नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
सालंकृत सुवर्णालंकारांनी सुशोभित झालेलं सौन्दर्य हे बाह्यरुप असतं ! तर सोज्वळ , सात्विक आचार , विचार , भावनांनी सजलेलं रूप हे आत्मरूपी अंतरंग असतं.!!
आज आषाढी एकादशी! त्यानिमित्ताने मागील काही जुन्या नाटकांचा अभ्यास करते वेळेस अचानक समोर 'संगीत संत कान्होपात्रा' नामक नाटक उभं ठाकलं. जास्तीचा अभ्यास करताना हे नाटक केवढं जुनं आहे हे लक्षात आलं.
१९३१ च्या काळात हे नाटक रंगभूमीवर आलं असं वाचनातून निदर्शनास आलं. १९ नोव्हेंबर १९३१ रोजी या नाटकाचा प्रथम प्रयोग झाला. या नाटकाला संगीत मा. कृष्णराव व विनायकबुवा पटवर्धन यांचं लाभलं.
नाटकात संत कान्होपात्रा यांच्या जीवनावर आधारित घडलेल्या काही ठळक प्रसंगांना नाट्य लेखक ना. वि. कुलकर्णी यांनी अधोरेखित केलं आहे.
असं म्हणतात की संत कान्होपात्रा या मंगळवेढ्याच्या श्यामा नामक गणिकेची मुलगी पण पूर्वकर्मानुसार व संचित पूर्वपुण्यानुसार लहानपणापासूनच भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या. त्यांची भक्ती इतकी थोर होती की प्रत्यक्षात परब्रम्ह विठू माऊलीला त्यांची तळमळ पहावली नाही आणि खरोखरच त्याने त्यांचा अंत न पहाता त्यांना हृदयात स्थान दिलं.
सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या संत कान्होपात्रा यांचे वास्तव्य पंढरपूर जवळ असलेल्या मंगळवेढ्यात होते. त्या अत्यंत रूपवान होत्या आणि म्हणूनच कर्नाटकातील बेदर बादशहाने त्यांना पळवून आणण्यासाठी त्याच्या सेवकाला धाडलं. कान्होपात्रा नेमाप्रमाणे एका विठ्ठल मंदिरात वीणा आणि चिपळ्या घेऊन भक्तीत तल्लीन झालेल्या असताना तो सेवक त्या घरी जाण्यासाठी बाहेर पडतील त्यावेळेस त्यांना पळवता येईल या दृष्टीने बाहेर उभा राहतो. बराच काळ बाहेर तात्कळल्यानंतर तो आत प्रवेश करतो आणि कान्होपात्रा यांच्या ध्यानात ती गोष्ट येते आणि त्या गर्भगृहात जाऊन पांडुरंगाच्या चरणांना घट्ट मिठी मारून त्याच्यापासून बचाव करण्याची भाक भाकू लागतात आणि इथेच त्या प्राण सोडतात.
संत कान्होपात्रा नाटकातील गाणी:
१)अगा वैकुंठीच्या राया
२)अवघाचि संसार सुखाचा
३)अशी नटे ही चारुता
४)जोहार मायबाप जोहार
५)दीन पतित अन्यायी
६)देवा धरिले चरण
७)धाव घाली विठू आता
८)नुरले मानस उदास
९)पति तो का नावडे
१०)पतित तू पावना
११)शर लागला तुझा गे
यातील 'अगा वैकुंठीच्या राया' या अभंगात त्यांची आर्तता अधिक दिसून येते. वैकुंठीच्या राया तुझ्या चरणाशी मला अखंड थारा दे, सखया विठ्ठला मला या भवनदीतून पार कर, नारायणा मला भक्तीचं दान देऊन माझ्या नरदेहाला गती दे, वासुदेवाच्या नंदना, रखुमाई वल्लभा आता तू मलाही पदरात घे साधारणतः असा भाव संत कान्होपात्रा यांचा त्यावेळी असावा असं मला वाटतं.
याच अभंगाची व्हिडीओ लिंक खाली देत आहे.
(किर्ती शिलेदारांच्या आवाजात)
https://www.youtube.com/watch?v=7qtZbvCNDxc
(पं. राम मराठे यांच्या स्वरात)
https://www.youtube.com/watch?v=azhXqtzIrFw
-- आदित्य दि. संभूस.
(अभिनेता, दिग्दर्शक, लेखक)
व्हिडीओ सौजन्य: मुकुंद मराठे व दीप्ती भोगले यांचे यूट्यूब चॅनेल.
२०/०७/२०२१.
आज बऱ्याच दिवसांनी घरी पावभाजीचा बेत होता . रविवार असल्यामुळे निवांतपणे दुपारच्या वेळेस होती मेजवानी…
लातूरच्या दवणहिप्परग्यात एका हाताचा शेतकरी राहतो. जिद्द, कष्टाच्या जोरावर या बहाद्दरानं १९७२ आणि आजवरच्या तमाम दुष्काळांना दणदणीत पराभूत केलं आहे. ७८ वर्षाचा हा शेतकरी एका हातावर ४७ वर्षे शेतातली सगळी कामं करतो. बुलेट, ट्रक, ट्रॅक्टर चार चाकी चालवतो. वाऱ्याच्या वेगानं घोडेस्वारी करतो.
पावसाळी सकाळ होती. माधवी घाईने बँकेत शिरली. कामाला भिडणार तेवढ्यात तिला साहेबांच बोलावणं आलं. शाखाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गेल्यावर त्यांनी नॉमिनेशन नाही अशा अकाउंटस्ची एक मोठी लिस्ट तिच्या हातात ठेवली. नॉमिनेशन नसेल तर डेथ क्लेमसाठी ग्राहकांचा वेळ व पैसे खर्च होतात.
सन २०१०च्या जानेवारीत बाळासाहेबांसोबत भेटीचा योग आला होता..हा फोटो त्या भेटीच्या वेळचा आहे. अर्थात मी बाळासाहेबांच्या भेट मागितली आणि ती मिळाली, अस काही घडायला मी काही मोठा नव्हतो. मी तर त्यांचा साधा शिवसैनिकही नव्हतो. परंतु काही गोष्टी घडण्यासाठी आपलं नशीब लागतं आणि ते नशिब फळण्यासाठी योगही यावा लागतो. तसंच काहीसं या भेटीबाबत घडल.
कोरा कागदात लक्ष्मी असते तो बाजारात विकला जातो , पण शाई लागलेला कागदात सरस्वती उतरते, तिची कीमत काय बाजारात….
होम quarantine झाल्यापासून सगळेच आपण आपल्याला आजूबाजूच्या भौतिक सुखाचा प्रचंड loss झालाय नाही का?
साधारण दहा-पंधरा मिनिटांचा अवधी गेला असावा. कुपीच्या तळाशी पायांची बोटं पूर्ण वाढलेली दिसू लागली. हळूहळू सगळं पाऊल आणि नंतर वरवर वाढत वाढत गुडघ्यापर्यंत पूर्ण पाय! मग वरवर जात जात मांड्या, कंबर पोट, हात, छाती असा क्रमाक्रमाने संपूर्ण आमदार प्रकट झाला! ही प्रक्रिया सुमारे सहा तास चालली होती. पण आम्हाला त्याची अजिबात जाणीव झाली नाही! ते अद्भुत दृश्य कल्पनेपेक्षाही अचाट होतं. आमदाराची आकृती पूर्ण होताच मी दादाचा हात हातात घेतला आणि झटकन ओढून त्याला उठवलं. आम्ही घाईघाईने बाजूला लावलेल्या पडद्यामागे गेलो. दादाला तिथे उभं करून मी अत्यंत काळजीपूर्वक परंतु त्वरेने कुपी काढून घेतली. कुपीसाठी अत्यंत हलकं पण पारदर्शक काचेसारखं आवरण बनवलं हेतं. त्याची घडी करून ते बाजूला ठेवून दिलं. आता आमदारसाहेब डोळे मिटलेल्या अवस्थेत तिथे उभे होते! कुठल्याही क्षणी ते डोळे उघडतील, त्यापूर्वी मला पडद्यामागे जाणं भाग होतं.
माझ्या आईच्या पिढीतले पणजोबांच्या घराला “तेंडोलकर युनिव्हर्सिटी” म्हणत. कोल्हापुरला राजाराम कॉलेज होते. पुण्यानंतर कुठे कॉलेज नव्हते, त्यामुळे कोंकण, सातारा, इथले सर्व विद्यार्थी तिथेच येत. महाविद्यालयीन अभ्यासाबरोबरच कसं रहावं, कसं वागावं, ह्याचे धडे त्यांना तेंडोलकरांच्या घरी मिळत. त्यामुळे ते आपलं शिक्षण तेंडोलकर युनिव्हर्सिटीत झालं आहे असं अभिमानाने सांगत. पहिली गोष्ट तिथे शिकवली जाई ती म्हणजे काम करणे महत्त्वाचे. तिथे राहिलेल्याला पुढे आयुष्यात कधीही कोणतेही काम करायला लाज वाटायची नाही. आजोबा स्वतः श्रमप्रतिष्ठा आचरणारे होते. दुसरी गोष्ट म्हणजे वायफळ खर्च न करणे. छानछोकीवर पैसे वाया न घालवणे. तिसरी गोष्ट निर्व्यसनीपणा. कोणतेही व्यसन लावून घ्यायचे नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti