जर एखादे काम आजच करावयाचे असेल, तर ते उद्यावर कशाला टाकता. ते उद्यावर ढकलू नका. तुम्हीच तुम्हाला आव्हान दिल्यास, तुमच्यातील आळशीपणा दूर पळेल. त्यासाठी तुम्ही तुम्हालाच आव्हान द्या.
दिरंगाई हा शब्द तुम्हाला माहित आहे काय? आपण कितीही पध्दतशीर असलो, तरीही हा आपल्या जीवनात हळू-हळू प्रवेश करीतच
असतो. आपण जे काही हळू-हळू मिळविलेले असते, त्याची घडी तो बिघडवून टाकतो आणि जेथे काही करावेसे वाटत नाही, अशा ठिकाणीच तो अचानक आघात करीत असतो. जी शक्ती तुम्ही जमविलेली असते, ती खर्चली जाते. याचा परिणाम म्हणून आपण पूढे वाटचाल करू शकत नाही. तुम्हाला अपयश आल्यासारखे वाटते आणि असे जर तुम्हाला वाटू लागले, म्हणजे तुम्ही दिरंगाईच्या स्थितीत आहात असे समजावे.
असे का घडते? हे समजावून घेणे फार आवश्यक आहे. तरच तुम्ही ते थांबवू शकाल. हे मोठ्या प्रमाणात असू शकते. जीवनामध्ये सगळ्यात सोपी गोष्ट जर कोणती असेल, तर ती म्हणजे आळशीपणा होय किंवा एखाद्या गोष्टीपासून आपले लक्ष विचलित होणे होय. यासाठी प्रथमत: गळणारा नळ थांबविला पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्वत: कार्यरत रहा. नुसतेच कार्यरत राहू नका, तर तुम्ही अविरत कार्यरत रहा. कर्तव्य किंवा कार्य हीच विश्रांती समजा.
कधी कधी काम पुन: पुन्हा केल्यामुळे त्रासदायक वाटू लागेल. परंतू हे लक्षात ठेवा की आपल्या जीवनातील सगळी कामे हि उत्साह वर्धक असतीलच असे नाही, तर काही क्षण हे कंटाळवाणे देखील असू शकतात. त्यासाठी तुम्ही तुमच्या मनाची समजूत घाला की हि तुमच्या जीवनातील तुमचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी केलेली तुमची गुंतवणूक आहे.
तुमच्या आयुष्यातील दिरंगाईबरोबर जर का तुम्हाला लढाई करावयाची असेल, तर तुम्ही तुम्हालाच वेळोवेळी आव्हाने द्या. त्यामुळे कंटाळा जाईल आणि तुमच्यात त्या स्फूर्तीदायक शक्तीचे संचारण होईल. त्यासाठी तुम्हाला जोखीमही उठवावी लागेल. त्यासाठी तुम्ही शूरपणाने ती जोखीम आपल्या अंगावर घ्या. आजपर्यंत ज्यांनी कोणी आपली साम्राज्ये स्थापन केलीत, ती त्यांनी आपल्या सुखावह स्थितीत निश्चितच स्थापन केलेली नाहीत. तर ती त्यांनी आपल्या प्रतिकूल स्थितीवर मात करूनच निर्माण केलीत. इतकेच काय, साम्राज्ये सोडाच, तर ज्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्यात आपले नाव कमावले ते त्यांनी स्वत: प्रतिकूल परिस्थितीवर मात करूनच मिळविले. त्यासाठी त्यांना वेळोवेळी झगडावे लागले. अनेक संकटाना सामोरे जावे लागले. आणि मगच ते नावारूपाला आलेत.
म्हणूनच उद्यावर कोणते काम सोडू नका. जे आजच करता येईल, ते आजच किंवा आत्ता करा. आपण ते जर कां उद्यावर सोडलेत, तरच दिरंगाईला आपल्या जीवनात वाव मिळेल व तो मिळतो देखील, कारण आपण आजचे काम उद्यावर टाकून ते देतच असतो.
हि दिरंगाई कशामुळे होत असते? तर आपल्या मनातील एका कप्प्यात असलेल्या भीतीमुळे किंवा अपयशाच्या कल्पनेमुळे आपण ती करीत असतो. “आपण ते करू शकणार नाही” किंवा “आपला अपमान होईल” किंवा “लोक आपल्याला हसतील” किंवा “लोक आपल्याला वेड्यात काढतील” किंवा “मला यश मिळणारच नाही” किंवा “मी अपयशीच होईन” किंवा मला हे जमणारच नाही” या भीतीपोटीच आपण ते कार्य करण्यास घाबरत असतो. तुमच्या मनातील शंका आणि तुमच्यातील आत्मविश्वासाची असलेली उणीव तुम्हाला हे करण्यास प्रवृत्त करीत असते. आणि तुम्ही समजत असता की हाच तुमचा संरक्षणात्मक पवित्रा आहे.
एकदा का उशीर झाला की तुम्ही तुमचे कार्य करण्याचे टाळत जाता. याचे कारण, एखाद्या नियोजित वेळेत ते तुमच्याकडून होईल असे तुम्हाला वाटत नाही. यावर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्यातील व्यवस्थापकाचा ताबा घ्या. तुम्हाला काय करायचे आहे, ते लिहून काढा किंवा एखादी “कार्य नोंद वही” तुमच्याजवळ ठेवा. त्यासाठी लागणारा वेळ, तुम्ही देवू शकणारा वेळ, इत्यादींची त्यामध्ये नोंद करून ठेवा. अग्रक्रमानुसार नोंद घ्या व तुमचा कामाचा अग्रक्रम ठरवा. तुम्हाला हे लिहून काढण्यासाठी त्याची मदत होईल. थोडीशी स्वयंशिस्त मात्र पाळा.
अशाप्रकारे तुम्हाला तुमच्या या नविन अवतारात लोकांनी पाहिल्यावर, तुम्हाला तुमचा बहुमान झाल्यासारखे वाटेल. तुमच्या नकळतच ते नवल घडेल. हे साध्य होण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्राला किंवा जवळच्या सहका-याला तुमच्यावर नजर ठेवण्यास सांगा. प्रत्येक दिवशी तुम्ही तुमच्या – “आज करावयाचे काम” – या नोंद वहीची दखल घ्या, ती रोजच्या रोज चाळून पहा. त्यामुळे कालचे काम, आजवर तर नाही ना ढकलले गेले आहे याची जाणीव सतत तुम्हाला होत राहील. जर तुम्ही तसे घडू दिलेत, तर ती तुमची दिरंगाई झाली असे समजा. विजयी वीर असे करीत नाहीत. आणि म्हणूनच आजचे काम आत्ता करा.
यासाठी पुढील मार्गाचा अवलंब आपल्या जीवनात करावयास शिका..............
विश्वासाने जीवनात कर, यशाला वश .........! कर्तृवानेच मिळव यश ...........!!! पक्का ठेव तू तुझ्या मनाचा विश्वास ...........! फक्त विजयाचा मनात धार तू ध्यास .............!!!
-- मयुर तोंडवळकर
जाहिरातीच्या युगात प्रमाणीकरण आवश्यक आहे. महाविद्यालयांनाही त्यामुळे संजीवनीच मिळणार आहे, पण त्यासाठी नॅककडे विधायक दृष्टिकोनातून बघायला हवे. नॅक ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, हे मान्य करावे लागेल, अन्यथा सारी शैक्षणिक प्रक्रिया गोंधळाची होऊन जाईल.
सुशांत सिंहच्या मृत्यूपासून अभिनेत्री कंगना राणावतने बॉलिवूड मधील नेपोटिझ्म विरोधात बोलायला सुरुवात केली आहे. नंतर या केसला ड्रॅगचा अँगल जोडल्या गेल्यावर ड्रग्ज माफियांविरोधातही कंगणाने आवाज उठवला आहे. एकाद्या क्षेत्रात काही चुकीचे घडत असेल तर त्यावर आवाज उठवलाचं पाहिजे. त्यात काहीही गैर नाही. आणि, व्यवस्थेलाही प्रश्न विचारण्याचा आपल्याला अधिकार आहेच. पण, हे करत असताना तारतम्य ठेवून बोलणे अपेक्षित असते. महाराष्ट्र पोलिसांबाबत कंगणाने वापरलेली भाषा किंवा मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करण्याचा प्रकार कोणत्याच दृष्टीने समर्थनीय ठरणार नाही.
संदर्भ – विविध टी. व्ही. चॅनलवरील बातम्या, भारताचा POK मधील तीन दहशतवादी कँपस् वर यशस्वी हवाई हल्ला
मराठी भाषिकांचे महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात येण्यापूर्वी विदर्भ प्रदेश हा तत्कालीन सी.पी. अॅण्ड बेरार (मध्य प्रांत आणि वऱ्हाड) या प्रांताचा एक भाग होता.
लहानपणी अध्यात्म वगैरे इतकं काही माहित नव्हतं. पण एक मात्र खरं आहे की, संध्याकाळी देवापुढे दिवे लागणं झाली की, शुभंकरोतीचे स्वर घरात निनादु लागायचे. आजीच्या मागोमाग एकएक श्र्लोक म्हणत म्हणत केव्हा दासबोधातील चरणं संपली हे कळायचंही नाही.
भारताचा इतिहास चाळतो म्हटले तर इतिहासात ठिकठिकाणी, पानापानावर मराठी माणसाच्या कर्तृत्वाचा ठसा उमटलेला दिसतो. लढाईचे मैदान असो अथवा साहित्याची मुलूखगिरी, मराठी माणसाचा आदराने उल्लेख केल्याशिवाय इतिहास पुढे सरकूच शकत नाही. अगदी अलीकडील काळापर्यंत ‘मराठी पाऊल’ सगळ्याच क्षेत्रात पुढेच होते.
धंद्यापेक्षा सामाजिक बांधीलकीशी वचनबद्ध असलेल्या देशोन्नतीसाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा केवळ बातम्यांचा विषय कधीच नव्हता. त्यामुळेच विदर्भ किंवा मराठवाड्यात शेतकऱ्यांची आत्महत्या ही बातमीही नव्हती अगदी तेव्हापासून शेतकऱ्यांसमोर मांडून ठेवलेल्या संभाव्य संकटाची जाणीव होऊन ‘देशोन्नती’ने या प्रश्नावर जनजागरण करायला सुरुवात केली होती. मी स्वत: देशोन्नतीच्या माध्यमातून आणि व्यत्ति*श: या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करीत होतो.
श्रावणाच्या महिन्यात आपण नाग पंचमीचा सण साजरा करतो. हल्लीच्या काळीं त्या उत्सवासाठी सर्प-नाग यांना कसें वागविलें जातें, हा एक सामाजिक तसेंच animal-rights चा विषय आहे. तो महत्वाचा आहेच, पण प्रस्तुत लेखात आपण तिकडे वळणार नाहीं आहोत. या लेखाचा focus आहे, या सणामागच्या पार्श्वभूमीसंबंधीची चर्चा करणे, हा.
पिकांमध्ये बदल करणे, पीक पद्धतीत बदल करणे, नगदीच्या इतर पिकांचा विचार करणे, उत्पादक आणि विक्रेता या दोन्ही भूमिका स्वत: करून पाहण्याचा प्रयत्न करणे, यावर कधी विचारच झाला नाही. शेवटी कष्ट म्हणजे केवळ ढोर मेहनत नसते. कष्टाच्या व्याख्येत मेहनतीच्या जोडीला बुद्धीची, कल्पकतेची जोड असतेच.
Copyright © 2025 | Marathisrushti