जीवन म्हणजे न संपणारा प्रवास,
प्रत्येक वळणावर नवा सहवास.
कधी आनंदाची पहाट उजाडते,
तर कधी दुःखाची रात्र जागवते.
काही माणसं मनात घर करून जातात,
काही आठवणींच्या धुक्यात हरवून जातात.
पण प्रत्येक भेट आणि प्रत्येक विरह,
आयुष्याला नवा अर्थ देऊन जातो.
ठेच लागल्याशिवाय वाट कळत नाही,
अंधाराशिवाय प्रकाशाचं मोल समजत नाही.
प्रत्येक अश्रू एक शिकवण देतो,
आणि प्रत्येक हसू जगण्याचं बळ देतो.
नाती जपा, मनं जिंका,
शब्दांमध्ये नेहमी प्रेम ठेवा.
कारण आयुष्याची खरी श्रीमंती
पैशात नाही,
तर माणसांच्या विश्वासात असते.
शेवटी उरत नाही
धन, पद, कीर्ती किंवा अभिमान…
उरतो फक्त
आपल्या चांगुलपणाचा सुगंध,
जो काळ सरला तरी
लोकांच्या मनात दरवळत राहतो.
म्हणून असे जगा,
की तुमच्या जाण्याने
लोकांनी फक्त दुःख व्यक्त करू नये,
तर अभिमानाने म्हणावं.
“एक चांगला माणूस आपल्या आयुष्यात येऊन गेला.”
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212