नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
विजय कोठेही असला तरी त्याचे डोळे आणि कान सताड उघडे असतात. लोकांच्यात होणारे संभाषण हे तर त्याच्या कविता, कथा आणि लेखांचे खाद्य असते. लेखक ,कवी असो अथवा पत्रकार त्यांना सतत लोकांच्या भाव – भावनांचा विचार करत राहावे लागते. काही दिवसापूर्वी विजय बसने प्रवास करत होता. प्रवासात दोन स्त्रियांचा संवाद त्याच्या कानावर पडत होता… बायका तश्या बऱ्यापैकी सुशिक्षित दिसत होत्या म्हणजे त्यांच्या बोलण्यात येणाऱ्या सततच्या इंग्रजी शब्दावरून ते लक्षात येत होते. त्या बायका कमीत कमी दहावी – बारावी पर्यत नक्कीच शिकलेल्या असाव्यात. त्यातील एक तर इतकी व्यवस्थित होती कि ती नक्कीच कोणत्यातरी कार्यालयात कामाला असावी अशी वाटावी.
यादववंशांत शूरसेन नांवाचा एक राजा झाला. हा मथुरेंत राहून राज्याचा कारभार पाहत असे. म्हणून मथुरा ही सर्व यादव राजांची राजधानी असे लोक समजू लागले. या शूरसेनाचा मुलगा वसुदेव याचे कंसाची बहीण देवकी हिच्याशी मोठ्या थाटाने लग्न झाले. लग्नसमारंभ उरकल्यावर देवकीला घेऊन वसुदेव जाण्यास निघाला, तेव्हां कंस हा आपल्या बहिणीस व मेहुण्यास पोचविण्यासाठी मोठ्या इतमामानें सोन्याचे शेकडों रथ घेऊन निघाला; इतकेच नाही, तर आपल्या बहिणीच्या संतोषासाठी तिचा रथ हांकण्याचे काम त्याने स्वतः हातीं घेतले.
आनंदवनाच्या निर्मितीत बाबा आमटे यांना त्यांच्या पत्नीची साधनाताईंची फार मोलाची साथ लाभली होती. त्यामुळे उद्दिष्टपूर्तीसाठी त्यांनी केलेल्या 'साधने'त कोठेही खंड पडला नाही. साधनाताईंनीही अगदी मनापासून बाबांच्याप्रमाणेच या कार्यात स्वतःला वाहून घेतले. साधनाताई आमटे म्हणजे पूर्वाश्रमीच्या इंदू घुले. आमटे व घुले परिवाराचे मित्रत्वाचे संबंध होते. बाबा आमटे यांच्या कलंदर वृत्तीची साधनाताईंना प्रथमपासूनच कल्पना होती. परंतु चाकोरीबाहेर जीवन जगणाऱ्या व काही तरी वेगळे करून दाखविण्यासाठी जिद्द असलेल्या या तरुणाबद्दल त्यांना आकर्षण होतेच. प्रत्यक्ष विवाहाच्या वेळीं बाबांनी त्यांना 'तुझे एका वादळाशी लग्न झाले आहे' असे स्पष्टपणे सांगितले होते. परंतु साधनाताईंनीही पूर्ण विचारांनीच त्यांच्यासारखा जोडीदार स्वीकारला होता. त्यामुळे पुढे बाबांच्या प्रत्येक कार्यात त्यांनी त्यांना मनापासून साथ केली. कुष्ठरोग्यांची मुले जेव्हा स्वतःच्या घरात ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हा साधनाताईंनी त्या मुलांना स्वतःच्या मुलासारखी वागणूक दिली. एक दिवस रड्याच्या कडेला टाकून दिलेल्या एका ताज्या मुलीला घेऊन कोणीतरी आश्रमात आले व साधनाताईंनी त्या मुलीला स्वतःच्या फरात घेतले. तिचे नाव ' धरती' असेच ठेवले व तिला मायेची ऊब दिली. दुर्देवाने ती मुलगी फार काळ जगली नाही; मात्र अनाथ मुलांसाठी 'गोकुळ प्रकल्प सुरू करण्याचे ती प्रेरणास्थान ठरली. 'गोकुळमधील अशा अनेक अनाथ मुलांना साधनाताईंनी आईचे प्रेम दिले. अशा मुलांबरोबर शिकून माझी मुले मोठी झाली व बाबांचे समाजकार्य त्यांनी नेटाने पुढे चालविले आहे, असे साधनाताई मोठ्या अभिमानाने सांगत.
आज शाळेचा उद्घाटन सोहळा सुरू आहे. कारणसुद्धा तसेच आहे. शाळेसाठी तब्बल ८० लाख रुपये खर्च करून सर्व सोयीसुविधांसह एक एकर क्षेत्रात शाळेची इमारत दिमाखात उभी आहे. आज शाळासुद्धा सर्वांसोबत त्या व्यक्तींची वाट बघत आहे जी व्यक्ती शाळेचे उद्घाटन करणार आहे.
“यशोदा बाई, जा आत्ता” यशवंतने सुचवलं. यशोदा बाई निघून गेली.
“हं . आत्ता तुम्ही बोला, मिसेस शिर्के, तुमची इतकी मौल्यवान वस्तु मयताच्या हातांत कशी सांपडली? तुम्ही ती आपणहून नक्की दिली नसणार, तत्पूर्वी एक प्रश्न, तुम्ही ह्या इसमाला त्याच्या मरणापूर्वीपासून ओळखतां. होय नां?” यशवंतने आपली प्रश्नावली संपवतांना अनूचा चेहरा फिकट पडत असलेला पाहिला. “तुम्हांला बरं वाटत नाही कां? सावंत, पाणि आणा. लवकर”.
अनूने एका घोटांत पाणि पिऊन संपवलं.
एका जंगलात एक कोंबडी रहात होती. एका काटेरी कुंपणाजवळ तिने चार अंडी ठेवली. त्यानंतर ती चारापाणी शोधायला जंगलात गेली. थोड्या वेळानंतर ती परत आली. तिला तेथे तिच्या चार अंड्यांशेजारी आणखी एक पाचवे अंडे दिसले. ते अंडे इतर चार अंडयांपेक्षा खूपच मोठे होते. “हे अंडे आपले नाही, मग ते कुणाचे असेल?“ असा प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला. तिने त्याचा तपास करायचा ठरवले.
(जपानची पुराणकथा)
फार फार वर्षांपूर्वी आकाशाच्याही वर तोका आमाहारा येथे विश्व निर्मात्याचे
घर होते. त्याकाळी ‘अमेनो मिनाकानुसि’ नावाच्या देवाचा सर्वत्र संचार होता.
‘अमेनो मिनाकानुसि’ या देवाने अनेक देव-देवता निर्माण केल्या.
स्मिता कॉम्प्युटर इंजिनीअर. चार वर्षे झाली विक्रोळीला एका छोट्याशा कंपनीत नोकरीला होती. तिला प्रोग्रॅमिंग व काही क्लाएंटचे प्रोजेक्ट्स बघावे लागत. ती घरातून बारा-साडेबाराला निघे व रात्री बारा साडेबारापर्यंत परत येई. अर्थात तिला कारने घरापर्यंत ड्रॉप असे. पण काल रात्री तिला अजिबात झोप आली नाही.
जगदीशची आई म्हणजे नंबर एकची खोटारडी बाई होती. अशी खोटारडी ‘आई’ जगाच्या पाठीवर नसेल, हे माझे नाही तर, जगदीशचेच म्हणणे आहे! आयुष्यभर (अर्थात तिच्या) ती आपल्या लाडक्या जगूला खोटंच बोलत आली म्हणे!
गावचा नामा त्या दिवशी बॅंकेच्या दारात भेटला.गडी जरा घाईतच होता.घाईत म्हणजे गरबडीत.हातात बरीचं कागद होती.त्याला बॅंकेचं कर्ज काढायचं असावं.मी सहज त्याला हटकलं.
Copyright © 2025 | Marathisrushti