राम प्रधान समितीच्या अहवालामुळे सध्या महाराठ्र शासनाची अवस्था ‘धरले तर चावते, अन् सोडले तर पळते’ अशी झाली आहे. त्यामुळेच विधिमंडळात प्रधान समितीचा अहवाल सादर न करता त्यावरील कृती अहवाल तेवढा सादर करण्यात आला. त्यामुळे विरोधकांनी चिडून एवढा प्रचंड गोंधळ घातला की विधान परिषदेत तीन विरोधी सदस्यांना निलंबित करण्यात आले अहवालात असे कोणते भयंकर सत्य दडलेले आहे की सरकार स्वत:च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ देणे पसंत करते; पण अहवाल विधिमंडळात मांडत नाही?
काळाच्या प्रवाहासोबतच मनुष्याची जीवनशैली बदलत चालली आहे आणि त्या बदलामागचे प्रमुख कारण ठरत आहे वैज्ञानिक प्रगती! वैज्ञानिक प्रगतीच्या खऱ्या वेगाला चालना मिळाली ती जेम्स वॅटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावल्यानंतर . जागतिक औद्योगिकीकरणाचा तो आरंभबिंदू होता.

भारतात प्राचीन काळात सगळ्यात जास्त विचार झाला तो आपल्या मनाबद्दल. भगवतगीता हे त्याचं मोठं उदाहरण आहे. कबीरानेसुद्धा मानवी मनावर भाष्य केलं.
कबीर म्हणतो,
मन के मते न चलिये, मन के मते अनेक।
जो मन पर असवार है, सो साधु कोई एक।।
…मनाच्या मताने चालू नका. कारण त्याची मते अनेक आहेत. पण मन जर ताब्यात ठेवलं तर तुम्ही एक साधू बनून आनंदात राहू शकाल. मन ताब्यात कसं ठेवायचं सांगत आहेत निरेन आपटे.
“प्रेम” या शब्दाचा इतका गैरवापर केला गेला आहे की प्रत्येक चरणावर या प्रश्नांबद्दल प्रश्न उठविले जातात. प्रेमाची तुलना वारंवार वासनाशी केली जाते. प्रेमाची तुलना मैत्री म्हणजे पक्की मैत्रीशी ही केली जाते. जर हे खरे प्रेम असेल तर ते कसे असेल..?
जुन्या काळातली राजेशाही असो अथवा आधुनिक काळातील लोकशाही असो, सत्ताधार्यांचा धर्म आणि वृत्ती नेहमी सारखीच राहात आली आहे. या सत्ताधार्यांना आपली प्रजा मुर्दाड आणि प्रतिकारहीन राहावी असेच वाटत आले आहे. आज २१ व्या शतकातही दुर्दैवाने सत्ताधार्यांच्या आणि जनतेच्या एकूण मनोवृत्तीत फारसा फरक पडलेला दिसत नाही. तेच बेलगाम सत्ताधीश आणि तीच मुर्दाड, लाचार जनता!
अहंकाराचे विश्लेषण एका विचारवंताने फार सुरेख केले आहे. अहंकार म्हणजे Evil Getting Over you नॅथेनल ब्रोनरच्या मते, अहंकार असा एक राक्षस (बकासुर) आहे की, ज्याला जेवढे खाऊ-पिऊ घालावे तितका तो अधिक भुकेला होतो. बरेचदा अहंकार व स्वाभिमान यांत अत्यंत पुसट रेषा असते. अशा या अहंकाराचे मूळ खालील गोष्टींमध्ये असते-
(१) अज्ञान
(२) स्वत:बद्दलचा फाजील आत्मविश्वास
(३) नकार पचवण्याची कला अवगत नसणे
(४) स्वत:पाशी असलेले अधिकार
(५)आध्यात्मिक विचारांची वानवा.
अहंकारामुळे फक्त नुकसान आणि नुकसानच होते. यामुळे मन:शांती बिघडते, सारासार विवेकबुद्धी नष्ट होते व इतरांशी आपले संबंध दुरावतात. मानसिक तज्ज्ञांच्या मते मनुष्य म्हटला की अहंकार आलाच. हा अहंकार हिंस्र श्वापदासारखा असतो. त्यावर नियंत्रण ठेवून त्याला आपल्या आज्ञेत ठेवणे यातच खरी प्रगल्भ माणसाची कसोटी लागते. तेव्हा आज बघू, करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले अहंकाराचे दमन.
० जेव्हा आपल्याला ठाऊक असते की, समोरच्या व्यक्तीपेक्षा आपल्याला अधिक ज्ञान आहे तेव्हा बढाया मारून स्वत:चे गुणगान करणे टाळा. यामुळे अहंकार वाढीला लागत नाही.
० एखाद्याच्या छोटय़ा-मोठय़ा चुकीमुळे/ वागणुकीमुळे आपला अहंकार दुखावला जाणार नाही, याची काळजी घ्या. यासाठी क्षमाशील वृत्ती अंगी बाणवा.
० जसा आपल्याला दुसऱ्याची चूक दाखवून देण्याचा अधिकार आहे तसा समोरच्यालाही आहे, हे विसरू नका. आपली चूक असल्यास मोठय़ा मनाने मान्य करा. आपल्या उणिवांवर बोट ठेवले गेल्यास अहंकार दुखावून घेऊ नका, उलट ‘निंदकाचे घर असावे शेजारी,’ या न्यायाने चूक सुधारा व यश संपादन करा.
० काही लोक खुशमस्करे असतात. आपली खोटी स्तुती करून आपल्या अहंकाराला खतपाणी घालतात. अशा लोकांचे खरे मनसुबे ओळखा. कारण वेळ आल्यास हीच मंडळी आपले पाय खेचतात.
० अधिकारांमुळे अहंकार वाढीस लागत असेल तर गाढव व येशूख्रिस्ताची गोष्ट आठवा. येशू गाढवावर बसून जात असतो व सर्व लोक येशूला अभिवादन करत असतात. गाढवाला वाटते की, लोक आपल्यालाच अभिवादन करत आहेत. येशू उतरून गेल्यावर त्याच गाढवाला सर्वजण हाडतूड करतात. याचप्रमाणे अधिकारपद असल्यामुळे लोक आपल्या अहंकाराला खतपाणी घालतात, पण तेच पद गेल्यावर तेच लोक आपला अपमानही करतात.
० मला आता सर्व कळते, असे वाटू लागल्यास, नवीन जे आपण कधीही ऐकलेले / पाहिलेले नाही ते शिकायचा प्रयत्न करा. त्यामुळे ज्ञानसागर किती अपार आहे व आपली ज्ञानाची घागर किती थोटी आहे, हे कळेल. आपसूकच त्यामुळे अहंकाराचे दमन होईल.
० उत्तम, देखणे व्यक्तिमत्त्व आहे, म्हणून सर्व लोकांवर आपली भुरळ पडेल हा फाजील आत्मविश्वास / अहंकार बाळगू नका. कारण विचारांची श्रीमंतीच आदरास पात्र असते. लक्षात ठेवा, फळांनी लगडलेले झाड नेहमी वाकलेले असते. तद्वत आपल्या ज्ञान, व्यक्तिमत्त्वाला नम्रतेची झालर असावी.
० मी-माझे भौतिक सुख या सर्व कल्पनांना तिलांजली द्या. दुसऱ्याचा विचार करा, यामुळे एखादी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीस मिळाल्यास आपला अहंकार दुखावला जाणार नाही.
० दुसऱ्यांना शिकविण्यापेक्षा, दुसऱ्यांकडून जास्तीत जास्त शिका. दुसऱ्यांमधील चांगले गुण आत्मसात करा, त्यामुळे आपल्यालाही शेरास सव्वाशेर भेटल्याचे कळेल व आपसूकच आपला अहंकार निवळून जाईल.
० निरपेक्ष वृत्तीने दुसऱ्यांना मदत करा. एखादी गोष्ट चांगली घडून आल्यास आपण फक्त निमित्तमात्र आहोत. सगळी मेहनत ज्याचे काम झाले त्यानेच केली आहे व देवाने हे सर्व घडवून आणले आहे, असा आध्यात्मिक दृष्टिकोन बाळगा. त्यामुळे अहंकार वाढणार नाही. आठवा- शिवाजी महाराज-रामदास व बेडकीची गोष्ट. जेव्हा महाराजांना अहंकार जडला की आपण रयतेचे पोशिंदे आहोत तेव्हा रामदासांनी खडक फोडून त्यात जिवंत असणारी बेडकी व पाण्याचे खळगे दाखवले. महाराजांना कळून चुकले की, ही सर्व देवाची लीला आहे. मनुष्यमात्र निमित्तापुरता असतो.
० दुसऱ्यांबरोबर स्पर्धा करणे टाळा. कारण आपण पुढे गेलो तर अहंकार वाढतो व दुसरा पुढे गेला तर अहंकार दुखावतो. त्यापेक्षा स्वत:शीच स्पर्धा करा. चांगले काम केल्यास ते अजून कसे उत्तम करता येईल यासाठी परफेक्शनचा ध्यास घ्या.
० सर्वात शेवटी अहंकार हा अनेक प्रयत्नांतीच काबूत येतो, त्यामुळे नेहमी अंतरात्म्याशी संवाद साधा, आपले बोलणे ओठावर येण्यापूर्वीच अहंकाराचा दर्प नाही ना हे अवश्य तपासा, मग बघा- तुम्ही अजातशत्रू तर व्हालच, पण करिअरमध्येपण सर्वोच्च स्थानावर जाल.
वाहनांचा कर्कश्य आवाज ,धूर .वाहतूककोंडी यामुळे जनता आधीच त्रस्थ आहे.यात आता दिवसरात्र दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. सरकार नक्कीच धनदांडग्यांच्या दबावा खाली काम करते आणि नेत्यांना शहराचा बट्ट्याबोळ झाला तरी त्याची फिकीर नाही हेच असे निर्णय घेण्या मागील कारण असावे.
फेरीवाल्यांचा प्रश्न सुटला नाही आणि त्यात हे पुन्हा नवे संकट !!!
पुण्यातील एक नामवंत उद्योगपती चंदू चव्हाण यांचा व्यापारी अनुभवावर आधारीत हा लेख, भावनांच्या डोहात डुंबणाऱ्या देशप्रेमी लोकांना विचार करायला लावणारा हा लेख.. फेसबुकवरुन आला तसा शेअर केलाय. वाचा आणि प्रतिक्रिया लिहा.
खुळचट राष्ट्रवादी penny wise pound foolish आहेत.ती त्यांच्या अभिमान cum फुकाचा गर्व या समर्थ रामदासांनी सांगितलेल्या मूर्खपनाच्या लक्षणाला साजेसं वर्तन आहे.
असो या लेखाचा उद्देश आपण जो देश म्हणूंन आर्थिक/सामाजिक/राजकीय मुर्खपणा करतो आणि त्यामुळे आपल्या देशाच्या वस्तुंच्या किमती जास्त आहेत त्याबद्दल आहे.
चांगल्या वस्तू स्वस्त बनवण्यासाठी गरज आहे इकॉनॉमी मध्ये efficiency of capital असण्याची. कशाने येते हि efficiency of capital?
मी चीन मध्ये 45 दिवस राहिलो, शेतकऱ्यांच्या घरी राहिलो, 10000 पेक्षा जास्त किलोमीटर passenger train ने प्रवास केला. युनिव्हर्सिटी च्या प्राध्यापकांना भेटलो, शेकडो लोकांना भेटलो.एवढच जाणून घ्यायचं होतं की 1950 साली भारतापेक्षा मागासलेला असलेल्या देशाने एव्हडी सामाजिक आणि आर्थिक प्रगती कशी केली?
काही कारणं सांगतो जी महत्वाची आहेत. मूलभूत प्रश्न सोडवल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.
1) कंमुनिस्ट क्रांतीने स्त्रियांना मुक्त केलं, जबरदस्तीने का होईना शर्ट पॅन्ट घालायला लावली, केस कापायला लावले आणि कामाला लावलं.चीन च्या आणि भारताच्या GDP मधला फरक समजून घ्यायचा असेल तर फक्त पडद्यात आणि बुरख्यात असलेल्या स्त्रियांचं उत्पन्न (जर त्यांनी काम केलं असतं तर) gdp मध्ये जमा करा आणि 65 वर्षाचं compounding करा. चीन शी स्पर्धा करायची असेल तर पाहिलं काम स्त्रीमुक्ती चं करा.
एका बाजूला कोट्यवधी बालमजूर शाळेत जात नाहीत आणि दुसऱ्या बाजूला कोट्यवधी स्त्रिया चूल आणि मूल यात अडकवून ठेवण्याविषयी तुम्ही काही करत नसाल तर तुमची देशभक्ती नपुंसक आहे. तुम्हाला त्याची लाज वाटली पाहिजे
कारण देश म्हणजे देशातील माणसे असतात
2) कंमुनिस्टांनी धर्म संपवला, आता बौद्ध मंदिरात फक्त पर्यटक जातात.
धर्मांच्या मठात आणि ट्रस्ट मध्ये राष्ट्रीय बचत चीन मध्ये अडकली नाही ती productive use मध्ये येऊन capitalism चा विकास चिनी कंमुनिस्ट पार्टी च्या नियंत्रणाखाली झाला.
भारतात प्रचंड पैसा धर्मामुळे unproductive कामासाठी मंदिर/मशीद/चर्च मध्ये ब्लॉक झाला आहे
आज भारतात जवळपास 30 टक्के deposit हे तिरुपती/शिर्डी/मशीद/चर्च सारख्या धार्मिक ट्रस्ट/सोसायटी/क्लबचे आहेत,
त्यांना बँका 10 टक्के व्याज देतात त्यामुळे उद्योगांवर कर्जावरील व्याजाचे दर 13-14 टक्के आहेत. चीन मध्ये हेच व्याजाचे दर उद्योगांसाठी 6 टक्के आहेत,
म्हणजे आपण तिरुपती आणि त्यासारख्या मंदिरांना संपत्ती ब्लॉक करायची. त्या संपत्तीला 10 टक्के व्याज द्यायचं आणि आपल्या उद्योजकांना सांगायचं वस्तू स्वस्त द्या.
कसं शक्य आहे?
बाकी 50 टक्के deposits गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेट्स चे आहेत, गरीब/मध्यमवर्गीय जनतेचे deposits फक्त 20 टक्के आहेत.
रिटेल loans जी लोकांनी घेतली आहेत ती जवळपास 30 टक्के आहेत त्याला व्याजाचे दर अजून जास्त आहेत, ढोबळमानाने असं म्हणता येईल की 50 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज सामान्य जनता भरते
हि व्याजरूपी लूट कोणाच्या बोडक्यावर टाकली जाते-साईबाबा/तिरुपती/मंदिर/मशी
हाऊसिंग/education/शेती या साठी लोन एक टक्क्याने देता येतील. आणि उद्योगांसाठी 5-6 टक्क्याने. मग इथले उद्योजक वस्तू स्वस्त बनवू शकतील.
धर्म नष्ट करा ती सर्वात मोठी देशभक्ती होईल.
चिनी वस्तू आपोआप महाग आणि भारतीय वस्तू स्वस्त होतील. धार्मिक मूर्खपणामुळे efficiency of capital कमी होते
3) चीन मध्ये जमिनीची मालकी राष्ट्राची असल्यामुळे सगळ्या जमिनीवर शेती होते, सगळ्या तळ्यात मत्स्य शेती होते, त्यामुळे अन्न धान्य/ फळं/मास मच्छी हि खूप स्वस्त आहे. त्यामुळे लोकांचं जीवनमान चांगलं आहे.
भारतातल्या 40 टक्के शेतीयोग्य जमिनीवर शेतीच होत नाही. जमिनीच्या मालकांना शेतीत इंटरेस्ट नाही आणि मजुरांकडे शेती नाही.
तळ्यात मत्स्यशेती तर नगण्य होते, त्यामुळे अन्नधान्याच्या किमती खूप जास्त आहेत. या व अनेक धार्मिक कारणांमुळे भारत in general कुपोषित आहे. Business हे देखील युद्ध असतं, कोट्यावधींना कुपोषित/वंचित ठेवून तुम्ही ते जिंकू शकत नाही. इतिहासात तसं केल्याने आपण खूप वेळा हरलो आहोत.
हे बदला धर्माना जमिनीत गाडा .ती खरी देशभक्ती, चिनी वस्तूंवरील बंदी तुम्ही करू पन शकत नाही आणि ते करणं मुर्खपणा आहे
चीन ची भांडवलशाही यामुळे ही अमेरिकेपेक्षा efficient आहे. आज अमेरिकेपेक्षा पेक्षा चीन ची अर्थव्यवस्था PPP बेसिस वर मोठी आहे. हि जादू त्यांनी कॅपिटलीसम आणि कंम्युनिसम चं त्यांच्या देशाला योग्य मिश्रण ठेवून आणि धर्म संपवून केलेलं आहे. चीन ला शिव्या घालणारे आणि वस्तूंवर बहिष्कार टाका म्हणणारे माझ्या मते अभ्यास नं केलेले आहेत. त्यांना आग सोमेश्वरी असताना बंब रामेश्वरी पाठवणारे मूर्खच म्हणायला लागेल. हे मूर्ख आम्ही मुतून एक गवताची आग कशी विझवली यात यात खुश आहेत.
असो शेवटी मुखशुद्दी साठी
"गोरा सोजीर मज समक्षच माझ्या भार्येशी कुकर्म करीत असतांना, मी सुद्धा त्याच्यावर धरलेली आपल्या हातातली छत्री मधुनमधून किंचित् कलती करून त्यास उन्ह लागेल असें करून त्या दुष्ट सोजीरावर सूड उगवत होतो."
चिल्लर चिनी चीजवस्तुंवर चिंधीचोर राष्ट्रवाद्यांनी घातलेल्या "कडक" बहिष्काराच्या निमित्ताने, अनेक वर्षांपूर्वी वाचलेलं (बहुधा चिं.वि.जोशी?) हे वाक्य आज सहज आठवलं.
माणसाची खरी परीक्षा संकटाच्या काळात होत असते. त्याचा खरा कस तेव्हाच लागत असतो. खरे तर माणसाची खरी परीक्षा म्हणण्यापेक्षा त्याची खरी ओळख म्हणणे अधिक संयुत्ति*क ठरेल.
भारत पर्यटनाला आलेली ती विदेशी महिला हातातील चिप्सचे रिकामे पाकीट फेकण्यासाठी अर्धा तास डस्टबिन शोधत फिरली...
आणि तिच्याच समोर संत्र्याची सोललेली साल मी बिनधास्त रस्त्यात फेकली...
माझ्याकडे रोखलेली तिची ती प्रश्नार्थी नजर पाहिली
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या बेगडी स्वच्छतेची...!
त्याने बेकायदेशीर काम करण्यासाठी माझ्याकडे सरकवलेलं नोटांचं पाकीट मी हळूच खिशात दाबलं...
आणि त्याच्याच मागून भिकाऱ्यासारखं हात जोडून मला विनंती करीत आलेल्या कफल्लक म्हाताऱ्याला वयाचा दाखला आणायला मी बळेच पिटाळून लावलं...
त्याच्या डोळ्यातला तो अश्रूचा थेंब पहिला
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या अधाशी हावरट पोटाची...!
रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिच्या नवऱ्याला इस्पितळात न्यायची तिने विनंती करताच माझी नवी कोरी चमचमीत आलिशान कार रक्ताने माखेल की काय या भीतीने मी दुसऱ्या मार्गे जात असल्याच सांगून हळूच टांग मारली...
तिच्या नजरेतली भीक मी स्पष्टपणे पहिली
तरीही मला लाज नाही वाटली ....
लाज माझ्या दिखावेबाज श्रीमंतीची...!
बलात्काराच्या केसमधून त्याला निर्दोष सिध्द करताना मी माझ्या वकिलीची सीमापार गाठली...
बलात्काराच्या बळीची आब्रू पुन्हा वेशीवर टांगली. तिच्या डोळ्यातला राग पहिला
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या कायदाप्रिय बुद्धिमत्तेची...!
एअरकंडीशनर मॉल मधून महागडे कपडे अन शूज खरेदी करून मी अभिमानाने कार्ड स्वाईप केलं...
फाईव्ह स्टार हॉटेलच्या मेजवानीनंतर वेटरच्या हातावर १०० रुपयांची टीप सुध्दा टेकवली...
मात्र बाजारातून भाजी खरेदी करताना १० रुपयासाठी अपार घासाघिस केली...
त्या गरीब शेतकऱ्याच्या आर्त विनवणीचा सूर कानात घुमत राहिला.
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या काटकसरी व्यवहारांची...!
समुद्रात लाखो करोडो रुपयांची रक्कम ओतून शिवछत्रपतींचे स्मारक उभारण्याच्या मी खूप गप्पा मारल्या...
पण जिथे माझा राजानं अखेर प्राण सोडला त्या खऱ्याखुऱ्या स्मारकरूपी रायगडाची मात्र दयनीय अवस्था केली...
शिवछत्रपतींची तलवार तोडली गेल्याची बातमी टीव्हीवरती पसरली...
प्रेमी युगुलांची नावं लिहलेल्या गडाच्या बुरुजांचा आक्रोश कानठळ्या फोडू लागला
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या नादान शिवभक्तीची...!
गगनभेदी बिल्डींग, शॉपिंग मॉल, मल्टीप्लेक्स, ३ जी- ४ जी अन बुलेटट्रेनच्या जमान्यात कुणी आरक्षणासाठी तर कुणी आरक्षणाच्या विरुध्द भांडला...
आदिवासी पाड्यावरचा रुग्ण वाहतूकसुविधे अभावी अजूनही झोळीत टाकून आणलेला पहिला...
डॉक्टर म्हणे तो तर रस्त्यामध्येच मेला.
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या विकासाच्या राजकारणाची...!
२६/११ ला मी मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहिली...
पाकिस्तानशी युद्धाच्या पोकळ गप्पा मारून देशाखातर मरण्याच्या सिंहगर्जना केल्या...
त्याच पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट मी चवीने पहिले...
माझ्याच पैशात मी कित्त्येक कसाब पोसले
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या फुटक्या देशभक्तीची.!
आणि अजूनही मला लाज नाही वाटत....
माझ्या निर्लज्जपणाची...!!!
Copyright © 2025 | Marathisrushti