तो जेवण करत नाही,
तो आठवणी तयार करतो.
जिथे शब्द फिकट होतात,
तिथे चवीतून कथा बोलतात.
आचेवर ठेवलेलं भांडं
हळूहळू उकळत राहतं,
तसंच काहीतरी
त्याच्या आतही शिजत राहतं.
तो शब्द न वापरता सांगतो,
प्रेम आणि आठवणी हळू हळू गुंतत जातात.
चवीत मिसळलेले प्रेम,
शब्द न बोलता हसतं, रडतं, जिवंत राहतं.
लोक येतात, खातात,
“खूप छान आहे” म्हणतात,
पण कुणी विचारत नाही
तो इतका शांत का आहे?
तो न बोलता बरंच काही सांगतो,
ताटात मिसळलेल्या प्रेमाने,
जगण्यात गोडवा येतो,
आणि
शांततेच्या तृप्ततेची अनुभूती मिळते.
कारण त्याला समजलंय,
येथे भावना शब्द नसतात,
त्या चवीत मिसळून,
लोकांच्या हृदयात जिवंत राहतात..
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212