(User Level: User is not logged in.)

दिनविशेष

एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इ‌थे

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आयुष्यावर बोलू काही “ची … अठरा वर्ष..

    ३ ऑगस्ट २००३ ला सहज म्हणून सादर केलेला एक कार्यक्रम , संदीपच्या कविता आणि गाणी आणि मी आणि संदीपने केलेली गाणी , असा एक प्रयोग करून तर बघूया इतक्या सहज सुचलेली ही कल्पना . एक प्रयोग झाला. हाउसफुल्ल !! उत्तम दाद मिळाली . आम्हालाही मजा आली . बास्स्स ... आनंदाने आपापल्या घरी गेलो ... !!
    लगेच त्याचं BROUCHURE छापून सगळ्या जगभरातल्या मराठी माणसांना सांगूया कि असा असा एक कार्यक्रम सुरु झाला आहे , असं काहीही मनातच आलं नाही . आपली गाणी , कविता लोकांना आवडल्या आणि आपल्यालाही मजा आली एवढाच काय तो निष्कर्ष . त्यात तेव्हा कॉलेजकुमार असलेला आदित्य आठल्ये तबल्यावर , नितीन चंद्रचूड ह्यांचा साऊंड आणि मी आणि संदीप , असे एकूण चार जण , एवढी मोठी टीम!!:)
    जवळजवळ महिनाभराने संदीपशी फोनवर बोलणं झालं तेव्हा, अजून एकदा करूया का रे ? मजा आली होती त्या दिवशी , बघूया आले तर आले लोक, नाहीतर आपण काँट्रीब्युशन काढून करू एक प्रयोग" असं बोलणं झालं, पुन्हा हाउसफुल्ल !!
    मग तिसरा ... मग चौथा ...तुम्ही दाद देत राहिलात आणि आम्ही गात राहिलो .
    मग पुण्याबाहेर पहिला, कोल्हापूर मग सांगली ... मुंबईचा एक संगीतकार मला जळक्या ( ज्याला मुंबईत पुणेरी म्हणतात ) टोन मध्ये म्हणाला होता , हा कार्यक्रम पुण्यात वर्ल्ड फेमस आहे ना ? मी हसलो होतो ...
    १७ देशात कार्यक्रम झाले अगदी ,अमेरिकेत ४० हुन अधिक शहरात हाऊसफुल .... भारतात अनेक शहरात ... महाराष्ट्रात अगदी छोट्या गावांपासून ते शुक्रवार, शनिवार रविवार. ठाणे, दादर, पार्ले असे हाउसफुल्ल कार्यक्रम ...कोकण ,विदर्भ , मराठवाडा , नाशिक, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, गोवा, बंगलोर, बडोदा, दिल्ली, इंदोर,भोपाळ ... सगळीकडे तेच प्रेम,तोच उत्साह
    शंभर शंभर वेळा आयुष्यवर बोलू काही बघणारे अनेक रसिक आहेत .आम्ही शब्द विसरलो तर गाणं पूर्ण करतील असे अनेक मित्र जोडले गेले. संपूर्ण थिएटर आमच्याबरोबर गातांना ऐकण्याचा योग वर्षानुवर्षे या कार्यक्रमाच्या पत्रिकेत आहे .
    १०० वा ... मग झी मराठीवर प्रक्षेपित झालेला ५०० वा ... मग ... १००० ... ११११... आणि आता १४०० च्या जवळ आलेली प्रयोगांची संख्या ...
    मधल्या काळात अत्यंत गुणी गिटार वादक, रितेश ओहोळ या कुटुंबात सहभागी झाला आणि आता कार्यक्रमाचा अविभाज्य भाग झाला. अजूनही तबल्याला आदित्य आठल्ये आणि साऊंड नितीन चंद्रचूड ह्यांचाच आहे , कॉलेजकुमार आदित्य आता `बाबा ` झाला आहे
    शुभंकरला कडेवर घेऊन कार्यक्रमाला गेलो होतो तो दिवस आठवतो, आणि आता शुभंकर अनेक कार्यक्रमात गायला. त्याच्या गाण्याच्या फर्माईशी मला येतात , एकटी एकटी घाबरलीस ना, करून करून काळजी माझी गायलाच हवं असं रसिक म्हणतात . एक मोठा प्रवास ! १८ वर्ष !!

    सातत्याने नवीन गाणी, कविता ... अगदी ... दिवस असे कि, हे भलते अवघड असते, अताशा असे हे , नामंजूर ... सांग सख्या रे .. पाऊस असा रुणझुणता, मोर्चा नेला नाही, मेघ नसता वीज नसता, तुझे नि माझे नाते काय ? ... इथपासून दिवा लागू दे रे देवा आणि संदीपच्या अनेक नवनवीन कविता ,अगदी नुकत्याच प्रकाशित झालेल्या ` मी आणि माझा आवाज ` ह्या पुस्तकातील कविता आणि आम्ही नुकतंच केलेलं , रुक जा जालीम आखरी बार पर्यन्त ... अग्गोबाई पासून दूर देशी गेला बाबा पर्यन्त आणि दमलेल्या बाबा पासून ऐसे काही व्हावे मन शांत निजावे ... प्रत्येक रचनेला तुम्ही आशीर्वाद दिला.

    खूप रसिक, संयोजक, वाहन चालक, ध्वनिसंयोजक , सगळ्यांचे हात मनापासून ह्यात सहभागी झाले म्हणून हा प्रवास इतका सहज सुंदर झाला .

    अजूनही ह्या कार्यक्रमाचं BROUCHURE नाहीये . कोणी AGENCY नाही. कार्यक्रम तुम्ही रसिकांनी मोठा केला ... तो तुमचा होता आणि तुमचाच राहील .

    - सलील कुलकर्णी.
    संकलन : संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन (प्रेस फ्रिडम डे)

    ३ मे हा दिवस प्रेस स्वातंत्र्य दिन किंवा जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन (‘प्रेस फ्रिडम डे’) म्हणून साजरा केला जातो.

  • युध्दपट ‘हकीकत’ चित्रपटाला ५८ वर्षे पूर्ण झाली

    हा एक उत्तम आदर्श युध्दपट म्हणून गणला जातो. या चित्रपटात बलराज साहनी ( मेजर रणजित सिंग), धर्मेंद्र ( कॅप्टन बहादूर सिंग), विजय आनंद ( मेजर प्रताप सिंग), तसेच प्रिया राजवंश, संजय खान, सुधीर, शेख मुख्तार इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत.

  • दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे

    दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट मुंबईतील मराठा मंदिर या थिएटरमध्ये ही जवळपास २४ वर्ष म्हणजेच, १२७४ आठवड्यांपर्यंत चालला.

  • प्रथम अंटार्क्टिकावर पोहोचणारा रॉल्ड अमुंडसेन

    १४ डिसेंबर १९११ रोजी रॉल्ड अमुंडसेन हा नॉर्वे देशाचा नागरीक प्रथम अंटार्क्टिकावर पोहोचला. त्याचे पथक सुखरुप परत आले. १८ जानेवारी १९१२ ला रॉबर्ट स्कॉटही दक्षिण ध्रुवावर जाऊन पोचला. परंतु परत येताना तो व त्याचे लोक मृत्यू पावले.

  • कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा ५९ वा वर्धापन दिन

    कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा ५९ वा वर्धापन दिन

    या विद्यापीठाचे वैशिष्ट्य असे, की बहुजन समाजातील मॅट्रिक पास तरुणांना नोकरीसाठी जाणीवपूर्वक संधी दिली. आणि तालमीच्या कट्टयावर बसणारी ही पोरं विद्यापीठात काय गुण उधळणार? अशा अर्थाने त्या काळातही टीका सुरू झाली. पण विद्यापीठाच्या या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाची शान आणि मान उंचावली.

  • जागतिक साडी दिवस

    साडी हा असा पोषाख आहे जो कुठल्याही प्रसंगी परिधान केला तरी चालतो. म्हणूनच वेस्टर्न कल्चरचा कितीही प्रभाव पडला तरी स्त्रियांच्या मनातील आणि कपाटातील आपले स्थान साडीने अजूनही कायम ठेवले आहे. २१ डिसेंबर हा आता जागतिक साडी दिवस म्हणून साजरा केला जातो. 

  • बेगमबर्वे’ या नाटकाचा पहिला प्रयोग

    बेगम बर्वे (१९७९) हे अनेकार्थांनी मराठी रंगभूमीच्या इतिहासातील एकमेवाद्वितीय नाटक आहे. सामान्यतः एकत्र वा विभक्त कुटुंबातील व्यक्तींचे परस्परसंबंध व त्यातून उत्पन्न होणारे ताणतणाव मराठीतील अनेक नाटकांच्या केंद्रस्थानी असतात. या नाटकात योजून चार व्यक्तिरेखा आहेत. त्यांचे एकमेकांशी रक्ताचे नाते नाही. अनाम पण दृढ भावबंधांनी या व्यक्ती परस्परांशी जोडल्या गेल्या आहेत असेही दिसत नाही. नाटकात रूढ अर्थाने नायक-नायिका नाहीत. चौघांपैकी जावडेकर, बावडेकर व शामराव हे तिघेजण मध्यमवयीन पुरुष आहेत. बर्वे बाह्यत: पुरुष आहे परंतु अंतर्यामी तो स्त्रीचे जीवन जगतो.

  • जागतिक वारसा सप्ताह

    कोरीव मंदिरे, लेणी, तेथील दगडात कोरलेली शिल्पे आणि त्यांचे सौदर्य यांचा अभ्यास भारतीय विद्या या शाखेत केला जातो. निसर्ग आणि मानव हे एकमेकांच्या साह्चार्याने राहतात त्यामुळे वन्य जीव, पशु आणि पक्षी, निसर्गातील वैविध्य यांची काळजी घेणे यासातही अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने यांचे महत्व अविवाद्य आहे.

  • संगीत मानापमान’ नाटकाचा प्रथम प्रयोग

    श्रीमंतीची लालसेची खिल्ली उडविण्यासाठी ‘लक्ष्मीघर’ या पात्राची फजिती या नाटकात सादर होते. तसेच धैयधराच्या मनातील भामिनी बद्दलचा राग लक्षात घेवून प्रत्यक्षात ‘भामिनी’च ‘वनमाला’ हे नाव धारण करते व धैर्यधरास जिंकते. इथे पराक्रमी नायकास कर्तबगार परंतु श्रीमंतीस दुय्यम स्थान देणारी नायिका भेटते.