कालपर्यंत
पावसाच्या एका सरीसाठी
डोळे आभाळाकडे लागले होते.
आज मात्र त्याच सरींच्या रौद्र रूपाने
मनात भीतीचं वादळ उठलं आहे.
आयुष्य इतकंच शिकवतं
अभाव दुःख देतो,
पण अतिरेकही सुख हिरावून घेतो.
जिथे “पुरेसं” थांबतं,
तिथेच समाधान फुलतं.
जिथे हव्यास वाढतो,
तिथे आनंद हरवत जातो.
भाकरी पुरेशी असेल,
तर ती अमृताहून गोड लागते.
छप्पर पुरेसं असेल,
तर पावसाचं गाणंसुद्धा मधुर वाटतं.
श्रीमंती म्हणजे
अफाट संपत्ती नव्हे.
“आहे ते पुरेसं आहे,”
असं मनापासून म्हणता येणं
हीच माणसाची खरी श्रीमंती आहे.
कारण…
अति पाऊस पूर आणतो,
अति ऊन दुष्काळ घडवतो.
निसर्ग असो वा आयुष्य
“पुरेसं” हाच सुखाचा खरा समतोल असतो.
ज्याला पुरेसं कळलं,
त्याला समाधान लाभलं.
आणि ज्याला समाधान लाभलं,
त्याच्यापेक्षा श्रीमंत या जगात दुसरं कोणी नाही.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212