(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

  • हीच आहे योग्य वेळ!

    प्रकाशन दिनांक :- 11/04/2004
    एखाद्या सरकारी खात्यात ‘सद्भावना सप्ताह’ दरम्यान जसे वातावरण असते तसे वातावरण सध्या संपूर्ण देशात दिसून येत आहे. विशेषत: राजकीय पक्षाशी संबंधित नेते आणि कार्यकर्ते चेहऱ्यावर विलक्षण माधुर्य ठेवून वावरत आहेत. अर्थात त्यामागे सद्भावनेचा भाव किती आणि स्वार्थाचा मुलामा किती, हा वेगळा विषय ठरतो.

  • भारतीय मानसिकता

    पुत्र असावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा, या उक्तीची जाणीव मा. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून जाणवू लागली, व 8 नोव्हेंबरला ती खऱ्या अर्थाने सार्थ ठरली. 125 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात, घडवली जाणारी महत्वाची घटना, फक्त 2 लोकांनी नियोजित करून, रात्री 8 वाजता, लोकांच्या समोर ठेवणे, हि निश्चितच धाडसी कृतीच म्हणावी लागेल.

    आपले नशीब फार चांगले म्हणूनच मोदींना 284 चे स्पष्ट बहुमत मिळाले, आणि एक पांगळे सरकार देशावर लादण्याची नामुष्की टळली. 70 वर्षात वारेमाप काळा पैसा जमावणाऱ्यांची पहिल्यांदा झोप उडाली आहे. कर बुडवून अफाट मालमत्ता गादीखाली, माळ्यावर, भिंतीत, जमिनीत ठेवणारी जमात, खडबडून जागी झाली आहे. मोदींच्या जीवाला ह्याच लोकांचा मोठा धोका आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही.

    या देशाचा हजारो वर्षाचा इतिहास आहे, घरचा भेदी हा देशावर लागलेला शाप आहे, या वेळेस असे भेदी मिळणारच नाहीत याची खात्री देता येणार नाही. रात्र वैऱ्याची आहे, त्यामुळे डोळ्यात तेल घालून जागे राहण्याला पर्याय नाही.

    मोठया प्रमाणात जंगम व स्थावर मालमत्ता करणाऱ्यांच्यावर सुद्धा येणाऱ्या काही दिवसात दणका बसू शकतो. कित्तेक लोक बेनामी संपत्ती करून बसले आहेत, त्याचा हि पर्दाफाश काही दिवसात होऊ शकेल. आजपर्यंत 97 टक्के पैसा फक्त आडव्या वर्तुळात फिरत राहिला ज्याने दुबळ्या अर्थकारणाला जन्म दिला व पैसा फक्त तीन टक्के लोकांच्या हातात राहिला. तो उभ्या वर्तुळात फिरला तरच,तळागाळात मोठया प्रमाणात पैसा पोहोचतो व सुदृढ अर्थव्यवस्था तयार होते.

    भारतीय लोकांना घाईच फार, ट्रेन जरी स्टेशनवर अर्धातास थांबणार असली तरी, आरक्षित डब्यातुन उतरण्यास व चढण्यास घाई करतील, तीच परिस्थिती, उच्च वर्गीय लोक विमानातून उतरताना करतात. पायलट कुर्सी कि पेटी छोड दे असे म्हणताच, लोक तडक उभे राहतात, व वरती ठेवलेल्या ब्यागा काढण्याची घाई करतात. इतके करून बाहेर जाऊन मात्र कनवेअर बेल्टवर समान येण्याची वाट पाहत 20-25 मिनिटे घालवतात. तीच गत पैसे बद्दलणाऱ्यांची बँकेत दिसली. 30 डिसेंबर पर्यंत सवलत असतानाही, पहिले 3-4 दिवस बँकेत झुंबड करण्याची काही आवश्यकता न्हवती. पण आमभारतीयांची मानसिकता प्रत्येक ठिकाणी घाई करण्याची असते, ते इथेही सिद्ध झाले. अशीच घाई मात्र टॅक्स भरण्यासाठी मात्र करताना दिसत नाहीत. थकवलेली वीज, पाणी, यांची बिले जेव्हा कापायची नोटीस येते तेव्हाच भरली जातात हे चित्र कमी अधिक प्रमाणात देशात सगळीकडे सारखेच आहे.

    इंदिराजी नंतर मोदीजी हेच सर्वार्थाने या देशाला धडाडीचे पंतप्रधान म्हणून लाभले, असे आपण म्हणू शकतो. बँकेत लांबच लांब रांगा रहाणे हे मोदींचे अपयश नसून, काही शाखेतील कर्मचाऱ्यांची नियोजनाची बेजबाबदार वृत्ती म्हणू शकतो, हे मी उदाहरणाने सांगू शकतो.

    काही शाखेत 10 तारखेला 10 वाजता नोटा वाटप सुरु झाले, एकूण किती लाखाच्या नोटा त्या शाखेत सरकारने दिल्या आहेत, या वरून तेथील प्रबंधक नोटा बदलीसाठी लागलेल्या रांगेतील अंदाजे किती लोकांना नोटा मिळतील, हे सांगून इतरांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगू शकले असते, व लोकांची ससेहोलपट थांबवू शकले असते. 12.30 ला कॅश संपली व मी प्रबंधकाना 1 वाजता, कधी कॅश येणार असे विचारल्यावर, त्यांनी 4 वाजता येईल असे उत्तर दिले, हेच त्यांनी रांगेतील लोकांना सांगितले असते तर लोक घरी निघून गेले असते. मी केबिन बाहेर येऊन लोकांना असे सांगितले, तशी गर्दी ओसरू लागली. या मुळे फक्त पैसे भरणारे लोकच बँकेत थांबले, आणि गर्दी आटोक्यात राहिली. जे काम व्यवस्थापकाचे होते, ते मला करावे लागले. काही शाखेत दोन चार महिन्यात रिटायर होणारे कर्मचारी नोटा बदलण्यासाठी नियुक्त केले, त्यांना फक्त एक बोटाने किबोर्ड चालवता येत होता, त्यामुळे चार हजार बदलीसाठी प्रती व्यक्ती अंदाजे 5 मिनिटे खर्ची होत होती, जे काम 23-25 वयाच्या व्यक्तीला दिले असते तर अडीच मिनिटात झाले असते, व रांगा लवकर संपल्या असत्या.

    काही मोजक्याच बँक शाखेत खूप चांगले चित्र होते, रांगेतील लोकांना पाणी, चहा वाटप करण्यात आले. कर्मचारी वर्ग अदबीने वागत होता, तसेच जेष्ठ नागरिकांना मदत दिली जात होती. नोटा बदलण्याचा वेग हि अपेक्षित असा चांगलाच होता.

    असे छोटे छोटे निर्णय घेतले असते तर, टीव्ही वर बातम्यात दिसणाऱ्या लांबच लांब रांगा दिसल्या नसत्या, लोकांची छळणूक झाली नसती, व विरोधी नेत्यांची ओरड दिसली नसती. अश्या बाळबोध युक्त्या अमलात आणल्या असत्या तर, नाहक काही लोकांचा बळी गेला नसता.

    -- विजय लिमये

  • भाडेकरूंचे भले होईल’

    मोडकळीस आलेल्या व धोकादायक ठरविण्यात आलेल्या भाडेकरूयुक्त तसेच मूळचे ठाणेकर राहत असलेल्या अनेक इमारती जमीनदोस्त करून आता जवळपास दीड ते दोन वर्षे होत आली. काही इमारतींबाबत तर सहा ते आठ वर्षे होत आली. नव्या गृहनिर्माण धोरणात म्हाडा इमारतीसाठी जास्तीचे चटई क्षेत्र मंजूर करण्यात आले आहे. दाटीवाटीच्या क्षेत्रासाठीही क्लस्टर योजनेखाली अतिरिक्त चटई क्षेत्र मंजूर करण्यात आले आहे. झोपडपट्टय़ांच्या विकासासाठी ‘एसआरए’ योजनेद्वारे विकासाचे दालन खुले करण्यात आले आहे. मात्र मोडकळीस आलेल्या अधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाविषयी कोणतीही ठोस भूमिका घेण्याची शासनाची तयारी नाही. अनेकांनी त्यासाठी प्रयत्न केले, पत्रव्यवहार केला. मात्र ‘आपले सरकार’ म्हणविणाऱ्यांनी अजूनही दाद दिलेली नाही. काही ठिकाणी तर अगदी २४ तासांची नोटीस देऊन भाडेकरूंना रस्त्यावर यायला भाग पाडण्यात आले. भाडय़ाचे असले तरी गेली तीन ते चार दशके कुटुंबे इथे वास्तव्य करीत होती. तेच त्यांचे विश्व होते. त्यांना अचानक १६० चौरस फुटांच्या रेंटल हाऊसनामक खुराडय़ात जीवन कंठावे लागले. पुन्हा त्यासाठी महापालिकेला दोन हजार रुपये दरमहा भाडेही भरावे लागते. पाण्याचे वेगळे पैसे द्यावे लागत आहेत. या बदल्यात कोणतीही सेवा पालिकेकडून दिली जात नाही. दूषित पाण्याचा पुरवठा झेलावा लागत आहे. या रेंटल हौसिंग इमारतींना सुरक्षारक्षक नाहीत. तसेच उद्वाहक चालक नाहीत. जनरेटर चालवणारा नाही तसेच जनरेटरसाठी डिझेल मिळवण्यासाठीही बरेच प्रयत्न करावे लागत आहेत. विशेष म्हणजे अतिधोकादायक म्हणून तातडीने खाली करण्यात आलेल्या हरिनिवास नाका येथील यशवंत कुंज आणि आजी कृपा या इमारती अर्धवट अवस्थेत पाडून ठेवण्यात आल्या आहेत व त्या भग्नावस्थेत उभ्या आहेत. भाडेकरू मात्र आपल्या कर्माला दोष देत आहेत.

    धोकादायक इमारतीमधील भाडेकरूंना तातडीने बाहेर काढणाऱ्या प्रशासनाने तो कर्तव्यकठोरपणा गोखले रोड आणि राम मारुती रोडवरील व्यापाऱ्यांबाबत मात्र दाखविला नाही. उलट त्यांना अभय दिले. त्यामुळे भाडेकरूंच्या जखमेवर जणू काही मीठ चोळले गेले. विखुरलेले भाडेकरू आता भयभीत झाले आहेत. त्यामुळे मालक/विकासक आता ‘फोडा आणि झोडा’ या तंत्राचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या इमारतींच्या जागी पुनर्विकास प्रस्ताव आणण्यासाठी पुढील मार्गदर्शक तत्त्वे ठाणे महानगरपालिकेकडून जाहीर केली जाण्याची आवश्यकता आहे.

    १)इमारत खाली करण्यात आल्यापासून तीन महिन्यांत मालक/ विकासकाने भाडेकरूंच्या सहमतीने पालिकेकडे पुनर्विकास प्रस्ताव सादर केलाच पाहिजे.
    २) इमारत खाली करताना भोगवटाधारक अथवा त्यांचे वारस यांचे बायोमॅट्रिक सर्वेक्षण करण्यात यावे व याचा अंतर्भाव असलेला विकास प्रस्तावच महापालिका मंजूर करेल.
    ३) सूचना १ व २ प्रमाणे सादर झालेले विकास प्रस्ताव शहर विकास विभागाकडून दोन आठवडय़ांच्या आत मंजूर करण्यात यावेत.
    ४) मंजूर पुनर्विकासाचे प्रस्ताव ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाच्या संकेतस्थळावर भाडेकरूंसाठी उपलब्ध करून देण्यात यावेत. त्यामुळे विखुरलेल्या भाडेकरूंना दिलासा मिळेल.
    ५) मंजूर विकास आराखडय़ाचा अंतर्भाव असलेले भाडेकरूंचे समजुतीचे करारनामे मालकाने/विकासकाने पालिकेस सादर केल्यानंतरच या विकास प्रस्तावाच्या बांधकामास बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यात यावा.
    ६) या बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी भाडेकरूंना आपला स्ट्रक्चरल इंजिनीअर, आर्किटेक्ट नेमण्याची मुभा देण्यात यावी.
    ७) पालिकेकडून देण्यात आलेली प्रत्येक मंजुरी तसेच घेण्यात आलेली प्रत्येक हरकत पालिकेच्या संकेतस्थळावर भाडेकरू/नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली पाहिजे.
    ८) वापर परवाना दिल्याशिवाय नवीन इमारतीचा ताबा भाडेकरूना देऊ नये.
    ९) सर्व भाडेकरूंनी वापर परवाना मिळाल्यापासून एक महिन्यात ताबा घेणे बंधनकारक असावे.
    १०) वापर परवाना मिळाल्यापासून तीन महिन्यांच्या आत गृहनिर्माण संस्थेचे नोंदणीकरण अनिवार्य करावे.

    -- महेंद्र मोने,
    जागरुक नागरिक, भाडेकरूंचे प्रतिनिधी

    २१ मार्च २०१७ च्या “लोकसत्ता” मध्ये प्रकाशित लेख

  • जिवापेक्षा काहीही मौल्यवान नाही…  

    आपल्या देशातील मागील काही महिन्यातील आत्महत्येच्या घटना पाहिल्या तर त्यातील काही आत्महत्या विचार करण्यास प्रवृत्त करणार्‍या होत्या. ज्या आत्महत्या कोणा अशिक्षित व्यक्तीने नव्हे तर चांगल्या उच्चशिक्षित लोंकानी केलेल्या होत्या .

  • कत्तल गोवंशाचीच नव्हे समृध्दी आणि मूल्यांचीहा!

    प्रकाशन दिनांक :- 20/03/2005

    बहुसंख्यकांची इच्छा प्रमाण मानणे हेच लोकशाहीचे मूलभूत बीज आहे. संसद, विधिमंडळ, मंत्री, खासदार, आमदार या सगळ्या लोकशाही वृक्षाच्या शाखा- उपशाखा मूळ बीजाच्या पोषणातूनच फुलत गेल्या, फळत गेल्या. परंतु दुर्दैवाने या बाह्य विस्ताराच्या कौतुकात मूळ बीजाकडे कायम दुलर्क्ष होत आले.

  • पुरस्कार उदंड जाहले

    हल्ली पुरस्कारांचा महापूर आला आहे.गल्ली ते दिल्ली त्याचा सुकाळ आहे. देणारे आणि घेणारे त्यासाठी उतावीळ आहेत. बालवाडी पासून त्याची सुरुवात होते.आमच्या बंड्या भाषणात पहिला आला आहे.नाव न सांगता येणारा बंड्या स्वातंत्र्य याविषयावर बक्षिस मिळवतो.

  • करोडोंच्या संपत्तीचे डोहाळे

    गेल्या काही दिवसापासून मला करोडो रुपयाची संपत्ती मिळण्याचे डोहाळे लागले आहेत, कोरड्या उलट्या सारख्या येतात. कारण?

    1. मला राजस्थान वरून सतत फोन येतो, हमारे पास हमारे पूर्वज्योंका सोना मिला है, जो हमे आधे दाम में बेचना है। आप जोधपूर आकर देख लो, और पसंद आये तो डील पक्का करेंगे. राजस्थान मध्ये याला कोणी मिळत नाही का हे विकण्यासाठी, हा प्रश्न मला नेहेमी सतावत रहातो.

    2 आजकाल कोणत्यातरी आफ्रिकेतील देशातील बॉब, जॉन, वगैरे माणसाचा sms दर दोन दिवसांनी येतो. 34 ट्रिलियन डॉलर्स माझ्या खात्यात जमा करण्यासाठी आतुर झाला आहे. कारण माहित नाही. माझा फोन नंबर त्याला कसा मिळाला, हे न उलगडणारे कोडे आहे.

    3. युरोपियन बँकेतील मॅनेजर मला इमेल पाठवत राहतो, अभिनंदन या वाक्याने सुरुवात होते, कोणत्या तरी अनामिक माणसाचे 100 कोटी त्यांच्या बँकेत पडून आहेत, त्यातील 20 कोटी युरो, मला ते देऊ इच्छित आहेत, तरी लवकरात लवकर दिलेल्या फोन वर संपर्क साधणे.

    4. लहानपणी 9 अंकांची कोडी सोडवा लाखोंची बक्षिसे मिळवा, असे पेपरमध्ये लिहून येत असे, पहिले बक्षीस कार, दुसरे 2 इन 1 रेडिओ. पहिले बक्षीस कधीच लागत नसे. नेहेमी 2इन1 रेडिओचे बक्षीस मिळत होते. 15 पैशाचे कार्ड दिल्ली, जालंधर, आग्रा, याच शहरात पाठवावे लगे. चार दिवसात दुसऱ्या नंबर चे बक्षीस मिळाल्याचे पाकीट येत असे. अभिनंदनाने सुरु होणारे पत्र, पोस्टेजसाठी रु 500 पाठवा म्हणून संपत असे. माझ्या जीवनात अभिनंदनाचा वर्षाव या पत्रापासून सुरु झाला तो आजपर्यंत सुरूच आहे.

    5. या शिवाय आजकाल गोड आवाजातील मुलींचे फोन वरचेवर येतात, कोणतेच कागदपत्र न मागता, मला रु 10 लाख कर्ज ज्याला पर्सनल लोन म्हणतात, देण्यास त्या उतावीळ असतात.

    6. अश्याच मुलींचे फोन आसान किस्तो पे प्लॉट, विकण्यासाठी येतात, रु 600 पर sq feet, भावाचा प्लॉट, हि बया मला रु 200 च्या भावात देण्यासाठी कासावीस झालेली असते. 2 वर्षात डबल, 3 वर्षात चारपट होणार याची खात्री देते. मला सांगा हिचा महिन्याचा पगार मिळण्याची हि खात्री देऊ शकत नाही, ती मला चारपट पैसे मिळण्याची खात्री देते.

    माझा देव वरून हे सर्व पहात असतो, आणि मला करोडपती होण्यापासून वंचित ठेवतो. हे चांगले का वाईट हे संजण्याइतके आपण पण सुजाण आहात अशी मी आशा करतो.

    धन्यवाद

    विजय लिमये

  • स्वतंत्र्य मिळाले आणि तुडवले बाराच्या ठोक्याला

    ऑगस्टच्या मध्यरात्री ठीक बाराच्या ठोक्याला लाल किल्ल्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक उतरवून भारतीय तिरंगा फडकविण्यात आला. वास्तविक आपण सूर्यपूजक, प्रकाशाचे उपासक, उत्तररात्रीचा प्रहर कोणत्याही शुभ कार्याला आपण वर्ज्य समजतो. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्याचा जयघोष आपण उगवत्या सूर्याच्या साक्षीने करायला हवा होता.

  • महत्वाचं काय?

    माझ्या कार्यक्रमांमध्ये मी बरेचदा एक प्रश्ण विचारते- तुम्ही स्वतःवर आणि आपल्या आयुष्यावर प्रेम करता का? आणि श्वास घेण्याच्या आधीच काहीही विचार ना करता बहुतांश उपस्थित उत्तर देतात- "हो आम्ही प्रेम करतो". मग माझा दुसरा प्रश्ण "इतका प्रेम करता तर स्वतःला इतका त्रास का देता?"

    हेच दोन प्रश्ण मी तुम्हालाही विचारते. काय उत्तरे आहेत तुमची? थोडा विचार करा आणि नंतर उत्तरे सांगा स्वतःला. तुम्ही म्हणाल, "आम्ही कुठे स्वतःला त्रास देतो..ते तर दुसरे लोक आहेत जे सुखाने जगू देत नाही." खरंच दुसरेच तुम्हाला त्रास देतात का?

    मागच्या वेळी तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास झाला ते आठवा. कुणी तरी उलटून बोलला? कुणी जाणतेपणी अपमानजनक बोलून गेला? तुमच्याकडून काम घेत असतांना तुम्हाला कुणी नोकरासारखं वागविलं? बॉस सारखा घालून- पडून बोलतो? सासू सगळं केल्यावरही तक्रार करते? सून मनासारखा स्वयंपाक करत नाही? इंटरव्हिव मध्ये पास होत नाही? मित्र सतत आपल्या पैश्याचे प्रदर्शन करून खाली दाखवतो कि आणखीन काही कारण आहे तुमच्या त्रासाचे?

    कारण कुठलही असो परत एकदा विचार करून पहा कि कुणी कसही वागलं तरी तुम्हाला त्रास त्यांच्या वागण्याचा होतो कि दुसरं काही कारण आहे?

    सखोल विचार केलात तर लक्षात येईल कि प्रत्येक व्यक्ती तिच्या मनाला आणि बुद्धीला पटेल असं वागते. पण आपली अपेक्षा असते कि सगळ्यांनी फक्त आपल्याला बरे वाटेल असेच वागावे. आणि तसे ना झाल्यास आपल्याला त्रास होतो. पण दुसऱयांनी आपल्यासाठी स्वतःला का बदलावे? तुम्ही स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी स्वतःमध्ये बदल आणताहेत का?

    तो तसा वागला म्हणून आपण ती घटना होऊन गेल्यावरही सारख तेच आठवून आतमध्ये धुमसत राहतो. त्रास कुणाला होतोय? आणि तो कोण देतोय? ... त्या व्यक्तीने जे केले ते ४ दिवसांआधी संपलेही. आता जे तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय तो त्या व्यक्तीची जवाबदारी नाही. तो गेला. त्याला कदाचित कल्पनाहि नसेल कि तुम्ही स्वतःला अशी शिक्षा देत आहात ते. पण तुम्ही मात्र शक्य तेवढी कारणे शोधून दुसर्याला नावे ठेवण्याचे कारण धरून स्वतःला छळत आहात.

    एकदा विसरून तर पहा! त्याच्यासाठी नाही. स्वतःसाठी. पण प्रश्न असा आहे कि तुम्ही जितका त्या व्यक्तीचा राग करता त्याहून जास्तं स्वतःवर प्रेम करता का? आणि मग तुम्हाला माझ्या पहिल्या प्रष्णांचे खरे उत्तर मिळेल.

    नुसत प्रेम करतो म्हणणं म्हणजे प्रेम होत नसतं. स्वतःवर प्रेम असेल तर स्वतःच्या आनंदासाठी, सुख शान्ति साठी तुम्ही कुणाशी वैर घेणार नाही आणि कुणी तुमच्याशी वाईट वागलं तर त्याला जीवाशी लावून बसणार नाही. ती व्यक्ती महत्वाची असेल तर मैत्री चा हाथ तुम्हीच पुढे करा. महत्वाची नसेल तर पाठ फिरवून चालते व्हा. स्वतःला खरे सिद्ध करण्याने तुम्हाला तुमची सुख शांती परत मिळण्याची शक्यता कमीच आहे, परंतु त्या प्रक्रियेत दुसर्यांना तर सोडूनच द्या तुमचं मन कडवट होऊन जाईल आणि शान्ति तर सोडाच पण आनंदही दुरावले.

    प्रत्येक भांडणाच्या किंवा वादाच्या परिस्थितीत स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा, " मी दुसर्यावर जितका राग करतो त्यापेक्षा थोडं तरी जास्तं प्रेम स्वतःवर करतो का?"

    मूळ लेखक - सपना शर्मा

    फेसबुकवरुन संकलन - नचिकेत पाध्ये

  • जगण्यासाठी पिकवा!

    हिरव्या बोंडातून फुलणारा पांढरा शुभ्र कापूस लहान मुलाच्या चेहऱ्यावरील निरागस हास्याची आठवण करून देतो; परंतु दैव विसंगती बघा, हाच कापूस शेकडो शेतकऱ्यांच्या घरात मृत्यूची काळी छाया बनून वावरतो आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य,त्यांच्या जीवनातला आनंद या पांढऱ्या कापसाच्या काळ्या छायेत पार वितळून गेला आहे. काल झाले ते आज होणार नाही,या वेड्या आशत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तीन पिढ्या बरबाद झाल्या.