यांचे मूळ नाव गोविंद अनंत कुळकर्णी. यांचे लहानपण इंदूरला गेले. वयाच्या पंधराव्या वर्षी दासबोध वाचत असताना गुरुकृपेसाठी मन व्याकूळ झाले तेव्हा श्री गोंदवलेकर महाराजांनी दर्शन देऊन आपल्याकडे येण्याची आज्ञा केली.
श्री. गोंदवलेकर महाराजांचे शिष्यत्व पत्करल्यावर त्यांनी यांचे नाव आनंदसागर असे ठेवले.
श्री. महाराजांच्या आज्ञेवरुन यांनी जालना येथे श्री राममंदिराची स्थापना केली.१९०७ साली या थोर विभूतीने देह ठेवला.