(User Level: User is not logged in.)

दिनविशेष

एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इ‌थे

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जागतिक मानसिक आरोग्य दिन

    मानसिक आजारातून पुन्हा लोकांना आपल्या पायांवर खंबीरपणे उभे राहता यावे यासाठी वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ ही संस्था काम करते.

  • शिक्षक दिन

    पूर्वीचे शिक्षक आणि आताचे शिक्षक यांच्यात खूप तफावत दिसून येते. अहो म्हणजे पूर्वीचे शिक्षक मजा घेत शिकवत. आताच्या शिक्षकांना प्रचंड तणावाखाली वावरायला लागतं. त्यामागची कारणंही तशीच आहेत म्हणा. पूर्वी पालकच शिक्षकांना पूर्ण मुभा देत असत की , तुम्हाला वाटेल ते करा ठोका , मारा पण आमच्या मडक्याला घडवा , पण आता जरा जरी शिक्षक ओरडले तरी किंवा फटकावलं तर लगेच पालक असे व्यक्त होतात की जणूकाही शिक्षकांनी जीव घ्यायचाच बाकी ठेवला आहे.

  • अमेरिकेतील राष्ट्रीय चीजकेक दिवस

    अमेरिकेतील राष्ट्रीय चीजकेक दिवस

    चीज आणि केक स्वतंत्रपणे जगभरात प्रसिद्ध आहेत , पण एकत्रितरित्याही ते सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. ह्या चीजकेकचे जगभरात खूप चाहते आहेत.

  • २७ मार्च – आज आहे एक सुंदर दिवस ; जागतिक रंगभूमी दिन.

    आज आपण नाट्यगृहात, महोत्सवात, स्पर्धेत इ. ठिकाणी पाहणाऱ्या नाटकाला हजारो वर्षांचा इतिहास आणि परांपरा आहे. पुरातन काळापासून ते आजच्या एकवीसाव्या शतकातील नाटकांच्या सादरीकरणात, शैलीत, तंत्रज्ञानात काळानुरूप बदल होत आले आहेत. जगातील सर्वात पुरातन नाट्यपरंपरा म्हणून ग्रीक आणि भारतातील संस्कृत रंगभूमीची ओळख आहे.

  • मराठी भाषा गौरव दिन

    मराठी भाषा ही आपल्यासाठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वासल्याचे बोल आहेत. कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही . कारण मार्दव, ममत्व हे या मराठी भाषेच्या ठाई कायमच वसलेले असते. दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस ” मराठी भाषागौरव दिन” म्हणून साजरा केला जातो.

  • सही रे सही नाटकाची १९ वर्षे

    १९ वर्षे हाऊसफुल्ल मनोरंजन करणारे मराठी रंगभूमीवरील नाटक "सही रे सही"
    केदार शिंदे लिखित-दिग्दर्शित 'सही रे सही' नाटकाचा पहिला प्रयोग १५ ऑगस्ट २००२ ला झाला होता. अनेक विक्रम रचणाऱ्या या नाटकाची नोंद मराठी रंगभूमीवरील एक सोनेरी पान म्हणून झाली आहे. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते. त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती.

    मधल्या काळात ते नाटक रंगभूमीपासून दूर होतं. पण, 'भरत जाधव एंटरटेनमेंट' च्या वतीनं पुन्हा सही रे सही'चे प्रयोग दणक्यात सुरू झाले. रंगमंचावर आपल्या डोळ्यांसमोर एकाच वेळी चार ठिकाणी भरत जाधव दाखवण्याची किमया नाटकानं केली. भरत जाधव या नाटकामध्ये मदन सुखात्मे, रंगा ट्रक ड्रायव्हर, गलगले आणि दामू अशा चार व्यक्तिरेखा साकारतात. या नाटकामुळे भरत जाधव हे नाव महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहोचलं. ‘सही रे सही’ या नाटकाचे ‘अमे लई गया, तमे रही गया’ या नावाने गुजराती भाषेत प्रयोग झाले. त्यात शर्मन जोशीने प्रमुख भूमिका केली होती.

    गुजराती ‘सही रे सही’ नाटकाचे २० महिन्यांत ३५० प्रयोग झाले होते. एखाद्या नाटकाचे इतके प्रयोग होणे, हे गुजराती रंगभूमीवर प्रथम घडले होते. ‘सही रे सही’ नाटकाचे ‘हम ले गये, तुम रह गये’ या नावाने हिंदीत भाषांतर झाले. हिंदी नाटकात जावेद जाफरीने प्रमुख भूमिका साकारली होती.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस

    आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस

    हळूहळू स्त्रियांकडून पुरुषांवर होणार्या् अत्याचाराच्या घटना कानावर येऊ लागल्या. ४९८ या कायद्याचा स्त्रिया ढाल म्हणून नव्हे तर तलवार म्हणून उपयोग करीत असल्याचे निदर्शनास येऊ लागले. दखलपात्र, अजामीनपात्र आणि तडजोड नसलेला असा हा कायदा असल्याने या कायद्याचा अनेक ठिकाणी गैरवापर होऊ लागला.

  • जागतिक वारसा सप्ताह

    कोरीव मंदिरे, लेणी, तेथील दगडात कोरलेली शिल्पे आणि त्यांचे सौदर्य यांचा अभ्यास भारतीय विद्या या शाखेत केला जातो. निसर्ग आणि मानव हे एकमेकांच्या साह्चार्याने राहतात त्यामुळे वन्य जीव, पशु आणि पक्षी, निसर्गातील वैविध्य यांची काळजी घेणे यासातही अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने यांचे महत्व अविवाद्य आहे.

  • हार्बर लाइन’ कुर्ला ते रे रोड दरम्यान चालू झाली

    बोरीबंदर ते ठाणे अशी पहिली स्टीम इंजिन असलेली ट्रेन धावल्यानंतर या ट्रेनचा विकास होण्यास बराच कालावधी लागला आणि त्यानंतर पहिली ईएमयु (वीजेवर चालणारी )लोकल धावण्यास १९२५ साल उजाडले.

  • मुंबईतील प्रार्थना समाजाची स्थापना

    १८६५ मध्ये अमेरिकेतील सिव्हिल वॉर संपले. कापसाच्या किमती गडगडल्या व शेकडो व्यापाऱ्यांचे दिवाळे निघाले. आर्थिक संकटांनी हाहाकार उडाला. सांपत्तिक स्थितीतील हा चढउतार पाहिल्यावर परमहंस सभेतील जुनीमंडळी पुन्हा उत्साहाने कामाला लागली. १७ डिसेंबर १८६६ रोजी डॉ. आत्माराम पांडुरंग यांच्या घरी बाळ मंगेश वागळे, भास्कर हरी भागवत, नारायण महादेव ऊर्फ मामा परमानंद, सर्वोत्तम सखाराम मानकर, तुकाराम तात्या पडवळ, वासुदेव बाबाजी नवरंगे इत्यादी मंडळी उपस्थित राहिली. ह्या बैठकीमध्ये सामाजिक सुधारणेच्याच विषयाचा ऊहापोह झाला व विधवाविवाह, स्त्री-शिक्षण या कार्यास उत्तेजन द्यावे; बालविवाहाची चाल बंद व्हावी यासाठी प्रयत्न करावा, जातिभेदाची चाल वाईट असल्याचे उघडपणे प्रतिपादावे इत्यादी विचार झाला. परंतु ह्यासंबंधी झालेल्या नंतरच्या सभांमध्ये ऐहिक कल्याणावर विशेष दृष्टी ठेवून ही कार्ये हाती घेण्यापेक्षा मनुष्याचे ह्या जन्मी मुख्य कर्तव्य जे परमार्थसाधन त्याकडे विशेष दृष्टी ठेवली पाहिजे हा विचार कायम प्रार्थनासमाजाच्या स्थापनेचा निश्चय करण्यात आला.