कार्तिक शुक्ल एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह केला जातो. प्रबोधिनी एकादशीला भगवंतांना जागे केले जाते आणि बाळकृष्णाचा तुळशीजवळ विवाह लावला जातो. या दिवशी तुळशी वृंदावन सुशोभित केले जाते. वृंदावनात उस, फुलांसहित झाडे उभी करतात. चिंचा, आवळे ठेवतात. सायंकाळी विवाह सोहळा केला जातो. बाळकृष्ण व तुळस यामध्ये अंतरपाट धरला जातो. मंगलाष्टके म्हणतात. नैवेद्य, मंत्रपुष्पाने विवाह सोहळा संपतो. काही ठिकाणी कन्यादान झाल्यावर विवाह होम करण्याची रुढी आढळते.
Author
Post Views: 15