(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मोठया अंडयाची छोटी गोष्ट

    एका जंगलात एक कोंबडी रहात होती. एका काटेरी कुंपणाजवळ तिने चार अंडी ठेवली. त्यानंतर ती चारापाणी शोधायला जंगलात गेली. थोड्या वेळानंतर ती परत आली. तिला तेथे तिच्या चार अंड्यांशेजारी आणखी एक पाचवे अंडे दिसले. ते अंडे इतर चार अंडयांपेक्षा खूपच मोठे होते. “हे अंडे आपले नाही, मग ते कुणाचे असेल?“ असा प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला. तिने त्याचा तपास करायचा ठरवले.

  • एक परीस स्पर्श ( भाग – २० )

    आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे विजय सूक्ष्म निरीक्षण करत असल्यामुळे त्याला कळले की बऱ्याचदा त्याच्या आयुष्यात अचानक काही गोष्टी घडतात आणि त्याच्यावर येणारे संकट टळते. कारण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या वाईट गोष्टींसाठी देवाला नाही तर आपल्या प्रारब्धाला गृहीत धरले. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी विनाकारण घडत नाहीत यावर विजयचा आजही विश्वास आहे म्हणूनच तो कोणत्याही परिस्थिती स्थिर असतो.

  • लोकल

    पहिला वर्ग असू द्या नाही तर दुसरा वर्ग, इतक्या गर्दीतून तास-दोन तास मेंढरांसारख डब्यात कोंडून तुम्ही प्रवास करता तरी कसा ? आपल्याला तर गुदमरल्यासाखं होतं. परगांवाहून आलेला पाहुणा सांगत राहतो. ‘आम्हाला याची सवय आहे’ मुंबईकर अभिमानाने सांगत राहतो. रोजची दगदग हसत-हसत झेलत राहतो. लोकल पकडण्याचं आणि उतरण्याचं भयंकर दिव्य रोजचं करीत राहतो.

  • बेटी – धनाची पेटी ( सत्य घटनेवर आधारित एक लघुकथा )

    नेहमीच्‍या कोपर्‍यावर मी मोटार थांबवली. माझे ऑफिसातले मित्र आंत चढले. मोटार ऑफिसच्‍या दिशेनं धावूं लागली. ‘‘आज साठे दिसत नाहीं’’, मी म्हणालो. ‘‘तुम्‍हाला माहीत नाहीं कां पराडकर ? साठेला मुलगी झाली.’’ पाटीलनं सांगितलं, ‘‘हो कां ? अरे वा !’’, मी. साठे हा आमच्‍या ऑफिसातला एक तरुण ऑफिसर. त्‍याच्‍या खेळकर स्‍वभावामुळे तो सर्वांनाच आवडत असे. दीडएक वर्षांपूर्वी त्‍याचं लग्‍न झालं होतं. आतां मुलगी झाली होती. बेटा अगदी खुशीत असणार ! साठे भेटला की त्‍याचं अभिनंदन करायचं मी ठरवलं.

    दुसर्‍या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मित्र कारमध्‍ये चढले. आज साठेही होता. ‘‘साठे, अभिनंदन !’’, मी. ‘‘थॅंक्‍यू’’ , साठे. ‘‘बर्फी हवी बरं का साठे’’, मी. ‘‘छे छे, बर्फीनं भागणार नाही, पार्टीच हवी’’, काळेनं फर्माईश केली. ‘‘देऊं ना’’, साठे म्‍हणाला. पण त्‍याच्‍या बोलण्‍यात उत्‍साह दिसत नव्‍हता.

    कार पुढे धावत होती. संभाषणाला खीळ पडली होती. नेहमीचा खेळकर साठे आज इतका गप्‍प गप्‍प कां? मी विचार करत होतो. अखेर न राहवून मी विचारले, ‘‘काय साठे, आज अगदी गप्‍प आहेस ? बाळ बाळंतीण ठीक आहेत ना ?’’. साठेच्‍या आधी पाटीलनंच उत्तर दिलं, ‘‘त्‍याचं काय आहे, मुलगी झाली म्‍हणून साठे नाराज झालाय्’’. ‘‘खरं का रे’’, मी. साठे गप्‍पच. त्‍याला समजवत मी म्‍हणालो, ‘‘अरे, नाराज कशाला व्‍हायचं? उलट खूषच व्‍हायला हवं. म्‍हणच आहे, पहिली बेटी धनाची पेटी’’. ‘‘हो धनाची पेटी ! मला आत्तांपासूनच धन जमवायच्‍या मागे लागायला हवं, म्‍हणजे मुलीच्‍या लग्‍नासाठी धनाची पेटी तयार करता येईल’’, साठे उद्गारला. ‘‘अरे साठे, मूल होणं ही किती आनंदाची गोष्‍ट आहे ! त्‍यातून तुझं तर पहिलं मूल ! मुलगा काय, मुलगी काय, सारखंच’’, काळे म्‍हणाला. त्‍याला लग्‍नानंतर पांच वर्षांनी मूल झालं होतं. पण साठेला काळेचं सांगणं पटलं नाही. ‘‘अरे बाबा, एवढं सोपं नाहीं तें. आज मुलीच्‍या लग्‍नाला चार-पांच लाख खर्च येतो. पंचवीस वर्षांनी पंधरा-वीस लाख तरी लागतील. आपण मध्‍यमवर्गीय माणसं, आपला पगार तो कितीसा, अन् त्‍यातून शिल्‍लक किती पडणार ? महागाई तर दिवसेदिवस वाढतेच आहे ! मुलीला वाढवायचं, शिकवायचं, ग्रॅज्युएट-पीजी करायचं. त्‍यातून तिने इंजिनियरिंग किंवा मेडिकलला जायचं म्‍हटलं तर झालंच ! एवढं सगळं करून इतके लाख शिल्‍लक टाकायचे कसे अन मुलीचं लग्‍न करायचं कसं ?’’, साठे व्‍यथित झाला होता. जणूं मुलीचं लग्‍न उद्यावर येऊन ठेपलं होतं !

    मी वेगळा मुद्दा मांडत साठेची समजूत काढू लागलो, ‘‘पण मुलगा होणं किंवा मुलगी होणं आपल्‍या हातात थोडंच असतं ? मग मुलगाच व्‍हावा अशी अपेक्षा ठेवणं योग्‍य आहे कां ?’’. ‘‘पराडकर, तुमचं काय जातं असं म्‍हणायला?’’, साठे चिडून बोलला, ‘‘तुम्‍हाला दोन्‍ही मुलगेच आहेत. जावें त्‍याच्‍या वंशा तेव्‍हां कळे !’’.

    खरं म्‍हणजे मला साठेशी खूप बोलायचं होतं. मुलगा किंवा मुलगी असा प्रेफरन्‍स मला नव्‍हता, हे त्‍याला सांगायचं होतं. हल्‍ली मुली मुलांच्‍या बरोबरीने चमकतात, स्त्रिया पुरुषांपेक्षा कुठल्‍याही बाबतीत कमी नाहीत, हेही सांगायचं होतं. ह्या विषयाचे वेगवेगळे पैलू आहेत, त्‍यांची चर्चा करायची होती. पण साठेचा मूड् बघून मी विषय वाढवला नाही. बाकीची मंडळीही उरलेला रस्‍ता गप्‍पच राहिली.

    संध्‍याकाळी साठे ओव्‍हरटाईमला थांबल्‍यामुळे आमच्‍याबरोबर नव्‍हता. साहजिकपणें पुन्‍हां साठेचाच विषय सुरुं झाला. ‘‘साठेनं मुलगी झाल्‍याचं फारच मनाला लावून घेतलं आहे’’, मी म्‍हणालो , ‘‘खरं म्‍हणजे मुलगा किंवा मुलगी होणं किंवा न होणं हें आपल्‍या हातात नसतं’’. ‘‘खरं आहे, पण साठेसारखे लोक बरेच आहेत, पराडकर’’ , इति पाटील.

    पाटील सांगूं लागला, म्हणाला, ‘‘माझा एक परिचित आहे, लिमये. त्याला दोन मुली आहेत. बायकोची प्रकृती यथातथाच आहे. तिसरं मूल नको असा सल्‍ला डॉक्‍टरांनी दिला होता. पण ह्या सद्.गृहस्‍थाला मुलगा हवाच होता, म्‍हणायचा, ‘मुलगा नसला तर मला सद्गती मिळणार नाहीं’. जग एकविसाव्‍या शतकात पोंचलंय आणि याचे असे जुनाट विचार ! बायकोला तिसर्‍यांदा दिवस राहिले. ह्याला कांही चैन नाहीं, मुलगा होईल की मुलगी ? गर्भतपासणी करून घेतली”. ”अरे, पण तशी चाचणी तर बेकायदेशीर आहे”. ”हो, पण तरीही घेतली करून. मुलगी आहे असा निर्णय समजला. झालं. हा पठ्ठ्या बायकोच्‍या मागे लागला की गर्भपात करून घे. दोनचार दिवस तिनं तग धरला. पण हा कांही पाठ सोडेना. शेवटी ती बिचारी नाइलाजानें तयार झाली. अन् सांगायची गोष्‍ट म्‍हणजे गर्भपाताच्‍या वेळी ती बाई रक्‍तस्‍त्रावाने जवळजवळ मेलीच होती, केवळ सुदैव म्‍हणून वाचली ! त्या वेळी तिची मोठी मुलगी होती चार वर्षांची अन धाकटी दोन वर्षांची. आतां बोला ! ”. ”बिचारी बाई खरोखरच जर मेली असती तर त्‍या लहान जिवांचे काय हाल झाले असते !’’, काळे त्‍वेषानं उद्गारला. ‘‘खरी गंमत पुढेच आहे’’, पाटील म्‍हणाला, ‘‘थोड्या दिवसांनी बाईला पुन्‍हां दिवस राहिले, अन या वेळी मात्र तिला मुलगाच झाला’’. ‘‘त्‍या लिमयेला अगदी धन्‍य धन्‍य झालं असेल!’’ मी म्‍हणालो. ‘‘हो ना ! त्‍याला आता आभाळ ठेंगणं झालंय. आतां स्‍वर्गात जायची सोय झाली ना !’’ पाटीलची प्रतिक्रिया.

    ”पण साठे काय किंवा लिमये काय, यांच्‍या या अवस्‍थेला आपली समाजरचनाच जबाबदार आहे”, काळे म्‍हणाला, ”अगदी माझ्या घरातलंच उदाहरण सांगतो. परवाचीच गोष्‍ट. माझी बायको नलू सांगत होती – ‘दुपारी मी आणि शेजारची सुमा बोलत उभ्‍या होतो. पलिकडच्‍या मालतीकाकू त्‍यांच्‍या पुष्‍पाच्‍या बाळाला घेऊन जात होत्‍या. त्‍या आमच्‍याशी बोलायला थांबल्‍या. मी कौतुकानं म्‍हणाले, कित्ती छान जावळ आहे बाळाचं. तर म्‍हणतात कशा, ‘असं बोलूं नये हो. बाळाला दृष्‍ट लागेल’. मला अस्‍सा राग आला. नंतर मी सुमाला म्‍हटलं सुद्धा, आमची कशी दृष्‍ट लागेल ? आम्‍हाला मुलं नाहींत की काय ?’. नलूचं बोलणं ऐकून मी थक्‍कच झालो . म्‍हटलं , ‘मालतीकाकूंचं जाऊं दे ; अल्पशिक्षित म्‍हातारी ती. पण तूं ! तूं तर कॉलेजात फिजिक्‍सची लेक्‍चरर आहेस ! दृष्‍ट लागणं अन त्‍यातूनही निपुत्रिकेची दृष्‍ट लागणं असल्‍या अंधश्रद्धांवर तुझ्यासारखी बाई विश्वास ठेवते म्‍हणजे मात्र कमाल आहे !’ . ’माझा विश्‍वास आहे की नाहीं ते जाऊं द्या’, नलू म्‍हणाली, ‘जगाचा तर आहे ना ! आपला विश्‍वास असो वा नसो, समाज आपल्‍याला अशा गोष्‍टींमध्‍ये जखडून ठेवतो. इतकी वर्ष आपल्‍याला मूल नव्‍हतं. तेव्‍हां याच बायकांच्‍या बोचर्‍या नजरा मला घायाळ करत, त्‍यांची कुत्सित बोलणी ऐकवत नसत. आतां देवानं मला सोन्‍यासारखी मुलगी दिली आहे. आतां मी दुसर्‍यांची बोलणी कां म्‍हणून ऐकून घ्‍यावी ?’ या अजब तर्कानं मी सर्द झालो”, काळेंनं गोष्ट पूर्ण केली. मग काळेनं विचार मांडला, ”सांगायचा मुद्दा असा की, समाजाची रचना, समाजाच्‍या रूढी बदलायला हव्‍यात. तरच साठे आणि लिमयेसारखे लोक मुलगी झाली म्‍हणून दुःखी होणार नाहींत”.

    *

    पाटील अन् काळे नेहमीच्‍या कोपर्‍यावर उतरून गेले. कार घराकडे धावत होती. कारबरोबर माझे विचारही धावत होते. कधी बदलणार हा समाज ? दुष्‍ट रुढी कधी नाहींशा होतील ? कधी स्त्रियांना समाजात बरोबरीचं, मानाचं, स्‍थान मिळेल ? आपल्‍यासारखी माणसं त्‍यासाठी काय काम करूं शकतील? एक ना दोन, अनेक विचार.

    विचारांच्‍या नादात घर केव्‍हां आलं ते मला कळलंच नाहीं, कार पार्क करतां करतां मी ठरवलं की गेल्‍या गेल्‍या लगेचच स्‍त्रीस्‍वातंत्र्य-पुरस्‍कर्त्‍या आपल्‍या बायकोला आजची सर्व चर्चा सांगायची.

    घरात पाऊल टाकतांच दिसलं की माझी चुलतबहीण रजनी आलेली होती अन् ‘मुलगा व्‍हावा’ म्‍हणून कुठलसं व्रत धरल्‍याचं ती माझ्या बायकोला सांगत होती. मी ओठावरचे शब्‍द तात्‍पुरते गिळून टाकले.

    + + +

    ( Note – This story is based on a real-life experience. The Author has taken some literary liberties. Name of characters have been changed ).

    _ _ _

    [ पूर्वप्रसिद्धी : ‘कीर्तिस्तंभ’ पाक्षिक, वडोदरा ( बडोदा) , आवृत्ती दि. ०१.०९.१९९६.

    कांहीं बदल : १४ फेब्रु. २०१८ ]

    = = =

    - सुभाष स. नाईक Subhash S. Naik
    मुंबई.
    M - 9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in
    Website : www.subhashsnaik.com , www.snehalaatnaik.com

  • धौम्य व उपमन्यू

    फार प्राचीन काळी धौम्य या नावाचे एक महान ऋषी होऊन गेले. ते आपल्या शिष्यांना केवळ ज्ञान देत नसत, तर ज्ञानाच्या जोडीला व्यवहार शिकवीत असत. त्यासाठी शिष्यांना आश्रमात पडतील ती कामे करावी लागत.

  • गरीबी आणि जिद्द

    विदर्भातील एका शहरात सहज भरकटत होतो. सकाळची वेळ असून ही उन्हं चांगलचं चटकत होतं. रसत्यावर गर्दी होती. खरं तर आम्ही चहाच्या शोधात होतोत. फुटपाथवर अनेक टप-या थाटलेल्या होत्या. त्यात चहाच्या टप-या ही होत्या.पण त्यात स्वच्छ तर एक ही नव्हती, पॉश पण नव्हती. अस्वच्छ होत्या. किळसवाण्या होत्या. त्यावर ही लोकांची झुंबड उडालेली होती.आम्हाला पाॉश हॉटेल हवं होत.बरीच पायपीट झाल्यानंतर ही तिथं चहा जाऊन प्यावं असं हॉटेल सापडलं नाही. एका टपरीजवळ थांबलो.

  • न संपणारा रस्ता (कथा)

    नागू दुपारची भाकरी खावी म्हणून औत सोडून बैलायला पाणी पाजवू लागला.डोबी पाण्यानं ठिल भरलेली होती.सूर्य नारायण आग ओकत व्हता.बैलायनं पूर sपूर करत खाली मुंडी घालून गटागटा पाणी  पेलं.

  • शिकवण

    सकाळी सकाळी ऐनकामाच्या वेळात वीणाबेनचा फोन आला होता त्यामुळे जास्त काही चौकशी न करता दुपारी मिटींगला येईन असे कबूल केले होते.
    इतक्यात तडकाफडकी एवाद्या प्रोजेक्टसाठी मिटिंग बोलावण्याचे कारण काय असावे ह्याचा डोक्यात विचार चालू होता.

  • नवरात्र …माळ तिसरी

    रितीरिवाज , परंपरांच्या बेडया , पिढयानपिढया चालत आलेले संस्कार .. सगळ्या सगळ्याची बंधन तोडून आपल्या लेखनाच्या माध्यमातून खुल्या आसमंतात श्वास घेण्याची .. मुक्त विहरण्याची जबरदस्त किंमत चुकवणारी … आपल्या मायभूमीला पारखं होऊन दुसऱ्या देशात आश्रयाला जाऊन रहाणं तिच्या प्राक्तनात लिहीलंय …. जिथं ती जन्मली ,वाढली ,लहानपणीचे निरागस सुंदर क्षण जगली त्या गावात , त्या नदीकिनारी , त्या शेतांमधे , त्या माणसांमधे ती परत जाऊ शकणार नाही इतकी व्यवस्था करून ठेवलये तिच्या आपल्या देशातल्या माणसांनी …. मातृभूमीपासून दुरावली ती .. तिच्या लेखनातून व्यक्त होण्याच्या बंडखोरीला ही शिक्षा ? तिच्या सच्च्या , वर्मावर बोट ठेवणाऱ्या शब्दांनी घायाळ झालेले तिला फासावर लटकवायला टपलेत … तसं बघायला गेलं तर तिचं माझं सगळच भिन्न , काही म्हणजे काही जुळणारं नाही अगदी काही बाबतीत विचारही … पण शब्दांतून व्यक्त होण्याची तिची पद्धत … तिचं आपल्या विचारांवर ठाम रहाणं .. लिहीतांना एक एक शब्द फक्त तिचाच .. तिच्या मालकीचा .. तिचा दास … जस वाटेल अगदी तसंच व्यक्त होणं …. पारदर्शी ! हेच कुठेतरी मला फार भावतं … मनानं तिच्या जवळ नेऊन पोहोचवतं … कुठ्ला खोटेपणा नाही की लपवाछपव नाही … दांभिकता नाही … मनात येणाऱ्या नैसर्गिक भावभावनांना जाणून त्या लिहून व्यक्त करणे म्हणजे त्यांना योग्य न्याय मिळणे … अभिव्यक्त स्वातंत्र्य तिने स्वःताचं स्वःताच पुरेपुर मिळवलंय …. मी आहे ही अशी आहे … माझे विचार असे आहेत माणि मी ते मांडत रहाणार … तुम्हाला आवडो वा ना आवडो …
    तिच्या लेखनाचा झंझावात माझ्या विचारांची बैठक कधी कधी मुळापासुन हादरवून टाकतो … गदागदा हलवतो …. सोशिकतेच्या
    सीमांविषयी पुन्हा पुन्हा विचार करायला भाग पाडतो .. माझ्या पासून शेकडो मैल लांब कुठेतरी असलेली ती पार कब्जा घेते माझ्या मनाचा … झिम्मा घालत रहाते माझ्या मनाच्या अंगणात … मला थोडीशी चिडवत … मी मात्र तटस्थ रहाण्याचा प्रयत्न करत रहाते ..

  • येळावीचा म्हातारा शेकोटीला आला…….।

    शाळा सोडून दोन वर्ष पूर्ण झाली होती मी आई समवेत दुसऱ्याच्या शेतात भांगलायला जात होतो. त्यावेळी एक दिवसाला पगार मला 75 पैसे व आईला सव्वा रुपया मिळत असे. वडील दुखण्यामध्ये गेलेले त्यांच्या वजना बरोबर दवाखान्यात पैसा घातला. देव देव उतारे खेतारे केले पण शेवटपर्यंत वडील दुखण्यातून उठले नाहीत.