सध्याच्या निवडणूकीत भाजपावर एक आरोप सतत होत आहे की भाजपा ३७० विषयावर प्रचार करतोय. ३७० चा आणि महाराष्ट्राचा काय संबंध?? "तुम्ही केलेल्या कामावर बोला", "विकासाच्या मुद्यावर बोला", "तुम्ही पुन्हा निवडणून आल्यावर काय करणार यावर बोला" अशा अनेक गोष्टी विरोधक आणि काही पत्रकारांकडून उपस्थित होत आहेत.
सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ३७० आणि महाराष्ट्राचा संबंध नाही ही बाब चुकीची आहे. काश्मिर मधून विस्थापित झालेले अनेक काश्मिरी पंडीत महाराष्ट्राचे नागरिक आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ३७० हटवल्यानंतर काश्मिर मधे जमीन घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरू शकते, MTDC च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार काश्मिरमधे दोन Resort बांधायची योजना बनवत आहे. याचा फायदा काश्मिरी आणि मराठी युवकांना रोजगाराच्या दृष्टीने होऊ शकतो. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ३७० हे काँग्रेसने केलेल्या काही मोठ्या पापांपैकी एक आहे आणि ते हटवण्यासाठी जेव्हा मतदान केले तेव्हा ते देशातल्या प्रत्येक कोपऱ्यातल्या खासदारांनी मत दिले ज्यात महाराष्ट्रातील खासदार पण आहेत. पण या देशहिताच्या कार्यातही महाराष्ट्रातल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या खासदारांना भाग घ्यावासा वाटला नाही. आज भाजपा ३७० वरून बोलतो तेव्हा काहींना होणाऱ्या जळजळीचे मुख्य कारण हे आहे की यामुळे पक्षाचा जनाधार आणि विश्वासार्हता आणखीनच वाढली आहे. पण मुद्दा हा आहे की भाजपा फक्त ३७० विषयावर प्रचार करतो हे कितपत योग्य आहे??
तर मुळात हे अर्धसत्य आहे. भाजपाचे नेते जेव्हा प्रचारा दरम्यान भाषण करतात तेव्हा ते आपल्या सरकारने केलेली कामे मांडतात. त्या केलेल्या अनेक कामांतील एक म्हणून ३७० मांडले जाते पण भाजपाचा प्रचार तेवढ्यापुरताच मर्यादित नाही. गेल्या काही दिवसांत भाजपा नेत्यांच्या ज्या काही सभा झाल्या त्यात मांडल्या गेलेल्या निरनिराळ्या विकास कामांची यादी करायची झाल्यास ती खालीलप्रमाणे होते.
१) ३०,००० किमी रस्तेबांधणी
२) १८,००० गावांचा पाणी प्रश्न सोडवला
३) ग्रामीण आवास योजने अंतर्गत गरिबांसाठी ७ लाख घरे
४) २०२१ पर्यंत सर्व गरिब कुटुंबांना घरे देण्याचे उद्दिष्ट
५) शिक्षणात महाराष्ट्र क्रमांक ३ चे राज्य
६) दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी प्रयत्नशील
७) १५ वर्षांत आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेली मदत २०,००० कोटी तर भाजपा युती सरकारने ५ वर्षांत दिलेली मदत ५०,००० कोटी
८) आघाडी सरकारच्या काळात शेतकरी बोनस रू.५० असायचा, भाजपा सरकारने २०१४ ते २०१७ रू.२०० तर २०१८-२०१९ मधे रू.५०० बोनस दिला.
९) मुंबई-गोवा महामार्गाचे काम जोमाने सुरू. दीड वर्षात पूर्ण होणार
१०) ३८ जलप्रकल्पांचे काम जोमाने सुरू
११) रायगड हे आगामी Industrial Hub बनणार
१२) मराठा समाजाला कोर्टात टिकणारे आरक्षण दिले
१३) धनगर आणि आदिवासींचे प्रश्न मार्गी लावले
१४) ST समाजाच्या योजनांचा वाभ धनगर समाजालाही होणार
१५) OBC समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिकण्यासाठी शिष्यवृत्ती
१६) स्मार्ट सिटी योजने अंतर्गत हजारो कोटींची कामे
१७) क्लस्टर बांधकामाचा प्रश्न सोडवला
१८) मेट्रोचे जाळे
१९) १,६०,००० विहिरींचे बांधकाम
२०) ५ लाख शेतकऱ्यांना पंप पुरवले
२१) १९,००० गावे दुष्काळमुक्त
२२) आगामी काळात गरिबांसाठी १० लाख घरे बांधणार
२३) ४० लाख लोकांना वैद्यकीय सहाय्यता
२४) जल जीवन मिशनसाठी ३.५ लाख कोटी रूपयांची तरतूद
२५) ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी २५ लाख कोटींची तरतूद
२६) गरिब शेतकऱ्यांसाठी पेंशन योजना
२७) Direct Benefit Transfer मुळे थेट १००% मदत शेतकऱ्या पर्यंत
२८) किसान निधीचा शेतकऱ्यांना फायदा
२९) शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी Vaccination Programme
३०) कौशल्य विकास आणि मुद्रा लोन सारख्या योजनांचा ग्रामीण भागातील युवकांना फायदा
३१) One Ticket Policy साठी प्रयत्न (Local/Metro/Best etc. साठी एक टिकीट)
३२) कोळीवाडा आणि गावठाणांसाठी नवीन योजना
३३) Airport लगतच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास
३४) प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ३०० चौ.फुटांची घरे देणार.
३५) आशियातला सगळ्यात मोठा पूनर्विकास धारावीत होणार
३६) उज्वला योजनेचा १.५ कोटी गरिब कुटुंबांना लाभ
३७) बांद्रा-वर्सोवा Sea Link
३८) विविध ठिकाणी रिंग रोडचे बांधकाम
३९) जलवाहतूकीला चालना
४०) जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे योजनेचा शेतकऱ्यांना लाभ
हि केंद्र आणि राज्य सरकारची 'काही' कामे ज्यांचा उल्लेख 'काही' ठिकाणच्या भाषणांमधे झाल्याचे मी नोंदवून ठेवले. या व्यतिरिक्त अनेक भाषणे झाली आहेत आणि त्यात अनेक वेगळे मुद्दे आणि कामे मांडली आहेत ज्याचा वरिल यादीत समावेश नाही. तसेच यात एका विशिष्ट शहरासाठी/प्रदेशासाठी केलेल्या किंवा प्रत्येक उमेदवाराने त्याच्या कार्यक्षेत्रात केलेल्या कामांचा उल्लेख नाही. मग आता विचार करा की त्या सगळ्या मुद्द्यांना जोडले तर किती मुद्दे होतील??
मग जर एवढे महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे मांडून जर भाजपा नेते ३७० वर ३-४ मिनीटे बोलत असतील तर त्याचा एवढा बाऊ का??
पण तरिही तो होत आहे आणि निवडणूक संपपर्यंत जाणीवपूर्वक चालू राहील. पण भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून नम्रपणे सांगतो की आम्हाला फरक पडत नाही. कारण आमच्यावर अटलजींचे संस्कार आहेत. अटलजी भर संसदेत म्हणाले होते, "सत्ता का खेल तो चलता रहेगा,सरकारे आएगी-जाएगी,पार्टियां बनेगी-बिगडेंगी पर ये देश रहना चाहिए,इस देश का लोकतंत्र रहना चाहिए" हा देश आणि या देशातील लोकतंत्र टिकवण्यासाठी आम्ही ३७० हटवण्याचे काम केले आहे आणि त्याविषयी भरभरून बोलणार कारण त्यासाठी आमच्या नेत्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे. मग त्याने आमच्या विरोधकांना पोटदूखी होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे आमचा नाही. आम्ही एकच जाणतो की 'राष्ट्र प्रथम'!!! आणि हो आणखीन एक जाणतो, आएगा तो देवेंद्र ही!!!
- SwaG
(स्वानंद गांगल)
सरासरी दिवसाला तीन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. हे सगळे नियोजन चुकते कशामुळे? उत्तर स्पष्ट आहे.
लोकशाही व्यवस्थेत सरकारचे काम विश्वस्तांचे असते. राज्याचे खरे मालक राज्याचे नागरिक असतात या नागरिकांच्या वतीने सरकार राज्याचा कारभार पाहत असते. त्यामुळे सरकारची जबाबदारी केवळ संरक्षण आणि संवर्धनापुरतीच मर्यादित आहे; परंतु आपल्या या मर्यादेचा सरकारला विसर पडला की काय, अशी शंका आता येऊ लागली आहे.
आधुनिकतेच्या नावाखाली नपुंसक बियाणे या देशाच्या
माथी मारली जात आहेत आणि इथल्या शेतकऱ्याला कायमचे दरिद्री, परावलंबी ठेवण्याचे षडयंत्र अंमलात आणले जात आहे. दुर्दैवाने या षडयंत्राला सरकारचादेखील प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष पाठिंबा आहे. हे षडयंत्र केवळ शेतीपुरते मर्यादित नाही.
वेदनेला पुरस्कार दिल्याने वेदना संपत नसते. आयुष्यातील वास्तव नेहमीच आपल्याला खुणावत असते.कोणत्याही क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार मिळवण्यासाठी जात, धर्म ,आर्थिक परिस्थिती, अपंगत्व कधीच आड येत नाही. व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मनात एक कोपरा छंदाचा असतो. आपले छंद ओळखता येणं व ते जोपासणं प्रत्येकाला जमेल असं नाही.
अखेर आज मी कोसळलो. खरं तर जगाचा निरोप घेण्याचं माझं वय नक्कीच नाही. माझ्या आसपास असलेले माझे सोबती अनेक वर्षांपासून ताठ मानेने उभे आहेत. मला मात्र अकाली मृत्यू आला यात शंकाच नाही. या न्यायालयाच्या आवारात गेल्या वीस वर्षांत घडलेल्या असंख्य घटनांचा मी मूक साक्षीदार आहे. मला ऐकू येतं, मी बघू शकतो, पण निसर्गाने बोलण्याची देणगी मात्र मला दिली नाही. एका मोठ्या वादळात जेव्हा प्रचंड वेगाने वारे वाहू लागले तेव्हा माझा मृत्यू समीप आल्याचं मला जाणवलं आणि भूतकाळातील घटनांचा चित्रपट माझ्या डोळ्यासमोरून वेगाने सरकू लागला.
एक दिवस समोरच्या कडुलिंबाच्या वृक्षाखाली एक तरुण स्त्री भर दुपारी ओक्साबोक्शी रडत बसली होती. मी मुका असल्यामुळे तिच्या रडण्याच्या कारणाची चौकशी करू शकत नव्हतो. पण बोलता येणारे दोन तरुण तिला बघून थबकले आणि त्यांनी तिच्या रडण्याचे कारण विचारले. काही महिन्यांचं कोवळं मूल कडेवर घेऊन घरी जात असताना दोन नरपशूंनी ते मूल हिसकावून व त्याला रस्त्याच्या कडेला भिरकावून तिच्यावर बलात्कार केला होता. न्यायालयाने त्या नराधमांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली होती. तिची हृदयद्रावक कहाणी ऐकून ते कॉलेजवीर फिदीफिदी हसू लागले व तिला म्हणाले, ‘अगं वेडे, बलात्कारी माणसं काय समोर पुरावा उभा करून बलात्कार करत असतात की काय? ते निर्दोष सुटणारच!’ मला संतापाने भोवळ आली आणि त्याच क्षणी माझ्या फांद्या आणि पानांसकट त्या दोघांवर कोसळून त्यांचा चेंदामेंदा केला असता तर आयुष्य नक्कीच सार्थकी लागलं असतं असं मला वाटून गेलं, पण संतापाने धुमसण्याशिवाय मी काहीही करू शकलो नाही.
*****
गेल्या पंधरा वर्षांपासून जवळपास रोज त्याला मी इथे बघतो आहे. सुरुवातीचे काही दिवस मी त्याला न्यायालयाचा कर्मचारी समजत होतो, पण काही लोकांच्या बोलण्यावरून मला कळलं की, त्याने त्याच्या सख्ख्या भावावर इस्टेटीशी संबंधित केस टाकली आहे. त्याने या कोर्टात चकरा टाकण्यास सुरुवात केली तेव्हा त्याचं डोकं काळ्या कुळकुळीत कुरळ्या केसांनी सजलं होतं, पण आता त्याला चांगलं गरगरीत टक्कल पडलं आहे. खरं तर त्याचं वय खूप जास्त नाही, पण कोर्ट केसच्या काळजीने त्याला अकाली म्हातारं करून टाकलं आहे. घरी अनेक पिढ्यांना पुरून उरेल एवढी संपत्ती असूनही जमिनीचा एक लहानसा तुकडा भावाला मिळू नये म्हणून हा पठ्ठा पंधरा वर्षांपासून कोर्टात झगडतो आहे. साडेचारशे कोटी वर्षे वय असलेल्या या पृथ्वीवर अवघ्या साठ ते पासष्ट वर्षांचा एक छोटासा प्रवास करायला आलेली माणसं आयुष्य सत्कारणी लावण्याऐवजी पराकोटीच्या स्वार्थापोटी काय काय उद्योग करतात नाही?
*****
एका खुन्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर या न्यायालयाच्या आवारात निकाल ऐकण्यासाठी जमलेल्या प्रचंड जनसमुदायाने काढलेली सरकारी वकीलाची जंगी मिरवणूक बघून मी माझ्या आनंदाश्रूंना आवर घालू शकलो नव्हतो. जनसामान्य कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा करत असतात. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असली तरी ती अगदीच आंधळी नाही हे बघून आपल्या न्यायपालिकेबद्दल अभिमानाने माझा ऊर भरून आला.
*****
एक दिवस एका व्हॅनमधून वरकरणी सुशिक्षित वाटणारे काही स्त्री-पुरुष हसत खिदळत उतरले. एखाद्या हिल स्टेशनवर मौजमस्ती करायला आल्यासारखे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. न्यायालयाच्या आवारात सुहास्य वदनाने फिरणाऱ्या माणसांचं दर्शन क्वचितच होत असल्यामुळे मला जरा बरं वाटलं आणि माझी उत्सुकता ताणली गेली. त्यांच्या येण्याचं प्रयोजन जाणून घेण्यासाठी मी कान टवकारले. स्वत:च्या वैवाहिक जीवनात पूर्णत: अयशस्वी ठरलेल्या त्या जोडप्यांनी एका सुखी, समाधानी आणि प्रगतिपथावर असलेल्या कुटुंबाला असूयेपोटी इमारतीतून हुसकावून लावण्यासाठी खोटी केस केली होती व त्या केसचा निकाल त्यांच्याच बाजूने लागेल याबद्दल सर्वांना पूर्ण खात्री होती; पण तसे न घडल्यामुळे आता त्या सुखी कुटुंबावर आणखी कोणत्या प्रकारे सूड उगवता येईल याची रसभरीत चर्चा कोर्टाच्या आवारातच सुरू झाली.
गेल्या अनेक वर्षांपासून न्यायमंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ फांद्या पसरवून मनुष्यस्वभावाच्या अगणित नमुन्यांचं दर्शन घेताना अनेकदा मोठ्याने ओरडून सर्वांना विचारण्याची इच्छा झाली - ‘का वागता तुम्ही असे?’
-- श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
सभागृहात अभ्यासपूर्ण भाषण करून आपल्या धारदार वक्तृत्वाच्या जोरावर सरकारला घाम फोडणारे आमदार हवेतच कुणाला? इथे गरज राडा करणार्यांची आहे. बी.टी. देशमुख, वि.स.पागे यांचा जमाना आता संपला आहे. मधू लिमये, मधू दंडवते आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत, त्यांच्या सारख्यांची उपयुक्तता देखील संपुष्टात आली आहे.
देश चालवला जात नाही तो उतारावरून घरंगळत येतोय .नेते फक्त बोलतात.कुणाचाही प्रशासनावर ताबा नाही.नशिबाने चांगला हुकुमशहा मिळावा हीच आता देशाची गरज आहे.मग मोदी हुकुमशहा झाले तरी चालतील पण शासनाला अर्थात प्रशासनातील अधिका-यांना आता फक्त हुकुमशाहा च CONTROL करू शकतो.तो हुकुमशहा मात्र प्रामाणिक पाहीजे आपोआप सर्व सुता सारखे सरळ होतील
मराठीला आधुनिक ज्ञानाचे व व्यवहाराचे समर्थ माध्यम बनविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणूनच प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला त्याचा हा भाषिक स्वधर्म जपावाच लागेल, असे महाराष्ट्र राज्य मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांनी सांगितले.
येणाऱ्या पिढीलाही जीए कळायला हवेत. काही साहित्य तुमचं भावनिक पोषण करतं. जीएंचं साहित्य त्यापैकीच एक. जीवनाच्या अनेक संचितापैकी जीएंचं असणं हे एक संचित आहे. जीएंचं साहित्य अनेकांच्या दृष्टीने मुदतठेव आहे, ज्याच्यामुळे आपलं आयुष्य सुखद आहे. भावणारे साहित्य लिहिणे आपल्या आवाक्यात जरी नसले तरी वाचण्यात व ऐकण्यात ते आपलंच असतं. माणसं येतात आणि जातात पण त्यांचं साहित्य मनात घर करतं. मनात घर करणाऱ्या गोष्टीच मनात तग धरतात. शब्दांच्यापलीकडे गेल्यानंतरच जीएंचं साहित्य व त्यातील सौंदर्य कळतं. काही गोष्टींची अनुभूती घ्यायची असते. काही गोष्टी फक्त जगायच्या असतात. जीएंचं साहित्य या प्रकारात मोडतं. माणसे जाताना केवळ आठवण मागे ठेवून जात नाहीत, तर विचार मागे ठेवून जातात, अस्तित्व मागे ठेवून जातात. माणसाला मरण असतं, विचारांना मरण नसतं. त्यांच्या साहित्यानं दुःखं सहन करण्याची प्रतिकारशक्ती वाढविली आहे, अनेक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. अनेकांना जगण्याची उमेद दिली आहे, वास्तवाची जाण करून दिली आहे. जीए म्हणजे एक साहित्यातलं अस्वस्थ करणारं नाव. अस्वस्थ साहित्य मनाला चटका लावतं, चिरकाल स्मरणात राहातं. पु.ल., वि. वा., जी. ए. हे साहित्यातील दीपस्तंभ आहेत. दुर्बोधतेततही जसा ग्रेस असतो तसं अस्वस्थतेत जीए असतात.
Copyright © 2025 | Marathisrushti