डाळीत हळकुंड ठेवल्याने डाळीला कीड लागत नाही. कैरीचा कीस उन्हात वाळवून घ्यावा.हा कीस पुढे वर्षभर कोणत्याही पदार्थात घालून पदार्थाची चव वाढवता येते. कोणतेही वाटण करताना लिंबू पिळले की वाटण लवकर होते. डोशाचे पीठ भिजवताना उडदाचे दोन-तीन पापड कुस्करुन घातल्यास डोसे कुरकुरीत होतात. दही आंबट होऊ नये यासाठी विरजणात ओल्या खोब-याचा तुकडा ठेवावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Author
Post Views: 14