ऋषीपंचमी

ऋषीपंचमी

गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुध्द पंचमीस स्त्रिया हे व्रत करतात .

आपल्या श्रेष्ठ ऋषीच्या सत्विकतेला , त्यांच्या अंगी असलेल्या उदात्त गुणांना विनम्रतेने अभिवादन करून त्यांचे पूजन करण्याचे हे व्रत आहे . त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी हे व्रत अंगीकारून वैदिक , तत्वज्ञान , वैदिक धर्म आणि वैदिक संस्कृती ज्यांनी निर्माण केली त्या ज्ञान निष्ठांना , कर्म योग्यांना आणि तपोनिधींना या दिवशी व्रतस्थपणे आदरांजली वाहायला हवी. हे व्रत म्हणजे कश्यप, अत्री , भारद्वाज , विश्वामित्र , गौतम , जमदग्नी आणि वसिष्ठ या थोर सप्तर्षीची व अरुंधतीची पूजा आहे . उपवास करून केवळ हाताने पिकवलेली कंदमुळेच या दिवशी खावयाची असतात .

हे व्रत सात वर्षे सलग करावे असे शास्त्र सांगते . हि पूजा शुचितेचीअसल्याने आपल्या देहिक , मानसिक व बौद्धिक आचरणाच्या पातळीवरील अशुचीमुळे निर्माण झालेले कौटुंबिक व सामाजिक दोष या व्रतामुळे दूर होतात असे मानले जाते.

ऋषीपंचमीला केल्या जाणार्‍या खास भाजीची कृती पहा...
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३



गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुध्द पंचमीस स्त्रिया हे व्रत करतात .

आपल्या श्रेष्ठ ऋषीच्या सत्विकतेला , त्यांच्या अंगी असलेल्या उदात्त गुणांना विनम्रतेने अभिवादन करून त्यांचे पूजन करण्याचे हे व्रत आहे . त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी हे व्रत अंगीकारून वैदिक , तत्वज्ञान , वैदिक धर्म आणि वैदिक संस्कृती ज्यांनी निर्माण केली त्या ज्ञान निष्ठांना , कर्म योग्यांना आणि तपोनिधींना या दिवशी व्रतस्थपणे आदरांजली वाहायला हवी. हे व्रत म्हणजे कश्यप, अत्री , भारद्वाज , विश्वामित्र , गौतम , जमदग्नी आणि वसिष्ठ या थोर सप्तर्षीची व अरुंधतीची पूजा आहे . उपवास करून केवळ हाताने पिकवलेली कंदमुळेच या दिवशी खावयाची असतात .

हे व्रत सात वर्षे सलग करावे असे शास्त्र सांगते . हि पूजा शुचितेचीअसल्याने आपल्या देहिक , मानसिक व बौद्धिक आचरणाच्या पातळीवरील अशुचीमुळे निर्माण झालेले कौटुंबिक व सामाजिक दोष या व्रतामुळे दूर होतात असे मानले जाते.

ऋषीपंचमीला केल्या जाणार्‍या खास भाजीची कृती पहा…
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३

Author