एम. एल. टहलियानी

व्यक्तिवेध : एम. एल. टहलियानी
शुक्रवार, ७ मे २०१०

२६/११ चा खटला हा कसाबमुळे जसा लक्षात राहणार आहे तसाच तो, हा खटला चालविणारे विशेष न्यायालयाचे निर्भीड न्यायाधीश एम. एल. अर्थात मदन लक्ष्मणदास टहलियानी यांच्यामुळेही लक्षात राहणार आहे. खटल्याच्या निकालपत्रावर टहलियानी यांची खास छाप पाहायला मिळते. विशेषत: दोन महत्त्वाच्या बाबींमध्ये. अनलॉफुल अ‍ॅक्टिविटीज अ‍ॅक्टच्या कलम१६ अन्वयेदेखील कसाबला मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते, असा युक्तिवाद करण्यास विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम विसरले होते. हा मुद्दा स्वत टहलियानी यांनी लक्षात आणून दिला. केवळ युक्तिवादावर निर्णय न देता, कायद्याचा सारासार विचार करून निर्णय देणारा न्यायाधीश आदर्श मानला जातो. शिवाय कंदहार प्रकरणाचा उल्लेखही न्यायाधीश टहलियानी यांनी केला. त्या वेळेस मौलाना मसूद याला दहशतवाद्यांच्या ताब्यात देऊन त्यांनी ओलीस ठेवलेल्या देशवासीयांची सुटका करावी लागली होती. कसाबला फाशी दिल्यास अशा प्रकारच्या मानहानीकारक प्रसंगाला देशाला भविष्यात सामोरे जावे लागणार नाही; अर्थात त्याला फाशी देण्याशिवाय पर्याय नाही, असा महत्त्वपूर्ण उल्लेख टहलियानी यांनी केला. या दोन्ही महत्त्वाच्या बाबींच्या निमित्ताने टहलियानी यांनी आदर्शाचा एक नवा पायंडाच न्यायदानाच्या क्षेत्रात घालून दिला आहे. टहलियानी यांचे घराणे मूळचे राजस्थानातील. रोजगाराच्या निमित्ताने महाराष्ट्रात आल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्य़ातील मूल येथे ते स्थायिक झाले. न्या. टहलियानी यांचा जन्म मात्र राजस्थानातला. नागपूर येथे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून नागपूर विद्यापीठातूनच त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली. गोंदिया येथे वकिलीची एक वर्षांची उमेदवारी केल्यावर ते चंद्रपूरला गेले. नामवंत वकील दादासाहेब देशकर यांच्या हाताखाली त्यांनी वकिलीचे धडे गिरवले. गडचिरोली, वडसा, सिरोंचा इत्यादी ठिकाणी सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिले. नंतर मुंबईमध्ये महानगर दंडाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. वांद्रे न्यायालयापासून त्यांनी सुरुवात केली. अतिरिक्त प्रधान न्यायाधीश म्हणून काम करत असतानाच कसाबच्या खटल्यासाठी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झाली. यापूर्वी सीबीआयचे अनेक खटले त्यांच्यासमोर चालले. त्याचप्रमाणे कॅसेटकिंग गुलशन कुमार हत्या आणि कामगार नेते दत्ता सामंत हत्या या खटल्यांचीही सुनावणी न्या. टहलियानी यांच्यासमोर झालेली आहे. तपासात ढिलाई दाखविलेली असेल तर पोलिसांवर बरसणारे टहलियानी यापूर्वी अनेकांनी पाहिले आहेत. किंबहुना पोलिसांना धारेवर धरणारे न्यायाधीश म्हणूनच ते अधिक प्रसिद्ध आहेत. सध्याच्या जगात न्यायाधीशांनीही ‘अपडेट’ होण्याची गरज आहे. बदलत्या काळासोबत नव्या बाबी शिकत, कायद्याचा सारासार विचार करून निवाडा करेल तोच उत्तम न्यायाधीश, असे विधान अलीकडेच भारताच्या सरन्यायाधीशांनी केले होते. ही व्याख्या त्यांनी न्या. टहलियानी यांच्याकडे पाहूनच केली असावी! तांत्रिक बाबी आल्या की सहसा न्यायालयीन अधिकारी गोंधळून जातात मात्र न्या. टहलियानी यांच्यासमोर अशा बाबी येतात तेव्हा, ‘गृहपाठ’ व्यवस्थित केलेला नसेल तर समोरच्या अधिकाऱ्याची ‘शाळा’च घेतली जाते. याचा प्रत्यय तर कसाबच्या या खटल्यामध्येही सर्वाना आला. दहशतवाद्यांशी संपर्क साधण्यासाठी व्हीओआयपी या अद्ययावत यंत्रणेचा वापर करण्यात आला होता. त्या वेळेस समोर आलेल्या साक्षीदारापेक्षाही अधिक ज्ञान त्या संदर्भात त्यांनाच होते. त्याचप्रमाणे सायबर क्राइम सेलचे अधिकारी साक्षीसाठी आले, त्याही वेळी याचा प्रत्यय आला. ई-मेल हॅकिंग कसे घडते, याबाबतची माहिती तुम्ही कशी शोधली, अशी विचारणा टहलियानी यांनी केली. त्यावर अशा प्रकारचा शोध घेणाऱ्या अनेक वेबसाइटस् उपलब्ध आहेत, असे मोघम उत्तर त्या अधिकाऱ्याने दिले; मात्र त्यानंतरच्या संवादातही त्यांनाच अधिक विश्वासार्ह माहिती असल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयातही अनेकदा त्यांनी सांगितले आहे की, कोणतीही पाश्र्वभूमी नसताना मी स्वतच कोणाचीही मदत न घेता संगणक- इंटरनेट आदी सारे शिकलो आहे. फक्त शिकलो असेच नव्हे तर ते वापरतोही. शिवाय आजही रोज काही तरी शिकत असतो.. सकाळी मरिन ड्राइव्हवर मॉर्निग वॉक, शक्य झाल्यास रात्रीही एक फेरी मारायला त्यांना आवडते. एरवी कामाच्या बाबतीत कडक शिस्तीचे न्यायाधीश म्ङणून ते ओळखले जातात. या कडक शिस्तीचा त्रासही काही वेळा त्यांच्या कर्मचाऱ्यांना होतो. मात्र कामे वेळच्या वेळीच व्हायला हवीत, असा त्यांचा कटाक्ष असतो. याच खटल्यात अगदी सुरुवातीच्या काळात काही बाबी वेळच्या वेळी न झाल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले होते. मात्र नंतर कर्मचाऱ्यांनी खासगीत त्यांची भेट घेऊन कामे व्यवस्थित करण्याचे त्यांना आश्वासन दिले आणि जाहीरपणे न्यायालयात सुनावणे टाळावे, अशी त्यांना विनंती केली. ती त्यांनी मोठय़ा मनाने मान्यही केली. त्यानंतर न्यायालयात कर्मचाऱ्यांना अशा प्रसंगास कधीच सामोरे जावे लागले नाही. माणूस म्हणूनही ते आपल्या सहकाऱ्यांची चांगली काळजी घेतात, असा अनुभव आहे. त्याचप्रमाणे चांगले वरिष्ठ असतील, तर कर्मचारीही स्वतमध्ये चांगले बदल घडवून आणतात हे कर्मचाऱ्यांनीही दाखवून दिले. कर्तव्यकठोर अशी त्यांची प्रतिमा असली तरीही दुसऱ्या बाजूस ते पर्यावरणप्रेमी म्हणूनही सर्वाना चांगले परिचित आहेत. वृक्षवेलींत ते रमतात. झाडांची निगा राखणे हा त्यांचा आवडता छंद आहे. म्हणूनच तर त्यांनी आर्थर रोड कारागृहाच्या आवारातच असलेल्या विशेष न्यायालयाच्या मागच्या बाजूस झाडे लावली असून तिथे भेंडी व इतर काही भाज्यांचीही लागवड केली आहे. त्यांचे हे पर्यावरणप्रेमही त्यांच्या कर्तव्यकठोरतेइतकेच लक्षात राहते. याशिवाय अनेक गोष्टींतून त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा या खटल्यादरम्यान अनेकांच्या लक्षात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने याच ठिकाणी आर्थर रोडमध्ये असलेले न्यायालय सुसज्ज करण्याचा निर्णय घेतला तेव्हा, अगदी सुरुवातीपासून म्हणजे त्याचे डिझाइन कसे असावे इथपासून ते पार त्याला अंतिम रूप प्राप्त होईपर्यंत दररोज स्वत ते प्रत्यक्ष ठिकाणी येऊन कामावर लक्ष ठेवत. वास्तविक ते काम इतर कोणाच्याही हाती सोपवणे त्यांना सहज शक्य होते. मात्र हा खटला लवकर सुरू व्हावा आणि लवकरात लवकर तो निकालातही निघावा, असा त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळे त्यांनी कधीही, सुनावणीदरम्यानदेखील, वेळ वाया जाऊ दिला नाही. वेळ वाया जातो आहे, असे एकदोनदा लक्षात आले तेव्हा त्यांनी अभियोग पक्ष आणि आरोपींचे वकील दोघांनाही कडक शब्दांत तंबी दिली होती. त्यांना सिंधी उत्तम येते. घरी संभाषणाची भाषा सिंधीच. त्यांचे उर्दूचे ज्ञानही उत्तम आहे. कसाबशी संवाद साधणे त्यामुळेच त्यांना सोपे जात असे. .आणि अनेक वर्षे महाराष्ट्रातच गेल्याने त्यांचे मराठीचे ज्ञानही तेवढेच उत्तम आहे. सुनावणीदरम्यान क्षीरसागर नावाच्या अधिकाऱ्याने साक्ष देताना आपले नाव ‘शीरसागर’ असे सांगितले, तेव्हा त्यांनी त्याला पुन्हा विचारले, ‘तुमचे नाव क्षीरसागर की, शीरसागर?’ त्यावर त्याने ‘शीरसागर’ असे सांगितल्यानंतर त्यांनी त्याला ‘क्षीरसागर’चा अर्थ समजावून सांगितला! त्यांच्या उत्तम मराठीचा प्रत्ययही असाच वेळोवेळी खटल्यादरम्यान उपस्थितांना अनुभवता आला. वर्तमानपत्रांचे वाचन हाही त्यांचा आवडता छंद आहे. रात्री ते विदेशी वर्तमानपत्रांच्या वेबसाइटस् आवर्जून पाहतात. खटला पारदर्शीपणे जगासमोर जाईल आणि त्या माध्यमातून भारतीय न्यायव्यवस्थेची निष्पक्ष व स्वच्छ प्रतिमाही जगासमोर जाईल, असे त्यांनी कटाक्षाने पाहिले, ही भारतीय नागरिक म्हणून आपल्या सर्वासाठी अभिमानास्पद बाब आहे!



व्यक्तिवेध : एम. एल. टहलियानी
शुक्रवार, ७ मे २०१०

२६/११ चा खटला हा कसाबमुळे जसा लक्षात राहणार आहे तसाच तो, हा खटला चालविणारे विशेष न्यायालयाचे निर्भीड न्यायाधीश एम. एल. अर्थात मदन लक्ष्मणदास टहलियानी यांच्यामुळेही लक्षात राहणार आहे. खटल्याच्या निकालपत्रावर टहलियानी यांची खास छाप पाहायला मिळते. विशेषत: दोन महत्त्वाच्या बाबींमध्ये. अनलॉफुल अ‍ॅक्टिविटीज अ‍ॅक्टच्या कलम१६ अन्वयेदेखील कसाबला मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते, असा युक्तिवाद करण्यास विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम विसरले होते. हा मुद्दा स्वत टहलियानी यांनी लक्षात आणून दिला. केवळ युक्तिवादावर निर्णय न देता, कायद्याचा सारासार विचार करून निर्णय देणारा न्यायाधीश आदर्श मानला जातो. शिवाय कंदहार प्रकरणाचा उल्लेखही न्यायाधीश टहलियानी यांनी केला. त्या वेळेस मौलाना मसूद याला दहशतवाद्यांच्या ताब्यात देऊन त्यांनी ओलीस ठेवलेल्या देशवासीयांची सुटका करावी लागली होती. कसाबला फाशी दिल्यास अशा प्रकारच्या मानहानीकारक प्रसंगाला देशाला भविष्यात सामोरे जावे लागणार नाही; अर्थात त्याला फाशी देण्याशिवाय पर्याय नाही, असा महत्त्वपूर्ण उल्लेख टहलियानी यांनी केला. या दोन्ही महत्त्वाच्या बाबींच्या निमित्ताने टहलियानी यांनी आदर्शाचा एक नवा पायंडाच न्यायदानाच्या क्षेत्रात घालून दिला आहे. टहलियानी यांचे घराणे मूळचे राजस्थानातील. रोजगाराच्या निमित्ताने महाराष्ट्रात आल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्य़ातील मूल येथे ते स्थायिक झाले. न्या. टहलियानी यांचा जन्म मात्र राजस्थानातला. नागपूर येथे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून नागपूर विद्यापीठातूनच त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली. गोंदिया येथे वकिलीची एक वर्षांची उमेदवारी केल्यावर ते चंद्रपूरला गेले. नामवंत वकील दादासाहेब देशकर यांच्या हाताखाली त्यांनी वकिलीचे धडे गिरवले. गडचिरोली, वडसा, सिरोंचा इत्यादी ठिकाणी सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिले. नंतर मुंबईमध्ये महानगर दंडाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. वांद्रे न्यायालयापासून त्यांनी सुरुवात केली. अतिरिक्त प्रधान न्यायाधीश म्हणून काम करत असतानाच कसाबच्या खटल्यासाठी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झाली. यापूर्वी सीबीआयचे अनेक खटले त्यांच्यासमोर चालले. त्याचप्रमाणे कॅसेटकिंग गुलशन कुमार हत्या आणि कामगार नेते दत्ता सामंत हत्या या खटल्यांचीही सुनावणी न्या. टहलियानी यांच्यासमोर झालेली आहे. तपासात ढिलाई दाखविलेली असेल तर पोलिसांवर बरसणारे टहलियानी यापूर्वी अनेकांनी पाहिले आहेत. किंबहुना पोलिसांना धारेवर धरणारे न्यायाधीश म्हणूनच ते अधिक प्रसिद्ध आहेत. सध्याच्या जगात न्यायाधीशांनीही ‘अपडेट’ होण्याची गरज आहे. बदलत्या काळासोबत नव्या बाबी शिकत, कायद्याचा सारासार विचार करून निवाडा करेल तोच उत्तम न्यायाधीश, असे विधान अलीकडेच भारताच्या सरन्यायाधीशांनी केले होते. ही व्याख्या त्यांनी न्या. टहलियानी यांच्याकडे पाहूनच केली असावी! तांत्रिक बाबी आल्या की सहसा न्यायालयीन अधिकारी गोंधळून जातात मात्र न्या. टहलियानी यांच्यासमोर अशा बाबी येतात तेव्हा, ‘गृहपाठ’ व्यवस्थित केलेला नसेल तर समोरच्या अधिकाऱ्याची ‘शाळा’च घेतली जाते. याचा प्रत्यय तर कसाबच्या या खटल्यामध्येही सर्वाना आला. दहशतवाद्यांशी संपर्क साधण्यासाठी व्हीओआयपी या अद्ययावत यंत्रणेचा वापर करण्यात आला होता. त्या वेळेस समोर आलेल्या साक्षीदारापेक्षाही अधिक ज्ञान त्या संदर्भात त्यांनाच होते. त्याचप्रमाणे सायबर क्राइम सेलचे अधिकारी साक्षीसाठी आले, त्याही वेळी याचा प्रत्यय आला. ई-मेल हॅकिंग कसे घडते, याबाबतची माहिती तुम्ही कशी शोधली, अशी विचारणा टहलियानी यांनी केली. त्यावर अशा प्रकारचा शोध घेणाऱ्या अनेक वेबसाइटस् उपलब्ध आहेत, असे मोघम उत्तर त्या अधिकाऱ्याने दिले; मात्र त्यानंतरच्या संवादातही त्यांनाच अधिक विश्वासार्ह माहिती असल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयातही अनेकदा त्यांनी सांगितले आहे की, कोणतीही पाश्र्वभूमी नसताना मी स्वतच कोणाचीही मदत न घेता संगणक- इंटरनेट आदी सारे शिकलो आहे. फक्त शिकलो असेच नव्हे तर ते वापरतोही. शिवाय आजही रोज काही तरी शिकत असतो.. सकाळी मरिन ड्राइव्हवर मॉर्निग वॉक, शक्य झाल्यास रात्रीही एक फेरी मारायला त्यांना आवडते. एरवी कामाच्या बाबतीत कडक शिस्तीचे न्यायाधीश म्ङणून ते ओळखले जातात. या कडक शिस्तीचा त्रासही काही वेळा त्यांच्या कर्मचाऱ्यांना होतो. मात्र कामे वेळच्या वेळीच व्हायला हवीत, असा त्यांचा कटाक्ष असतो. याच खटल्यात अगदी सुरुवातीच्या काळात काही बाबी वेळच्या वेळी न झाल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले होते. मात्र नंतर कर्मचाऱ्यांनी खासगीत त्यांची भेट घेऊन कामे व्यवस्थित करण्याचे त्यांना आश्वासन दिले आणि जाहीरपणे न्यायालयात सुनावणे टाळावे, अशी त्यांना विनंती केली. ती त्यांनी मोठय़ा मनाने मान्यही केली. त्यानंतर न्यायालयात कर्मचाऱ्यांना अशा प्रसंगास कधीच सामोरे जावे लागले नाही. माणूस म्हणूनही ते आपल्या सहकाऱ्यांची चांगली काळजी घेतात, असा अनुभव आहे. त्याचप्रमाणे चांगले वरिष्ठ असतील, तर कर्मचारीही स्वतमध्ये चांगले बदल घडवून आणतात हे कर्मचाऱ्यांनीही दाखवून दिले. कर्तव्यकठोर अशी त्यांची प्रतिमा असली तरीही दुसऱ्या बाजूस ते पर्यावरणप्रेमी म्हणूनही सर्वाना चांगले परिचित आहेत. वृक्षवेलींत ते रमतात. झाडांची निगा राखणे हा त्यांचा आवडता छंद आहे. म्हणूनच तर त्यांनी आर्थर रोड कारागृहाच्या आवारातच असलेल्या विशेष न्यायालयाच्या मागच्या बाजूस झाडे लावली असून तिथे भेंडी व इतर काही भाज्यांचीही लागवड केली आहे. त्यांचे हे पर्यावरणप्रेमही त्यांच्या कर्तव्यकठोरतेइतकेच लक्षात राहते. याशिवाय अनेक गोष्टींतून त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा या खटल्यादरम्यान अनेकांच्या लक्षात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने याच ठिकाणी आर्थर रोडमध्ये असलेले न्यायालय सुसज्ज करण्याचा निर्णय घेतला तेव्हा, अगदी सुरुवातीपासून म्हणजे त्याचे डिझाइन कसे असावे इथपासून ते पार त्याला अंतिम रूप प्राप्त होईपर्यंत दररोज स्वत ते प्रत्यक्ष ठिकाणी येऊन कामावर लक्ष ठेवत. वास्तविक ते काम इतर कोणाच्याही हाती सोपवणे त्यांना सहज शक्य होते. मात्र हा खटला लवकर सुरू व्हावा आणि लवकरात लवकर तो निकालातही निघावा, असा त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळे त्यांनी कधीही, सुनावणीदरम्यानदेखील, वेळ वाया जाऊ दिला नाही. वेळ वाया जातो आहे, असे एकदोनदा लक्षात आले तेव्हा त्यांनी अभियोग पक्ष आणि आरोपींचे वकील दोघांनाही कडक शब्दांत तंबी दिली होती. त्यांना सिंधी उत्तम येते. घरी संभाषणाची भाषा सिंधीच. त्यांचे उर्दूचे ज्ञानही उत्तम आहे. कसाबशी संवाद साधणे त्यामुळेच त्यांना सोपे जात असे. .आणि अनेक वर्षे महाराष्ट्रातच गेल्याने त्यांचे मराठीचे ज्ञानही तेवढेच उत्तम आहे. सुनावणीदरम्यान क्षीरसागर नावाच्या अधिकाऱ्याने साक्ष देताना आपले नाव ‘शीरसागर’ असे सांगितले, तेव्हा त्यांनी त्याला पुन्हा विचारले, ‘तुमचे नाव क्षीरसागर की, शीरसागर?’ त्यावर त्याने ‘शीरसागर’ असे सांगितल्यानंतर त्यांनी त्याला ‘क्षीरसागर’चा अर्थ समजावून सांगितला! त्यांच्या उत्तम मराठीचा प्रत्ययही असाच वेळोवेळी खटल्यादरम्यान उपस्थितांना अनुभवता आला. वर्तमानपत्रांचे वाचन हाही त्यांचा आवडता छंद आहे. रात्री ते विदेशी वर्तमानपत्रांच्या वेबसाइटस् आवर्जून पाहतात. खटला पारदर्शीपणे जगासमोर जाईल आणि त्या माध्यमातून भारतीय न्यायव्यवस्थेची निष्पक्ष व स्वच्छ प्रतिमाही जगासमोर जाईल, असे त्यांनी कटाक्षाने पाहिले, ही भारतीय नागरिक म्हणून आपल्या सर्वासाठी अभिमानास्पद बाब आहे!

Author