रूप कोशाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्याचा ध्यास घेतलेल्या श्रीराम कामत यांचेही चरित्र समजून घेण्यासारखे आहे. जगातील अनेक नामवंतांना सतत भेटत राहिलेल्या कामतांनी त्यांची चरित्रे संकलित स्वरूपात प्रकाशात आणण्याचा संकल्प वयाच्या चाळिशीत केला. मराठीतून विश्वचरित्रकोश निर्माण करण्याची ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी कमालीची जिद्द आणि चिकाटी यांची गरज होती.

पत्रकारितेचा अनुभव असलेल्या श्रीराम कामतांनी ही जिद्द आणि चिकाटी दाखवून आपल्या या संकल्पाला मूर्त रूप दिले. त्यांच्या या अभिनव कोशाचे पाच खंड प्रकाशित झाले आहेत आणि त्यांचे हे काम आता जगापुढे आले आहे. कविवर्य बा. भ. बोरकर यांचे कामत हे जावई. त्यामुळे साहित्यिकांचा सहवास त्यांना मिळणे स्वाभाविक होते. आपण स्वत: लेखक होण्यापेक्षा लेखकांचीच चरित्रे लिहिण्याचे त्यांनी योजले. गाठीला ‘गोमंतक’ या दैनिकातील नोकरीचा अनुभव होता. पत्रकारितेतील तात्पुरत्या साहित्यात रमण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता आणि लिहिण्याची तर हौस होती. कामतांनी मग स्वत:च ‘मांडवी’ नावाचे मासिक सुरू केले. साहित्य, कला, राजकारण, समाजकारण अशा सगळय़ाच विषयांना प्राधान्य देणाऱ्या या मासिकाचा लौकिक चांगला राहिला, याचे कारण त्यामागे कामतांची दृष्टी होती. मासिकाच्या जोडीला त्यांनी ज्या कामासाठी आपल्या आयुष्यातील उणीपुरी अडतीस वर्षे खर्ची घातली, त्या विश्वचरित्रकोशाचे काम वेगाने होण्यासारखे नव्हतेच. कविवर्य बोरकर यांचे मार्गदर्शन आणि मदत त्यांना मिळत असली, तरीही अशा कोशाच्या कामात आवश्यक असणारी पायपीट कामतांनाच करावी लागत होती. हे काम त्यांनी स्वेच्छेने स्वीकारलेले असल्याने त्यामुळे होणारी ओढगस्त क्वचित त्यांना सुखाचीच वाटत असावी. कामतांचा स्वभाव अतिशय लाघवी आणि सगळय़ांशी जमवून घेणारा. त्यामुळे या कामात त्यांना मित्र आणि हितचिंतक यांचे मोठे सहकार्य लाभले. पैसे उभे करणे आणि अशा कामात सगळय़ांचे सहकार्य मिळवणे यासाठी आवश्यक असणारा मनमिळाऊपणा कामतांकडे होता, म्हणूनच तर विश्वचरित्रकोशाचे पाच खंड प्रकाशित होऊ शकले. कामत यांना गोव्याच्या गोमंतक मराठी अकादमीने कालिदास पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. याच अकादमीचे ते फेलोही होते. आपल्या मतांबद्दल ते नेहमीच आग्रही असत. मराठी ही गोव्याची सांस्कृतिक भाषा असून तिच्यामुळेच परकीय सत्तेच्या काळात गोव्याचे व्यक्तिगत आणि राष्ट्रीय अस्तित्व टिकून राहू शकले, असे त्यांचे मत होते. मराठी साहित्यात कोशवाङ्मयाचे दालन अनेकांनी समृद्ध केले आहे. श्रीधर व्यंकटेश केतकरांपासून ही परंपरा अधिक देदीप्यमान झाली. केतकरांनी तयार केलेले कोश वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी खाल्लेल्या खस्ता ऐकल्यानंतर कुणाही मराठी सुसंस्कृत आणि सुजाण माणसाची मान लज्जेने खाली जाईल. घरोघरी जाऊन आपल्या कोशाची विक्री करणाऱ्या केतकरांनी केलेल्या प्रयत्नांच्या खांद्यावर श्रीराम कामत यांना आणि त्यांच्या आधीच्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महादेवशास्त्री जोशी यांच्यासारख्या दिग्गजांना उभे राहता आले. मराठी माणसाला कोश साहित्याचे महत्त्व कळायला लावण्यात या सगळय़ांचा फार मोठा हातभार आहे, यात शंकाच नाही. कामत यांनी या सगळय़ामध्ये अगदी वेगळे आणि महत्त्वाचे काम केले आहे. जगावर प्रभाव टाकणाऱ्या आणि ज्यांच्या चरित्रातून नव्या पिढीला जगण्याचे इंधन मिळू शकेल, अशा व्यक्तींचे चरित्र, त्यातील बारकाव्यांसह तयार करणे हेच काम फार मोठे आहे. अशा अनेकांच्या चरित्रांचा विश्वकोश तयार करण्याचे शिवधनुष्य श्रीराम कामत यांनी केवळ उचलण्याचे धाडस केले नाही, तर ते समर्थपणे पेलूनही दाखवले. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत असताना, त्यांच्या या कार्याचा दीपस्तंभ यापुढेही सगळय़ांना दिशा दाखवत राहील, असा विश्वासही व्यक्त करायला हवा.

——————————————————————-

विश्वचरित्रकोशकार श्रीराम कामत

मराठी विश्वचरित्रकोशकार श्रीराम पांडुरंग कामत

एक जिद्दी वाङमय अभ्यासक—–

कामत यांच्या विश्वचरित्रकोशाचे पाच खंड प्रकाशित झाले असून सहाव्या खंडाचे काम चालू होते.

दिवंगत कवी बा.भ. बोरकर यांचे ते जावई

कामत यांचा जन्म १७ मे १९३४ रोजी अस्नोडा येथे झाला. सुरुवातीच्या काळात त्यांनी “मांडवी” हे मासिक सुरु केले. कामत यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा “साहित्य विशारद” पुरस्कार मिळाला आहे. २००८ साली गोमांतक साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन गोवा सरकारने यंदा त्यांची पदमसाठीही शिफारस केली होती.

Author