(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

  • विचार, विचार करण्यायोग्य किंवा विचार करण्याजोगे …………

    आपल्या आयुष्याला घडविणारे जे विचार थोरामोठ्यांनी प्रगट केलेत, तेच विचार थोड्या वेगळ्या पद्दतीनी पाहिल्यास त्यातुन प्रगत्नारे विचार दर्शन.

  • घटस्फोट आणि भारतीय संस्कार…

    आपल्या देशात हल्ली घटस्फोटाचं प्रमाण वाढू लागलयं हा कित्येकांसाठी चिंतनाचा आणि चिंतेचा विषय ठरू लागलेला आहे.

    आपल्या देशातील हे वाढतं घटस्फोटाचं प्रमाण दिवसेन- दिवस वाढतच जाणार आहे त्यामुळे भविष्यात आपल्या देशातील घटस्फोटाचं प्रमाण कमी होईल या भ्रमात कोणीच राहाता कामा नये आणि ते प्रमाण कमी व्हाव म्ह्णून प्रयत्न करणे म्ह्णजे उंठावरून शेळ्या हाकण्यासारखे आहे. त्यामुळे घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणामुळे भविष्यात उद्भवणार्‍या समस्यांना सामोर जाण्यासाठी समाजाची मानसिकता तयार व्हायला हवी.

    प्रेमविवाहाचं वाढत प्रमाण आणि घटस्फोटाचं वाढत प्रमाण याचा परस्पराशी काहीही संबंध नाही तो संबंध विनाकारणच लावला जातो. स्त्री-परुष समानतेच वारं, स्त्रियांची झालेली सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती, पुरुषांची ढासळती नैतिकता, समाजातील वाढता स्वैराचार आणि होत चाललेला सांस्कृतिक र्‍हास या वाढत्या घटस्फोटाच्या मुळाशी आहे. आज आपल्या देशात घटस्फोट रोखण्यासाठी जो काही आटा - पिटा केला जातोय तो निरर्थकच म्हणावा लागेल.

    आज आपल्या देशात समलैंगिक विवाहांना, लिव्ह-ईनला जवळ – जवळ स्वीकारलं आहे ना मग तसचं आज ना उद्या घटस्फोटांनाही स्वीकारावं लागणारचं आहे. पूर्वीच्या काळी फक्त शरीर सुखासाठी लग्न होत नसतं पण आता ती फक्त शरीर सुखासाठीच होतात हे मान्यच करावं लागेल कारण आज आपल्या देशात होणार्‍या घटस्फोटासाठी जोडीदार शरीरसुख देण्यास असमर्थ अथवा त्याचे असणारे विवाह बाहय संबंध अथवा त्याची व्यसनाधिनता अशी कारणेच पुढे केली जातात. ही सर्व कारणे पूर्वी अस्तित्वात नव्हती का ? होती ना ? पण त्यावेळी सामाजिक दबावामुळे सहसा कोणी घटस्फोट घेण्याच्या भानगडीत पडत नसे आणि तेंव्हा पत्नी – पतीकडून घटस्फोट मागण्याचे प्रमाण कमी होते. आज जर नवर्‍याने बायकोला घटस्फोट दिला तर तिला अबला म्हटले जाते. आणि बायकोने नवर्‍याला घटस्फोट दिला तर त्याला नामर्द समजले जाते.

    आज आपल्या देशात घटस्फोटाचं प्रमाण वाढतय त्याला स्त्री- पुरूष दोघेही सारखेच जबाबदार आहेत हे ही लक्षात घ्यायला हवे. वाढत्या घटस्फोटाला फक्त पुरूषांनाच दोष नाही देता येणार. स्त्रियांच्या व्यसनाधिनतेच आणि ढासळत्या नैतिकतेच प्रमाण समाजात मोठ्या प्रमाण वाढू लागलेल आहे सध्या समाजात घडणार्‍या गुन्हयात स्त्रियांचा सहभाग दखल घेण्याजोगा दिसू लागला आहे. घटस्फोट हे प्रकरण हल्ली कित्येकांच्या जीवावरही बेतू लागलेलं आहे.

    विवाहसंस्था ज्या उद्देशाने अस्थित्वात आलेली होती आता तो उद्देशच नाहिसा झालेला आहे. समर्पण, त्याग, विश्वास, नात्याशी बांधिलकी हया गोष्टी लग्न संस्थेतून हद्दपार झालेल्या आहेत. आज काही लग्न बरीच वर्षे टिकतात तेंव्हा लोकांना आश्चर्य वाटत पण ती लग्न खरोखरचं टिकलेली असतात की टिकवलेली असतात हे जाणून घेण्याचा कोणी प्रयत्न करतो का ? पुर्वी जेंव्हा संस्कार शाबूत होते तेंव्हा नवरा- बायको दोघेही शेवटच्या श्वासापर्यत लग्न टिकविण्याचा प्रयत्न करत असत. नवरा – बायकोसारखे संबंध नसताना फक्त जगासाठी नवरा-बायको म्ह्णून एका छताखाली राहात असत फक्त आपल्या मुलांसाठी ! पण आता स्त्रियांची मुलांबाबतची ती बांधीलकी ही ढासळू लागली आहे.

    पाश्चात्यांच वाढत अंधानुकरण या बाबतीत आपल्या गळ्याशी येणार आहे कारण पाश्चात्यांची घटस्फोट पचविण्याची मानसिकता कधीच तयार झालेली आहे पण आपल्याकडे ती मानसिकता तयार करण्याऐवजी आपण उगाच घटस्फोटाचं प्रमाण कमी करण्यासाठी झटतो आहोत.

    नवरा बायको या दोघांपैकी एकाला जेंव्हा घटस्फोट हवा असतो तेंव्हा तो एकानं नाकारण म्ह्णजे मुर्खपणा आहे कारण त्यातून मनस्ताप आणि आयुष्यभराची फरफड याशिवाय काहीही साध्य होत नाही. पूर्वी पुरूषांना एकापेक्षा जास्त विवाह करण्यास समाज मान्यता होती त्यामुळे पूर्वी घटस्फोटाच प्रमाण कमी होत असं नाही म्ह्णता येणार कारण आपल्या संस्कृतीने घटस्फोट कधी मान्यच केलेला नव्हता. आता फक्त घटस्फोट घेऊन प्रश्न सुटत नाही कारण त्यानंतर घटस्फोट घेणारे वेगवेगळ्या जोडीदारांसोबत पुन्हा विवाह करतात त्यातून जन्माला येणारी मुलं आणि पूर्वीच्या विवाहातून जन्माला आलेली मुलं यामुळे अत्यंत गंतागुंतीचे नातेसंबंध निर्माण होतात त्यामुळे पुढची पिढी गुन्हेगारी प्रवृत्तीची म्ह्णून पुढे येण्यास हातभार लागतो.

    आता आपल्या देशातील वाढत्या घटस्फोटाचं प्रमाण रोखण्यापेक्षा आपली भारतीय संस्कृती आणि संस्कार जपण्यासाठी प्रयत्न होण्याची अधिक आवश्यकता आहे नाही का ?

    लेखक – निलेश बामणे.
    मो. 8652065375 / 8692923310

  • फोकमतकारांची पोटदुखी वेगळीच!

    प्रकाशन दिनांक :- 12/09/2004

    एकदा एका शिष्याने आपल्या गुरूला विचारले, ”महाराज, मला आयुष्य यशस्वीपणे जगायचे आहे. मला माझ्या बांधवांसाठी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी काहीतरी करायचे आहे आणि त्याचवेळी मला अजातशत्रूदेखील व्हायचे आहे. मला कोणी शत्रू असणार नाही, माझे वाईट कोणी चिंतणार नाही, अशा प्रकारचे आयुष्य मला जगायचे आहे.

  • इथं काय महत्त्व राखतं..!

    ही धरा कुणाच्याही ‘बापाची जहागीर’ नाही… म्हणून इथं अमानवीयतेचा अंत महत्त्व राखतो… तर माणुसकीचा ‘नव्याने जन्म’ सुद्धा अधिक महत्त्व राखतो…

  • धार्मिक उन्माद

    या काळात संख्येने कमी असलेल्या पोलिसांवर प्रचंड दडपण येते. या दडपणापायी बरेच पोलिस आत्महत्या करतात आणि बऱ्याच पोलिसांचे मानसिक संतुलन बिघडते. सामान्य नागरिकही त्यातुन सुटत नाहीत.

  • मनोरंजनाचे जग

    निसर्ग हेच पूर्वी मनोरंजनाचे साधन होतं. हवा, पाणी, ढग, आकाश, वृक्ष, चंद्र, चांदण्या, सूर्य याभोवती गाण्याचं इंद्रधनुष्य गुंफलं जायचं. निसर्ग जसा जसा कमी होत चालला, प्रसारमाध्यमांचा संसर्ग वाढला.निसर्गदत्त सौंदर्य नजरेआड, दुर्मिळ होऊन प्रसारमाध्यमांतून अनेक गोष्टी झिरपू लागल्या. माहिती व तंत्रज्ञान युगात मनोरंजनाच्या नावाखाली नको ते उथळ, संस्कृतीचं विपर्यास्त स्वरुप, विवाहबाह्य संबंधांना खतपाणी घालणारं, सासू-सुनांचे द्वेष, अंधश्रध्दा, पसरविणार्या् गोष्टी येत आहेत.

  • आम्हाला भेडसावणारा एकमेव प्रश्न !

    सध्या अचानक महाराष्ट्राला चांगले दिवस आले आहेत. सगळीकडे सुबत्ता आली आहे. विजेचा प्रश्न मिटलेला आहे. महाराष्ट्र लोडशेडींगमुक्त झाला आहे. शेतकर्‍यांना पाहिजे तितके पाणी उपलब्ध आहे. तीन तीन पिके वर्षभरात घेतली जातायत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्यात , त्यांच्या घरात एसीपासुन मायक्रोवेवपर्यंत सर्वकाही उपलब्ध आहे. कुपोषणाचा प्रश्न सुटलाय , सगळी लहान मुले एकजात निरोगी दिसतायत . सरकारी नोकरांचे पगार वाढलेत , महागाई कमी झालीये , सर्व वस्तु अत्यंत स्वस्त किमतींना उपलब्ध आहेत. सरकारी कार्यालयातला भ्रष्टाचार थांबलाय , सरकारी कार्यालयातली कामे कशी पटापटा आटोपतायत . सकाळी जा , एक तासात कुठलेही काम करुन परत या . जिकडेतिकडे मुबलक धान्य आहे , सगळीकडील झोपडपट्टया अचानक नाहीशा झाल्यायत , त्याजागी पक्की घरे आहेत , सर्वांना हाताला काम आहे, खायला धान्य आहे , आणि झोपायला निवारा आहे . खुन ,दरोडे , बलात्कार पुर्णपणे बंद झालेत , पोलिसमंडळींना काम उरले नाहिये .सगळीकडे एवढा आनंदीआनंद ,सुखसंपदा नांदत असताना संपुर्ण महाराष्ट्रापुढील एकच प्रश्न मात्र अजुनही सुटला नाहिये , तो म्हणजे माननीय मुख्यमंत्री अमिताभसोबत साहित्य संमेलनात एकत्र जाणार का ?

    आता सगळीकडे एवढा आनंदी आनंद असताना केवळ एकच प्रश्न न सुटलेला असणे यात मोठेसे ते काय ? पण हे म्हणणे तितकेसे बरोबर नाही . आता महाराष्ट्रात हे सर्व प्रश्न असले असते तर त्या प्रश्नांपुढे हा प्रश्न खुपच क्षुल्लक वाटला असता . पण परिस्थिती तशी नाही . हे सगळे प्रश्न सुटलेले असल्यामुळे हल्ली “ मुख्यमंत्री आणि अमिताभ “ हा एकच प्रश्न आम्हाला मोठा दिसतो. जिकडेतिकडे चॅनलवर एकच चर्चा. वर्तमानपत्रात त्याच बातम्या. पण चॅनलवाल्यांचे काय चुकले ? सगळे प्रश्न सुटल्यामुळे वागळेसाहेब आणि खांडेकरसाहेब यांच्यापुढे मोठा प्रश्न उभा राहीलाय. आपण चॅनलवर काय दाखवायचे ? शेवटी त्यांना हा प्रश्न मिळालाय आणि त्यांनी सुटकेचा निश्वास टाकलाय.

    आता वागळेसाहेबांचा प्रश्न जरी सुटला असला तरी सामान्य जनता ही विभागली गेली आहे. कुणाला वाटते , हो जायला पाहिजे .कुणाला वाटते नको जायला . चॅनलवर ओपिनियन पोल्स सुध्दा चालु झालेत. ज्यांना मुख्यमंत्र्यांनी जावे वाटते त्यांनी Y टाइप करुन पाठवावे .ज्यांना नाही जावे वाटत त्यांनी N टाईप करुन पाठवावे. ५६ टक्के लोकांना मुख्यमंत्र्यांनी जावे असे वाटते. तर उरलेल्यांना नाही जावे असे वाटते. पुन्हा चर्चा चालु. गेले तर काय होणार , नाही गेले तर काय होणार , यावर वेगवेगळ्या तज्ञांची खलबते चालु आहेत. ऊभा महाराष्ट्र आपापली कामे सोडुन चॅनलवर बघतोय. ( सगळीकडे सुबत्ता असल्यामुळे कामे सोडली तरी दुसरे काम लगेच मिळते ) अर्ध्या तासानी पुन्हा ओपिनियन पोल आला. मुख्यमंत्र्यांनी जावे की न जावे ? पुन्हा एसेमेस पाठवा . ( ते पण फ्री . कारण सुबत्ता ) .बघा बघा आता ओपिनियन पोल बदलला . आता ५६ टक्के लोकांना मुख्यमंत्र्यांनी जाउ नये असे वाटते. हा आमच्या चर्चेचा परिणाम . खरोखरच आहे , एवढी परिणामकारक चर्चा जनतेनी कधीही ऐकली नाहीये .

    मुख्यमंत्र्याच्या जाण्याचा दिवस अखेर उजाडला. आमचे वार्ताहर मुख्यमंत्र्याच्या मागावरच आहेत. चढले चढले ते बघा मुख्यमंत्री विमानात चढले .आता विमान कुठल्या दिशेला जातेय याच्याकडे आपण लक्ष ठेवु या .पुण्याकडे जाणार की दिल्लीकडे ? पुण्याकडे गेले तर आपल्याला एक विषय मिळेल . मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाणार की राहणार ? ते दिल्लीकडे गेले तरीही एक विषय मिळेल . हायकमांडचा दबाव की अजुन काय ? त्यामुळे एकाच विषयातुन आपल्याला अनेक विषय मिळतील . चर्चा होतील , तज्ञ मंडळी आपली मते मांडतील , आपण अजुन ओपिनियन पोल्स ठेवु.

    गुलाबपाकळ्यांनी सजवलेल्या गालिचावरुन चालत असताना अचानक चुकुन राहिलेला काटा पायाला बोचावा ,त्याप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेला बोचणारा एकमेव प्रश्न समोर आणल्याबद्दल जनता आपणाला अत्यंत धन्यवाद देते आहे.

    -- निखिल मुदगलकर

  • खंबीरपणा (उभा विरूध्द आडवा)

    कोंबडीचे अंडे आणि घराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी विट यांच्यात एका बाबतीत साम्य आहे ते कोणत्या बाबतीत आहे ? जरा ओळखुन दाखव!” मित्राने माझ्यापुढे कोडे टाकले.

    मला विचारचक्रात अडकवुन स्वतः पसार झाला.

    मी विचार करु लागलो, “बांधकामाची विट आणि कोंबडीचे अंडे यात काय साम्य असणार?” खुप विचार करुनही उत्तर न सापडल्यामुळे शेवटी शेजारी सुरु असलेल्या बांधकामावरुन दोन विटा आणि बाजारातुन अर्धा डझन अंडी घेउन घरी आलो. खूप निरीक्षण केले पण उत्तर सापडले नाही.

    दुसर्या दिवशी तोच मित्र पुन्हा माझ्याकडे आला, “काय सापडले काय उत्तर?”

    मी नकारार्थी मान हलविली आणि “आता तुच काय ते साम्य दाखवं!” असे म्हणुन ती अंडी आणि विटा त्याच्यापुढे ठेवल्या.

    मित्राने हातात अंडे घेतले. ते उभे ठेवले आणि दाबले, पण ते फ़ुटले नाही . मग त्याने अंड्याला आडवे केले आणि दाबले, ते चटकन फुटले. मग त्याने दोन फ़ुटावरुन हातात उभी धरलेली विट खाली सोडली, विटेला काहीच झाले नाही. नंतर तेवढ्याच अंतरावरुन त्याने आडवी धरुन विट खाली सोडली, आता मात्र विट फुटली.

    मित्र माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला “विट आणि अंडे उभे असेपर्यंत फ़ुटत नाही, आडवे होताच फ़ुटते. हे त्या दोघांमधील साम्य. माणुस त्या विट किंवा अंड्यासारखाच -तो जोपर्यंत खंबीरपणे उभा आहे, सजग आहे, तो पर्यंत कोणीच त्याचे भवितव्य बिघडवू शकत नाही. पण जर का तो सुस्तावला, जरा आडवा झाला, की त्याचे भवितव्य फ़ुटण्याची शक्यता बळावते."

    खंबिरपणे उभे राहा.कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मकतेन बघा त्याचा खंबीरपणे सामना करा...कोन्हीही तुमचे काहीही करू शकनार नाही.. यश तुमचेच....

    नाहीतर....

    जग तुम्हाला आडवे करेल..

    विचार करा

  • रशियन म्हण आणि व्होडका ? एक तत्वज्ञानी दृष्टीक्षेप ?

    पुर्वी reader digest ची पुस्तके मी आर्वजुन विकत घेत असें त्यात वेगवेगळ्या विषयावर छान लेख असत.

    शेवटी Word power नावाचे सदर वाचनीय असें. ‌ते विविध इंग्रजी वाक्प्रचारां संबंधी सदर होतें. त्याचे विविध अर्थ थोडक्यात देत असत. त्यामुळें इंग्रजी शब्द संग्रहात चांगली भर पडत असें. त्यावेळेस वाचनात आलेली रशियन म्हण म्हणजे, Russian proverb आशयार्थाने निश्चितच प्रवर्तक अशीच आहें. फक्त त्यातील Vodka हा भाग वगळुन.

    (हि म्हण व्होडकाची जाहीरात करण्यासाठी रशियात आर्वजुन वापरत असत. कटु सत्य हें आहें किं म्हणीतील तत्वज्ञानीक आशयार्थ गांभिर्याने न घेता रशियातील लोकांनी व्होडकालाच जवळ केलें.) ती रशियन म्हण अशी आहें.

    "A man comes from the dust & in the dust
    he will end - & in the meantime,
    it is good to drink ....
    VODKA.

    आशयार्थ -

    " मानवाचा जन्म मातीतुन होतो.
    शेवट मातीतच होतो.
    म्हणुन आहें हें जीवन भरभरुन जगा ."

    वैधानिक इशारा- भारतीय तत्वज्ञाना प्रमाणे म्हणीतील
    आशयार्थ ध्यानात घ्यावा.
    फक्त व्होडका न घेता ?

    इति लेखन सीमा,
    अनिल भट ,नमस्तें.

    आम्ही साहित्यिक चे लेखक

  • अर्थहीन निवडणुका !

    निवडणुका येतात, निवडणुका जातात ! राजकीय पक्षांची ध्येयधोरणे, भूमिका ठरलेल्या असल्या तरी त्या भूमिका वठविणारे कलाकार आपल्या दिशा सतत बदलवत राहतात. यंदाही नियमानुसार सर्वच राजकीय पक्ष आपापल्या भूमिका घेऊन लोकांसमोर येत आहेत. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांना स्वतःवर खूप अन्याय झाल्याची भावना निर्माण होऊन टोप्या बदलाव्या तसे पक्ष बदलत आहेत. त्यामुळे सध्याच्या वातावरणात “निष्ठा” नावाची गोष्ट उरली नाही.