औरंगाबाद जिल्हा

महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. औरंगाबाद शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे तर जगप्रसिद्ध अजंठा-वेरूळ गुफा, बीबी का मकबरा, दौलताबाद देवगिरी किल्ला ही ऐतिहासिक ठिकाणे याच जिल्ह्यात आहेत. ऐतिहासिक पर्यटनकेंद्र अशी जगाच्या नकाशावर औरंगाबादची ओळख आहे.



महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. औरंगाबाद शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे तर जगप्रसिद्ध अजंठा-वेरूळ गुफा, बीबी का मकबरा, दौलताबाद देवगिरी किल्ला ही ऐतिहासिक ठिकाणे याच जिल्ह्यात आहेत. ऐतिहासिक पर्यटनकेंद्र अशी जगाच्या नकाशावर औरंगाबादची ओळख आहे. ‘पैठणी साडी’ ही या जिल्ह्याची प्रमुख ओळख. औरंगाबादला दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. आजही जुन्या औरंगाबाद शहरात अशी अनेक महाद्वारे अर्थात दरवाजे आहेत. श्री घृष्णेश्र्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक याच जिल्ह्यात आहेत. स्वयंचलित वाहने आणि वाहनांचे सुटे भाग, बिअर आणि व्हिस्की तसेच शीतपेयांची निर्मिती हा औरंगाबादमध्ये भरभराटीला आलेला उद्योग आहे. दौलताबाद येथील पेरू व सीताफळे महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत.

Author