कुणीतरी आवडणे हे प्रेम नाही,
त्याच्याशिवाय दुसरं कोणीच न आवडणे हेच खरं प्रेम आहे.
नुसत्या नजरा भिडल्या म्हणून प्रेम होत नाही,
मनाने मनाला अलगद स्पर्श केला की प्रेम फुलतं.
रोज हजारो चेहरे समोरून जातात,
पण एकच चेहरा डोळ्यांत कायमचा विसावतो.
असंख्य आवाज कानावर येतात,
पण एकाच हाकेने हृदय धडधडू लागतं.
अंतर कितीही वाढलं तरी,
आठवणींचा धागा कधी तुटत नाही.
वेळ कितीही बदलली तरी,
मनातील ओढ कधी कमी होत नाही.
रागातही काळजी असते,
अबोलपणातही प्रेम दडलं असतं.
स्वार्थाच्या पलीकडे जपणं,
प्रत्येक दुःखात खंबीरपणे सोबत उभं राहणं,
आणि प्रत्येक श्वासात तिची चाहूल लागणं,
यालाच खरं प्रेम म्हणतात.
कारण...
प्रेम म्हणजे फक्त "मी तुझ्यावर प्रेम करतो" एवढंच नसतं,
प्रेम म्हणजे "तू आनंदी असावीस" ही मनापासूनची प्रार्थना असते.
म्हणूनच...
कुणीतरी आवडणे हे प्रेम नाही,
त्याच्याशिवाय दुसरं कोणीच न आवडणे हेच खरं प्रेम आहे.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
कुणीतरी आवडणे हे प्रेम नाही,
त्याच्याशिवाय दुसरं कोणीच न आवडणे हेच खरं प्रेम आहे.
नुसत्या नजरा भिडल्या म्हणून प्रेम होत नाही,
मनाने मनाला अलगद स्पर्श केला की प्रेम फुलतं.
रोज हजारो चेहरे समोरून जातात,
पण एकच चेहरा डोळ्यांत कायमचा विसावतो.
असंख्य आवाज कानावर येतात,
पण एकाच हाकेने हृदय धडधडू लागतं.
अंतर कितीही वाढलं तरी,
आठवणींचा धागा कधी तुटत नाही.
वेळ कितीही बदलली तरी,
मनातील ओढ कधी कमी होत नाही.
रागातही काळजी असते,
अबोलपणातही प्रेम दडलं असतं.
स्वार्थाच्या पलीकडे जपणं,
प्रत्येक दुःखात खंबीरपणे सोबत उभं राहणं,
आणि प्रत्येक श्वासात तिची चाहूल लागणं,
यालाच खरं प्रेम म्हणतात.
कारण…
प्रेम म्हणजे फक्त “मी तुझ्यावर प्रेम करतो” एवढंच नसतं,
प्रेम म्हणजे “तू आनंदी असावीस” ही मनापासूनची प्रार्थना असते.
म्हणूनच…
कुणीतरी आवडणे हे प्रेम नाही,
त्याच्याशिवाय दुसरं कोणीच न आवडणे हेच खरं प्रेम आहे.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212