महाराष्ट्रातील माणसाला फ्लोरा फाऊंटन माहित नाही असे होणारच नाही. मुंबईच्या फोर्ट भागातील डेव्हीड ससून यांच्या मालकीच्या जागेवर इ.स.१८६४ साली हे कारंजे बांधण्यात आले. मुंबईतील सर्वात गजबजलेल्या भागात असूनही अतिशय सुंदर अशा या कारंज्यांचे एका पयर्टनस्थळातच रुपांतर झाले.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पोलिसांच्या गोळीबारात या परिसरात १०५ जण मुत्युमुखी पडले. त्यांची आठवण म्हणून १९६० मध्ये या परिसराचे हुतात्मा चौक असे नामकरण करण्यात आले.
Author
Post Views: 14