विद्वानाने विद्येचा वापर व आदर कसा करावा, याचा वस्तुपाठ ठरणारे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्री. आ. देशपांडे आता आपल्यात नाहीत. विदर्भासह महाराष्ट्राच्या प्रादेशिक असमतोलाची सातत्याने अभ्यासपूर्ण मांडणी करणाऱ्या डॉ. देशपांडे यांनी नागपूरच्या मॉरिस कॉलेजातून पदव्युत्तर शिक्षण (एम.ए.) पूर्ण केल्यावर १९५२ पासून प्रथम धनवटे मग बिंझाणी महाविद्यालयांत प्राध्यापकी केली. अर्थशास्त्र हा त्यांचा आवडता विषय होता.
सुमारे ३५ वर्षे अध्यापन करून ३१ ऑक्टोबर १९८४ ला नागपूर विद्यापीठातून अर्थशास्त्र विभागप्रमुख म्हणून ते सेवानिवृत्त झाले. फेब्रुवारी १९७६ ते ऑक्टोबर १९७८ पर्यंत ते समाजविज्ञान शाखेचे अधिष्ठाता होते. औरंगाबादेत ऑक्टोबर १९७९ मध्ये झालेल्या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या तिसऱ्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. भारतीय समाजविज्ञान संशोधन मंडळाच्या पश्चिम विभागाच्या सल्लागार मंडळावर सुमारे नऊ वर्षे त्यांनी काम केले. संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी), विभागीय असमतोलविषयक दांडेकर समिती, जलसिंचन आयोग, तसेच राज्यपालांनी नेमलेल्या विदर्भ वैधानिक विकास मंडळाचेही ते सदस्य होते. १९९५मध्ये अनुशेष निर्देशांक समितीतही ते होते. विदर्भ वैधानिक विकास मंडळावर सदस्य म्हणून काम करताना त्यांनी विदर्भाच्या अनुशेषासंदर्भात अनेक निर्णय घेतले. विदर्भ विकास मंडळ स्थापन व्हावे, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले, मात्र त्या वेळी विरोध झाल्यावरही यासाठी सरकारकडे त्यांनी भिन्नमत पत्रिका (नोट ऑफ डिसेंट) सादर केली. १९९६ मध्ये बॅकलॉग अॅण्ड इंडिकेटर समितीचेही ते सदस्य होते. सुबोध अर्थशास्त्र, अधिकोष आणि नाणे बाजार, भारताचे आर्थिक प्रश्न, मुद्रासिद्धान्त आणि मौद्रिक व्यवहार, अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक, समग्र अर्थशास्त्र, भारतीय अर्थव्यवस्था संक्रमण आणि विकास इत्यादी पुस्तके त्यांच्या नावावर असली तरी मुद्रासिद्धान्त आणि धोरण, भारतीय नियोजन आणि आर्थिक विकास, मुद्रासिद्धान्त आणि राजस्व नीती, ही पुस्तके विशेष लोकमान्य झाली. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या मातीचा गाढा अभ्यासक हरपला आहे.
देशपांडे, (डॉ.) श्री. आ.
विद्वानाने विद्येचा वापर व आदर कसा करावा, याचा वस्तुपाठ ठरणारे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्री. आ. देशपांडे आता आपल्यात नाहीत. विदर्भासह महाराष्ट्राच्या प्रादेशिक असमतोलाची सातत्याने अभ्यासपूर्ण मांडणी करणाऱ्या डॉ. देशपांडे यांनी नागपूरच्या मॉरिस कॉलेजातून पदव्युत्तर शिक्षण (एम.ए.) पूर्ण केल्यावर १९५२ पासून प्रथम धनवटे मग बिंझाणी महाविद्यालयांत प्राध्यापकी केली. अर्थशास्त्र हा त्यांचा आवडता विषय होता.
सुमारे ३५ वर्षे अध्यापन करून ३१ ऑक्टोबर १९८४ ला नागपूर विद्यापीठातून अर्थशास्त्र विभागप्रमुख म्हणून ते सेवानिवृत्त झाले. फेब्रुवारी १९७६ ते ऑक्टोबर १९७८ पर्यंत ते समाजविज्ञान शाखेचे अधिष्ठाता होते. औरंगाबादेत ऑक्टोबर १९७९ मध्ये झालेल्या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या तिसऱ्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. भारतीय समाजविज्ञान संशोधन मंडळाच्या पश्चिम विभागाच्या सल्लागार मंडळावर सुमारे नऊ वर्षे त्यांनी काम केले. संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी), विभागीय असमतोलविषयक दांडेकर समिती, जलसिंचन आयोग, तसेच राज्यपालांनी नेमलेल्या विदर्भ वैधानिक विकास मंडळाचेही ते सदस्य होते. १९९५मध्ये अनुशेष निर्देशांक समितीतही ते होते. विदर्भ वैधानिक विकास मंडळावर सदस्य म्हणून काम करताना त्यांनी विदर्भाच्या अनुशेषासंदर्भात अनेक निर्णय घेतले. विदर्भ विकास मंडळ स्थापन व्हावे, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले, मात्र त्या वेळी विरोध झाल्यावरही यासाठी सरकारकडे त्यांनी भिन्नमत पत्रिका (नोट ऑफ डिसेंट) सादर केली. १९९६ मध्ये बॅकलॉग अॅण्ड इंडिकेटर समितीचेही ते सदस्य होते. सुबोध अर्थशास्त्र, अधिकोष आणि नाणे बाजार, भारताचे आर्थिक प्रश्न, मुद्रासिद्धान्त आणि मौद्रिक व्यवहार, अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक, समग्र अर्थशास्त्र, भारतीय अर्थव्यवस्था संक्रमण आणि विकास इत्यादी पुस्तके त्यांच्या नावावर असली तरी मुद्रासिद्धान्त आणि धोरण, भारतीय नियोजन आणि आर्थिक विकास, मुद्रासिद्धान्त आणि राजस्व नीती, ही पुस्तके विशेष लोकमान्य झाली. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या मातीचा गाढा अभ्यासक हरपला आहे.