रोगग्रस्त, पिसाळलेले आणि आक्रमक कुत्र्यांना तर नक्कीच ठार मारले पाहिजे. श्वान प्रेमिंनी कुत्र्यांवर प्रेम करण्यासोबत त्यांच्या पालनाचीही जबाबदारी घ्यावी. त्यांना जर कुत्र्यांवर एवढंच प्रेम करायच असेल तर त्याची किंमतही मोजायला तयार रहायला हव. मनुष्य हा प्रथम माणसांसाठी आहे. आपल्या देशात अनेक अनाथ मुले आहेत त्यांच्याबद्दल ही मंडळी सहानुभुती का दाखवित नाही?
आपला शेजारी देशही असाच सूडाच्या भावनेने पेटलेला आहे. केवळ भारताला धडा शिकविण्यासाठी या शेजारी देशाने आतंकवादाच्या आगीचा खेळ करायला सुरूवात केली. एका मर्यादेपर्यंत त्यात तो देश सफलही झाला, परंतु आता त्या देशाने पेटविलेल्या आगीचे चटके त्यांनाच सहन करावे लागत आहेत.
क्रिकेटचे हे भूत लोकांच्या डोक्यावरून उतरवायचे असेल, तर एक चांगला उपाय आहे आणि तो म्हणजे क्रिकेटसाठी जी मैदाने उभी करण्यात आली आहेत ती सगळी मैदाने इतर खेळांसाठी सक्तीने उपलब्ध करून द्यावीत. या मैदानांवर आधी इतर खेळांना प्राधान्य देण्यात यावे. ही मैदाने हॉकी, फुटबॉल, खो-खो, कबड्डीसारख्या खेळांना अग्रक्रमाने देण्यात यावी. या खेळांच्या वेळापत्रकातून वेळ मिळालाच, तर त्यावर क्रिकेटचे सामने घेण्याची परवानगी दिली जावी.
बाबा गाढे हे अभ्यासक, पत्रकार, व दलित चळवळीचे एक प्रणेते आहेत. ब्राम्हण आणि सी. के. पी. समाजाविषयी त्यांनी केलेले हे जाहीर निरीक्षण
अहंकार हा माणसाचा स्थायी गुणधर्म आहे असे मला वाटते.आपण उपजतच अहंकारी असतो हे सत्य स्वीकारायला हवे.तसाही थोडाफार अहंकार असायलाच हवा.
कोरोना रोगामुळे आलेल्या आरोग्य आणीबाणीमुळे जगातील वेगवेगळ्या समाजांमध्ये रोग आणि भीतीही शिरकाव करते आहे. ही भीती अनेकदा आजार आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षाही भयंकर असते आणि हीच भीती माणसाच्या हातून चुका घडवून आणते आणि सोबतच कोण आपले आणि कोण परके हे पण शिकवून देते.
सध्या लोक हसायला विसरले आहेत.सतत सगळे काळजीमध्ये दिसतात.चिंता करायची काहीच गरज नहिये,कारण दुःख सगळ्यांनाच असतात,काही लोक दाखवतात काही लोक उत्तमप्रकारे लपवतात.दुःख कोणाला चुकलेल नाहीये ते कोणामधे भेदभाव नाही करत.श्रीमंत लोकांना पण असत आणि गरिबांना पण.दुःख दुःख करुन एवढ सुंदर आयुष्य जगायच सोडून द्यायच का??
मी सध्या दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर आहे. भारताच्या ईशान्येस असलेला हा देश क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या बाबतीत भारताच्या तुलनेत कुठेच नाही असे म्हटले तरी चालेल. लोकसंख्या दोन ते तीन कोटींच्या आसपास आणि क्षेत्रफळ जास्तीतजास्त विदर्भाएवढे!
वेगवेगळ्या प्रांताच्या, जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी पुढाऱ्यांची स्वतःची एक आवड असते. आणि त्यातूनच हे असले रिकामटेकडे वाद निर्माण होतात. ते अतिशयोक्तीने तुडुंब भरलेली भाषणे करतात. कधीकधी अशी व्याख्याने मानसिक बेशुद्धपणाचं जिवंत उदाहरण असतात. परंतु त्यांचे शब्द सामान्य लक्ष्यित भावनांना स्पर्श करतात.
’झिरो बजेट’ शेती किंवा नैसर्गिक शेती हाच शेतकर्यांच्या समस्यांवरचा एकमात्र तोडगा आहे. जुने तेच सोने होते, हे आता सिद्ध झाले आहे. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ही केवळ गोष्टींच्या पुस्तकात आहे, हे शेतकर्यांनी लक्षात घ्यायला हवे. निसर्गाला आव्हान देऊन आपण उभे राहू शकत नाही. एवढ्या शक्तीशाली जपानचे अवघ्या दोन दिवसात मातेरे झाले. आधुनिक तंत्रज्ञान जोपर्यंत निसर्गाशी इमानदार आहे तोपर्यंत ते ठीक आहे, त्याच्या पुढची पायरी गाठण्याचा प्रयत्न हे तंत्रज्ञान करीत असेल तर शेवटी सगळ्याची माती होणार हे निश्चित!
Copyright © 2025 | Marathisrushti