हिमोग्लोबिन वाढणारे बहुतेक पदार्थ उष्ण

हिमोग्लोबिन वाढणारे बहुतेक पदार्थ उष्ण आहेत. त्यामुळे खजूर खायचा असेल तर तो तुपासह खायला हवा. बीट, पालक, मेथी याने लोह वाढते. पण शरीराने ते स्वीकारायला हवे. लोह व हिमोग्लोबिन यांचे सात्म्य करणे तेवढेसे सोपे नाही. सततच्या धावपळीमुळे शरीर जर गरम असेल तर अन्नातील हिमोग्लोबिन कमी ओढून घेते. म्हणून शरीरातील, विशेषतः मेंदूतील उष्णता अजिबात वाढता कामा नये. आपण अलीकडे तेलकट, मसाल्याचे तिखट पदार्थही भरपूर खातो, त्यानेही पोटातील उष्णता वाढते. प्रत्येक वस्तूला आपण फोडणी देतो, पोह्यांवर लिंबू पिळतो हे त्यातील धातूंचे शरीरात शोषण व्हावे म्हणून; पण आपण लिंबू पिळण्याऐवजी पोह्यावर दही घालून खातो. त्यामुळे त्याचा शरीराला काही फायदाच मिळत नाही; नुकसान मात्र होऊ शकते. म्हणून शरीरातील उष्णता न वाढवता हिमोग्लोबिन वाढवणारे शांतीरोझसारखे औषध आहारात रोज ठेवावे. पाळी नियमित राहावी यासाठी वैद्यांचे मार्गदर्शन घ्यावे. शतावरी कल्प, च्यवनप्राशही आहारात असू द्यावे. केवळ आहाराने हिमोग्लोबिन वाढत नाही.



हिमोग्लोबिन वाढणारे बहुतेक पदार्थ उष्ण आहेत. त्यामुळे खजूर खायचा असेल तर तो तुपासह खायला हवा. बीट, पालक, मेथी याने लोह वाढते. पण शरीराने ते स्वीकारायला हवे. लोह व हिमोग्लोबिन यांचे सात्म्य करणे तेवढेसे सोपे नाही. सततच्या धावपळीमुळे शरीर जर गरम असेल तर अन्नातील हिमोग्लोबिन कमी ओढून घेते. म्हणून शरीरातील, विशेषतः मेंदूतील उष्णता अजिबात वाढता कामा नये. आपण अलीकडे तेलकट, मसाल्याचे तिखट पदार्थही भरपूर खातो, त्यानेही पोटातील उष्णता वाढते. प्रत्येक वस्तूला आपण फोडणी देतो, पोह्यांवर लिंबू पिळतो हे त्यातील धातूंचे शरीरात शोषण व्हावे म्हणून; पण आपण लिंबू पिळण्याऐवजी पोह्यावर दही घालून खातो. त्यामुळे त्याचा शरीराला काही फायदाच मिळत नाही; नुकसान मात्र होऊ शकते. म्हणून शरीरातील उष्णता न वाढवता हिमोग्लोबिन वाढवणारे शांतीरोझसारखे औषध आहारात रोज ठेवावे. पाळी नियमित राहावी यासाठी वैद्यांचे मार्गदर्शन घ्यावे. शतावरी कल्प, च्यवनप्राशही आहारात असू द्यावे. केवळ आहाराने हिमोग्लोबिन वाढत नाही.

Author