सुप्रसिध्द नामधारक, श्री.गोंदवलेकर महाराजांचे भक्त प्रा. के. वि. बेलसरे यांना एम. ए.ची पदवी देणारे श्री. गुरूदेव रा. दा. रानडे हे ‘साक्षात्कार‘ या विषयाचे परमार्थाचे पायाशुध्द व्याकरण तयार करणारे स्वतः साक्षात्कारी पुरूष होते. पाश्चिमात्य राष्ट्रांत डॉ. अंडरहिल व पौर्वात्य राष्ट्रांत गुरूदेव रानडे हे योगी अरविंद, रामकृष्ण परमहंस या कोटीतले पुरूष होते. वैज्ञानिकाला अणुरेणू जेवढे महत्त्वाचे वाटतात, त्याप्रमाणे ‘साक्षात्कार‘ विद्येला ईश्वराचे अस्तित्व हे एक पारमार्थिक वास्तव प्रिय असते.
३ जुलै, १८५६ साली कर्नाटकातील जामखिंडी गावात त्यांचा जन्म झाला. मुलाने शिकावे, मिळवते व्हावे, सुखाने संसार करावा हे तत्कालीन नीतीपाठ त्यांनाही मिळाले. पुण्यातील परशुराम हायस्कूलमधून ते मॅट्रिकच्या परीक्षेत जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवून मुंबई युनिव्हर्सिटीत दुसरे आले. डेक्कन कॉलेजात प्राचार्य बेन व प्रा. वुडहाऊस या थिऑसॉफिस्ट प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या पहिल्या-दुसर्या वर्षीच्या परिक्षेत पहिल्या श्रेणीत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. गणित विषयात ते दुसर्या वर्गात बी.ए. झाले. अशातच त्यांना क्षयाची बाधा झाली. ‘जातो तो दिवस आपला‘ असे जीवन ते जगू लागले. तरीही एम. ए. परीक्षा ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले.
प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्यांनी ‘निबाळ‘ हे आपले खेडेगाव गाठले. अकादमी ऑफ फिलॉसॉफी अंॅड रिलिजन नावाचे अध्यात्मपीठ त्यांनी स्थापन केले. अॅनी बेझंट यांच्याशी त्यांची भेट झाली होती. गुरूदेवांच्या कृपाछत्राखाली तुम्ही सुखरूप आहात, हा आशीर्वाद त्यांनी दिला होता. पण अलाहाबादला कुलगुरू जगन्नाथ झा यांनी त्यांना विद्यापीठात तत्त्वज्ञान विषयाचे प्रमुख म्हणून बोलावले. विद्यापीठात १९२७ ते १९४६ पर्यंत प्राध्यापक , डीन, कुलगुरू इ. पदे त्यांनी भूषविली, तरी ‘साक्षात्कार‘ हा त्यांचा अनुभवविषय होता. ‘मिस्टिझम‘ हा मौनवाचक शब्द. ते सदा त्याच अवस्थेत असत. त्याचे संशोधन, विवरण, आकलन आणि प्रतिपादन हा त्यांचा स्थायी स्वभाव होता. ‘विश्वाचा मध्यबिंदू हा त्यांचा लेख जगभर गाजला .भूगर्भशास्त्रज्ञ पृथ्वीला मध्यबिंदू मानतात. तसा ईश्वर हा जगाचा मध्यबिंदू आहे पण ब्रांडाला परीघ नाही, हा त्यांचा सिध्दांत होता, पण तो आध्यात्मिक अनुभूतीवर आधारलेला आहे.
तासनतास ते भावसमाधीत स्थिरावत. दि. ६ जून, १९५७ मध्ये ते त्या समाधीत स्थिरावले. ‘परमार्थ‘ हा मंदबुध्दीच्या व अनीतीमान व्यक्तींसाठी नसतो. आत्मज्ञान, आत्मदर्शन, आत्मसाक्षात्कार या सर्व पारमार्थिक संज्ञा आहेत. त्या समजण्यासाठी सदाचरणी सत्योपासना हेच साधन आहे.
सुप्रसिध्द नामधारक, श्री.गोंदवलेकर महाराजांचे भक्त प्रा. के. वि. बेलसरे यांना एम. ए.ची पदवी देणारे श्री. गुरूदेव रा. दा. रानडे हे ‘साक्षात्कार‘ या विषयाचे परमार्थाचे पायाशुध्द व्याकरण तयार करणारे स्वतः साक्षात्कारी पुरूष होते. पाश्चिमात्य राष्ट्रांत डॉ. अंडरहिल व पौर्वात्य राष्ट्रांत गुरूदेव रानडे हे योगी अरविंद, रामकृष्ण परमहंस या कोटीतले पुरूष होते. वैज्ञानिकाला अणुरेणू जेवढे महत्त्वाचे वाटतात, त्याप्रमाणे ‘साक्षात्कार‘ विद्येला ईश्वराचे अस्तित्व हे एक पारमार्थिक वास्तव प्रिय असते.
३ जुलै, १८५६ साली कर्नाटकातील जामखिंडी गावात त्यांचा जन्म झाला. मुलाने शिकावे, मिळवते व्हावे, सुखाने संसार करावा हे तत्कालीन नीतीपाठ त्यांनाही मिळाले. पुण्यातील परशुराम हायस्कूलमधून ते मॅट्रिकच्या परीक्षेत जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवून मुंबई युनिव्हर्सिटीत दुसरे आले. डेक्कन कॉलेजात प्राचार्य बेन व प्रा. वुडहाऊस या थिऑसॉफिस्ट प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या पहिल्या-दुसर्या वर्षीच्या परिक्षेत पहिल्या श्रेणीत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. गणित विषयात ते दुसर्या वर्गात बी.ए. झाले. अशातच त्यांना क्षयाची बाधा झाली. ‘जातो तो दिवस आपला‘ असे जीवन ते जगू लागले. तरीही एम. ए. परीक्षा ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले.
प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्यांनी ‘निबाळ‘ हे आपले खेडेगाव गाठले. अकादमी ऑफ फिलॉसॉफी अंॅड रिलिजन नावाचे अध्यात्मपीठ त्यांनी स्थापन केले. अॅनी बेझंट यांच्याशी त्यांची भेट झाली होती. गुरूदेवांच्या कृपाछत्राखाली तुम्ही सुखरूप आहात, हा आशीर्वाद त्यांनी दिला होता. पण अलाहाबादला कुलगुरू जगन्नाथ झा यांनी त्यांना विद्यापीठात तत्त्वज्ञान विषयाचे प्रमुख म्हणून बोलावले. विद्यापीठात १९२७ ते १९४६ पर्यंत प्राध्यापक , डीन, कुलगुरू इ. पदे त्यांनी भूषविली, तरी ‘साक्षात्कार‘ हा त्यांचा अनुभवविषय होता. ‘मिस्टिझम‘ हा मौनवाचक शब्द. ते सदा त्याच अवस्थेत असत. त्याचे संशोधन, विवरण, आकलन आणि प्रतिपादन हा त्यांचा स्थायी स्वभाव होता. ‘विश्वाचा मध्यबिंदू हा त्यांचा लेख जगभर गाजला .भूगर्भशास्त्रज्ञ पृथ्वीला मध्यबिंदू मानतात. तसा ईश्वर हा जगाचा मध्यबिंदू आहे पण ब्रांडाला परीघ नाही, हा त्यांचा सिध्दांत होता, पण तो आध्यात्मिक अनुभूतीवर आधारलेला आहे.
तासनतास ते भावसमाधीत स्थिरावत. दि. ६ जून, १९५७ मध्ये ते त्या समाधीत स्थिरावले. ‘परमार्थ‘ हा मंदबुध्दीच्या व अनीतीमान व्यक्तींसाठी नसतो. आत्मज्ञान, आत्मदर्शन, आत्मसाक्षात्कार या सर्व पारमार्थिक संज्ञा आहेत. त्या समजण्यासाठी सदाचरणी सत्योपासना हेच साधन आहे.